शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

विधी शाखेकडून देशाला मोठ्या अपेक्षा

By admin | Updated: February 13, 2015 02:30 IST

देशाच्या शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. देशाच्या प्रगतीत विधी शाखेचे मोलाचे योगदान आहे. यापूवीर्ही विधी शाखेने देशाला मोठे नेतृत्व दिले आहे.

नागपूर : देशाच्या शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. देशाच्या प्रगतीत विधी शाखेचे मोलाचे योगदान आहे. यापूवीर्ही विधी शाखेने देशाला मोठे नेतृत्व दिले आहे. त्यामुळे या व्यवसायाकडून देशाला बऱ्याच मोठ्या अपेक्षा आहेत. ही बाब लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी समाजहिताला डोळ्यासमोर ठेवले पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या विधी शाखेतर्फे ‘लॉ व्हीजन २०१५’ या विधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.सी.पवार, महाविद्यालय विकास संचालक डॉ. मालती रेड्डी हे प्रामुख्याने उपस्थित होते. संविधानाच्या माध्यमातून समाजात आर्थिक आणि सामाजिक समानता येणे हे बाबासाहेबांचे ध्येय होते. विधी शाखेने नेहमी बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाचे पालन केले. विद्यार्थ्यांनी समाजहित डोळ्यासमोर ठेवूनच या क्षेत्रात प्रवेश करावा. जागतिकीकरणाच्या युगात विधी शाखेतील विद्यार्थ्यांसमोर मोठ्या संधी आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:चा विकास करावा. मेहनत, सातत्य आणि मोठे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या व्यवसायात यावे, असे आवाहन न्या.गवई यांनी केले.यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे यांनीदेखील मार्गदर्शन केले. विधी शाखेचा विस्तार होत असून यामुळे हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी ‘चॅलेंजिंग’ झाला आहे. प्रास्ताविक डॉ. पी.सी. पवार यांनी केले. संचालन रसिका बांगरे आणि लक्ष्मी कुकडे यांनी केले. यंदा या महोत्सवात १४ महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे. महोत्सवादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘मूट कोट’ स्पर्धादेखील महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)