शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

मतमोजणीचे वेळापत्रक कोलमडले

By admin | Updated: May 17, 2014 01:03 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल चार तासात घोषित करण्याचा जिल्हाधिकार्‍यांनी केलेला दावा प्रत्यक्षात मतमोजणीच्या वेळी फोल ठरला.

१२ तास चालली प्रक्रिया : टपाल मतांसाठीही विलंब

नागपूर: लोकसभा निवडणुकीचा निकाल चार तासात घोषित करण्याचा जिल्हाधिकार्‍यांनी केलेला दावा प्रत्यक्षात मतमोजणीच्या वेळी फोल ठरला. सकाळी ८ वाजतापासून सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री ७.३0 पर्यंंत चालली. १२ तासापेक्षा जास्त वेळ यासाठी लागला.

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी चार तासात मतमोजणीची प्रक्रिया संपेल, असे नियोजन केले जाईल, असे पत्रकारांना सांगितले. होते. मतमोजणीच्या एक दिवस आधी त्यांनी मतमोजणी ४ वाजता संपेल असे सांगितले होते. प्रत्यक्षात नागपूरचा निकाल जाहीर करण्यास सायंकाळ व रामटेकचा निकाल जाहीर होण्यास रात्रीचे ७.३0 वाजले. टपाल मतमोजणीची प्रक्रिया चार तासात पूर्ण केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात त्यालाही विलंब झाला. रामटेकच्या टपाल मतांची मोजणी दुपारी ३ वाजता तर नागपूरच्या टपाल मतांची मोजणी ५ वाजता पूर्ण झाली.

मतमोजणीस्थळी प्रथमच वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. एका विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रतिनिधींना दुसर्‍या मतदारसंघात प्रवेश करता येत नव्हता. दोन रांगेत प्रत्येकी दहा असे एकूण वीस टेबल लावण्यात आले होते. मतमोजणीलाही नियोजित वेळेपेक्षा अध्र्या तासाने म्हणजे ८.३0 वाजता सुरुवात झाली. पहिल्या फेरीचा कल बरोबर १0 वाजता जाहीर करण्यात आला. पण त्यानंतरच्या फेर्‍यांचा कल जाहीर करण्यास विलंब होत गेला. फेरीनिहाय निकाल जाहीर करताना अनेक वेळा खुद्द जिल्हाधिकार्‍यांना अडथळे आले. रामटेकच्याबाबतीत असा प्रकार घडला नाही.

रामटेकच्या तुलनेत नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया संथ होती. मात्र फेर्‍या कमी असल्याने नागपूरचा निकाल आधी जाहीर करण्यात आला. मतदानस्थळी पोलीस बंदोबस्त कडेकोट होता. प्रत्येकाला सुरक्षेच्या तीन टप्प्यातून जावे लागत होते. त्याचा फटका अनेकांना बसला.

मतमोजणीच्या कामात असलेल्या कर्मचार्‍यांच्या भोजनाकडे प्रशासनाने यंदा काळजीपूर्वक लक्ष दिले असले तरी पत्रकारांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली नव्हती. पत्रकारांसाठी तयार करण्यात आलेल्या मीडिया कक्षातही इतर कर्मचार्‍यांनीच ठाण मांडले. त्यामुळे बसावे कुठे, असा प्रश्न प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना पडला. कक्षातील टीव्ही पाहण्यातच कर्मचारी व्यस्त असल्याने त्याचाही फटका माध्यमांच्या प्रतिनिधींना बसला. कक्षात पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. केवळ औपचारिकता म्हणून हा कक्ष सुरू करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. (प्रतिनिधी)