शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या साहित्याची देशालाच गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य म्हणजे केवळ साहित्य नव्हे तर ते देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य म्हणजे केवळ साहित्य नव्हे तर ते देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शक दस्तऐवज आहे. त्यांच्या जीवनावर व त्यांच्या लेखन साहित्यावर देशातच नव्हे जगभरात संशोधन होत असते. त्यामुळे बाबासाहेबांच्या साहित्याला माेठी मागणी आहे. तेव्हा देशासाठीच आवश्यक असलेले हे दस्तऐवज लोकांपर्यंत पोहोचू द्या, साहित्य प्रकाशनाच्या कार्याला गती द्या, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.

राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीतर्फे गेल्या १६ वर्षांपासून बाबासाहेबांचा एकही नवीन खंड प्रकाशित करण्यात आला नाही, यावर प्रकाश टाकणारे वृत्त ‘बाबासाहेबांच्या साहित्याची राज्य सरकारलाच ॲलर्जी’ या शीर्षकांतर्गत

लोकमतने ६ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या वृत्ताची दखल घेत बाबासाहेबांच्या साहित्य प्रकाशनाला गती देण्याची मागणी केली असून यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा संकल्प केला आहे.

प्रकाशनाचे काम तातडीने सुरू व्हावे

बाबासाहेबांचे साहित्य हे कुण्या एका समाजापुरते मर्यादित नाही. ते देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ते साहित्य लोकांपर्यंत येणे आवश्यक आहे. सध्या समिती बरखास्त झाली असून समितीच्या सदस्यांची नेमणूक तातडीने व्हावी आणि कामाला सुरुवात होणे आवश्यक आहे.

डॉ. प्रदीप आगलावे, आंबेडकरी विचारवंत

निधी कपात करण्याचा निषेध

बााबासाहेबांच्या साहित्यासाठी दरवर्षी ३ कोटी रुपयांचा निधी दिला जात असताना मागच्या सरकारने तो साडेचार लाखावर आणला. हे अतिशय चुकीचे काम झाले. मुळात साहित्य प्रकाशित होऊच नये, असाच हा प्रकार होय. आताच्या राज्य सरकारने तरी याावर गांभीर्याने लक्ष घालून प्रकाशनाचे काम सुरू करावे.

विलास गजघाटे, सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी

आंबेडकर फाऊंडेशनबाबतच्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी

बाबासाहेबांच्या साहित्याचा आवाका मोठा आहे. मूळ साहित्याचे ७५ खंड व संदर्भ साहित्याचे १०० असे एकूण १७५ खंड होऊ शकतात. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अनुवाद केल्यास ५०० खंडांचा प्रकल्प होऊ शकतो. एवढी व्याप्ती लक्षात घेऊन २ जुलै २००३ मध्ये चरित्र साधने समितीने आंबेडकर फाऊंडेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. हिवाळी अधिवेशनात २३ डिसेंबर २००९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या फाऊंडेशनचे मुख्यालय नागपुरात ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. याची पूर्तता व अंमलबजावणी करण्यात यावी.

प्रकाश बन्सोड

अध्यक्ष, भारतीय दलित पँथर