शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बाबासाहेबांच्या साहित्याची देशालाच गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य म्हणजे केवळ साहित्य नव्हे तर ते देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य म्हणजे केवळ साहित्य नव्हे तर ते देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शक दस्तऐवज आहे. त्यांच्या जीवनावर व त्यांच्या लेखन साहित्यावर देशातच नव्हे जगभरात संशोधन होत असते. त्यामुळे बाबासाहेबांच्या साहित्याला माेठी मागणी आहे. तेव्हा देशासाठीच आवश्यक असलेले हे दस्तऐवज लोकांपर्यंत पोहोचू द्या, साहित्य प्रकाशनाच्या कार्याला गती द्या, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.

राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीतर्फे गेल्या १६ वर्षांपासून बाबासाहेबांचा एकही नवीन खंड प्रकाशित करण्यात आला नाही, यावर प्रकाश टाकणारे वृत्त ‘बाबासाहेबांच्या साहित्याची राज्य सरकारलाच ॲलर्जी’ या शीर्षकांतर्गत

लोकमतने ६ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या वृत्ताची दखल घेत बाबासाहेबांच्या साहित्य प्रकाशनाला गती देण्याची मागणी केली असून यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा संकल्प केला आहे.

प्रकाशनाचे काम तातडीने सुरू व्हावे

बाबासाहेबांचे साहित्य हे कुण्या एका समाजापुरते मर्यादित नाही. ते देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ते साहित्य लोकांपर्यंत येणे आवश्यक आहे. सध्या समिती बरखास्त झाली असून समितीच्या सदस्यांची नेमणूक तातडीने व्हावी आणि कामाला सुरुवात होणे आवश्यक आहे.

डॉ. प्रदीप आगलावे, आंबेडकरी विचारवंत

निधी कपात करण्याचा निषेध

बााबासाहेबांच्या साहित्यासाठी दरवर्षी ३ कोटी रुपयांचा निधी दिला जात असताना मागच्या सरकारने तो साडेचार लाखावर आणला. हे अतिशय चुकीचे काम झाले. मुळात साहित्य प्रकाशित होऊच नये, असाच हा प्रकार होय. आताच्या राज्य सरकारने तरी याावर गांभीर्याने लक्ष घालून प्रकाशनाचे काम सुरू करावे.

विलास गजघाटे, सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी

आंबेडकर फाऊंडेशनबाबतच्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी

बाबासाहेबांच्या साहित्याचा आवाका मोठा आहे. मूळ साहित्याचे ७५ खंड व संदर्भ साहित्याचे १०० असे एकूण १७५ खंड होऊ शकतात. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अनुवाद केल्यास ५०० खंडांचा प्रकल्प होऊ शकतो. एवढी व्याप्ती लक्षात घेऊन २ जुलै २००३ मध्ये चरित्र साधने समितीने आंबेडकर फाऊंडेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. हिवाळी अधिवेशनात २३ डिसेंबर २००९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या फाऊंडेशनचे मुख्यालय नागपुरात ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. याची पूर्तता व अंमलबजावणी करण्यात यावी.

प्रकाश बन्सोड

अध्यक्ष, भारतीय दलित पँथर