शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बाबासाहेबांच्या साहित्याची देशालाच गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य म्हणजे केवळ साहित्य नव्हे तर ते देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य म्हणजे केवळ साहित्य नव्हे तर ते देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शक दस्तऐवज आहे. त्यांच्या जीवनावर व त्यांच्या लेखन साहित्यावर देशातच नव्हे जगभरात संशोधन होत असते. त्यामुळे बाबासाहेबांच्या साहित्याला माेठी मागणी आहे. तेव्हा देशासाठीच आवश्यक असलेले हे दस्तऐवज लोकांपर्यंत पोहोचू द्या, साहित्य प्रकाशनाच्या कार्याला गती द्या, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.

राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीतर्फे गेल्या १६ वर्षांपासून बाबासाहेबांचा एकही नवीन खंड प्रकाशित करण्यात आला नाही, यावर प्रकाश टाकणारे वृत्त ‘बाबासाहेबांच्या साहित्याची राज्य सरकारलाच ॲलर्जी’ या शीर्षकांतर्गत

लोकमतने ६ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या वृत्ताची दखल घेत बाबासाहेबांच्या साहित्य प्रकाशनाला गती देण्याची मागणी केली असून यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा संकल्प केला आहे.

प्रकाशनाचे काम तातडीने सुरू व्हावे

बाबासाहेबांचे साहित्य हे कुण्या एका समाजापुरते मर्यादित नाही. ते देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ते साहित्य लोकांपर्यंत येणे आवश्यक आहे. सध्या समिती बरखास्त झाली असून समितीच्या सदस्यांची नेमणूक तातडीने व्हावी आणि कामाला सुरुवात होणे आवश्यक आहे.

डॉ. प्रदीप आगलावे, आंबेडकरी विचारवंत

निधी कपात करण्याचा निषेध

बााबासाहेबांच्या साहित्यासाठी दरवर्षी ३ कोटी रुपयांचा निधी दिला जात असताना मागच्या सरकारने तो साडेचार लाखावर आणला. हे अतिशय चुकीचे काम झाले. मुळात साहित्य प्रकाशित होऊच नये, असाच हा प्रकार होय. आताच्या राज्य सरकारने तरी याावर गांभीर्याने लक्ष घालून प्रकाशनाचे काम सुरू करावे.

विलास गजघाटे, सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी

आंबेडकर फाऊंडेशनबाबतच्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी

बाबासाहेबांच्या साहित्याचा आवाका मोठा आहे. मूळ साहित्याचे ७५ खंड व संदर्भ साहित्याचे १०० असे एकूण १७५ खंड होऊ शकतात. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अनुवाद केल्यास ५०० खंडांचा प्रकल्प होऊ शकतो. एवढी व्याप्ती लक्षात घेऊन २ जुलै २००३ मध्ये चरित्र साधने समितीने आंबेडकर फाऊंडेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. हिवाळी अधिवेशनात २३ डिसेंबर २००९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या फाऊंडेशनचे मुख्यालय नागपुरात ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. याची पूर्तता व अंमलबजावणी करण्यात यावी.

प्रकाश बन्सोड

अध्यक्ष, भारतीय दलित पँथर