शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

देशाला गांधी विचारधारेची गरज

By admin | Updated: October 3, 2015 02:46 IST

देशातील वातावरण सध्या फार चांगले नाही. समाज-समाजात वाद निर्माण करणे, हिंसाचाराला प्रोत्साहन देणे सुरू आहे.

जागतिक अहिंसा दिन : शहर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे आयोजननागपूर : देशातील वातावरण सध्या फार चांगले नाही. समाज-समाजात वाद निर्माण करणे, हिंसाचाराला प्रोत्साहन देणे सुरू आहे. अशा प्रसंगी समाजाला व देशाला एकजूट करणाऱ्या महात्मा गांधीजींच्या विचारांची खूप गरज आहे. गांधी विचारधाराच या देशामध्ये शांती, अहिंसा, बंधुभाव कायम ठेवू शकते, असे प्रतिपादन जागतिक अहिंसा दिनानिमित्त शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात काँग्रेसच्या नेत्यांनी येथे केले. जागतिक अहिंसा दिन आयोजन समिती, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने व्हेरायटी चौक महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आदरांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार म्हणाले ‘महात्मा गांधी यांना कितीही कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला तरी त्यांचे योगदान कुणीच नाकारू शकणार नाही. ‘तसेच माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, आ. सुनील केदार, माजी मंत्री आ. राजेंद्र मुळक, माजी खासदार गेव्ह आवारी, ग्रामीण काँग्रेस अध्यक्षा सुनीता गावंडे, महिला अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, युवक काँग्रेस अध्यक्ष बंटी शेळके यांनीही आपले विचार व्यक्त करीत महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. सुरुवातीला संगीतमय आदरांजली अर्पण करण्यात आली. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गजराज हटेवार यांनी संचालन केले. यावेळी नाना गावंडे, सेवादलाचे रामगोविंद खोब्रागडे, प्रफुल्ल गुडधे पाटील, उमाकांत अग्निहोत्री, दीपक कापसे, अभिजित वंजारी, संदीप सहारे, एस.क्यू. जमा, विजय बाभरे, डॉ. बंडोपंत टेंभुर्णे, अतुल कोटेचा, संजय दुबे, रत्नाकर जयपूरकर, उमेश शाहू, तुफेल अशर, अजय हिवरकर, संदेश सिंगलकर, घनश्याम मांगे, प्रशांत धवड, जयंत लुटे, हर्षला साबळे, अरुण डवरे, दीपक वानखेडे, तनवीर अहमद आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनीही महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)विष पसरवणारी विचारसरणी हद्दपार करा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नाथुराम गोडसेची विचारप्रणाली सध्या देशात वाढली आहे. ही विचारप्रणाली देशाला विभाजित करणारी आणि समाजात विष पसरवणारी असून या विचारप्रणालीला हद्दपार करा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.