शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

देशाला गांधी विचारधारेची गरज

By admin | Updated: October 3, 2015 02:46 IST

देशातील वातावरण सध्या फार चांगले नाही. समाज-समाजात वाद निर्माण करणे, हिंसाचाराला प्रोत्साहन देणे सुरू आहे.

जागतिक अहिंसा दिन : शहर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे आयोजननागपूर : देशातील वातावरण सध्या फार चांगले नाही. समाज-समाजात वाद निर्माण करणे, हिंसाचाराला प्रोत्साहन देणे सुरू आहे. अशा प्रसंगी समाजाला व देशाला एकजूट करणाऱ्या महात्मा गांधीजींच्या विचारांची खूप गरज आहे. गांधी विचारधाराच या देशामध्ये शांती, अहिंसा, बंधुभाव कायम ठेवू शकते, असे प्रतिपादन जागतिक अहिंसा दिनानिमित्त शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात काँग्रेसच्या नेत्यांनी येथे केले. जागतिक अहिंसा दिन आयोजन समिती, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने व्हेरायटी चौक महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आदरांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार म्हणाले ‘महात्मा गांधी यांना कितीही कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला तरी त्यांचे योगदान कुणीच नाकारू शकणार नाही. ‘तसेच माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, आ. सुनील केदार, माजी मंत्री आ. राजेंद्र मुळक, माजी खासदार गेव्ह आवारी, ग्रामीण काँग्रेस अध्यक्षा सुनीता गावंडे, महिला अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, युवक काँग्रेस अध्यक्ष बंटी शेळके यांनीही आपले विचार व्यक्त करीत महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. सुरुवातीला संगीतमय आदरांजली अर्पण करण्यात आली. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गजराज हटेवार यांनी संचालन केले. यावेळी नाना गावंडे, सेवादलाचे रामगोविंद खोब्रागडे, प्रफुल्ल गुडधे पाटील, उमाकांत अग्निहोत्री, दीपक कापसे, अभिजित वंजारी, संदीप सहारे, एस.क्यू. जमा, विजय बाभरे, डॉ. बंडोपंत टेंभुर्णे, अतुल कोटेचा, संजय दुबे, रत्नाकर जयपूरकर, उमेश शाहू, तुफेल अशर, अजय हिवरकर, संदेश सिंगलकर, घनश्याम मांगे, प्रशांत धवड, जयंत लुटे, हर्षला साबळे, अरुण डवरे, दीपक वानखेडे, तनवीर अहमद आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनीही महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)विष पसरवणारी विचारसरणी हद्दपार करा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नाथुराम गोडसेची विचारप्रणाली सध्या देशात वाढली आहे. ही विचारप्रणाली देशाला विभाजित करणारी आणि समाजात विष पसरवणारी असून या विचारप्रणालीला हद्दपार करा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.