शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या साहित्याची देशालाच गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य म्हणजे केवळ साहित्य नव्हे तर ते देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य म्हणजे केवळ साहित्य नव्हे तर ते देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शक दस्तऐवज आहे. त्यांच्या जीवनावर व त्यांच्या लेखन साहित्यावर देशातच नव्हे जगभरात संशोधन होत असते. त्यामुळे बाबासाहेबांच्या साहित्याला माेठी मागणी आहे. तेव्हा देशासाठीच आवश्यक असलेले हे दस्तऐवज लोकांपर्यंत पोहोचू द्या, साहित्य प्रकाशनाच्या कार्याला गती द्या, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.

राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीतर्फे गेल्या १६ वर्षांपासून बाबासाहेबांचा एकही नवीन खंड प्रकाशित करण्यात आला नाही, यावर प्रकाश टाकणारे वृत्त ‘बाबासाहेबांच्या साहित्याची राज्य सरकारलाच ॲलर्जी’ या शीर्षकांतर्गत

लोकमतने ६ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या वृत्ताची दखल घेत बाबासाहेबांच्या साहित्य प्रकाशनाला गती देण्याची मागणी केली असून यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा संकल्प केला आहे.

प्रकाशनाचे काम तातडीने सुरू व्हावे

बाबासाहेबांचे साहित्य हे कुण्या एका समाजापुरते मर्यादित नाही. ते देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ते साहित्य लोकांपर्यंत येणे आवश्यक आहे. सध्या समिती बरखास्त झाली असून समितीच्या सदस्यांची नेमणूक तातडीने व्हावी आणि कामाला सुरुवात होणे आवश्यक आहे.

डॉ. प्रदीप आगलावे, आंबेडकरी विचारवंत

निधी कपात करण्याचा निषेध

बााबासाहेबांच्या साहित्यासाठी दरवर्षी ३ कोटी रुपयांचा निधी दिला जात असताना मागच्या सरकारने तो साडेचार लाखावर आणला. हे अतिशय चुकीचे काम झाले. मुळात साहित्य प्रकाशित होऊच नये, असाच हा प्रकार होय. आताच्या राज्य सरकारने तरी याावर गांभीर्याने लक्ष घालून प्रकाशनाचे काम सुरू करावे.

विलास गजघाटे, सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी

आंबेडकर फाऊंडेशनबाबतच्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी

बाबासाहेबांच्या साहित्याचा आवाका मोठा आहे. मूळ साहित्याचे ७५ खंड व संदर्भ साहित्याचे १०० असे एकूण १७५ खंड होऊ शकतात. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अनुवाद केल्यास ५०० खंडांचा प्रकल्प होऊ शकतो. एवढी व्याप्ती लक्षात घेऊन २ जुलै २००३ मध्ये चरित्र साधने समितीने आंबेडकर फाऊंडेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. हिवाळी अधिवेशनात २३ डिसेंबर २००९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या फाऊंडेशनचे मुख्यालय नागपुरात ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. याची पूर्तता व अंमलबजावणी करण्यात यावी.

प्रकाश बन्सोड

अध्यक्ष, भारतीय दलित पँथर