शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीचे वेळापत्रक कोलमडले

By admin | Updated: May 17, 2014 01:03 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल चार तासात घोषित करण्याचा जिल्हाधिकार्‍यांनी केलेला दावा प्रत्यक्षात मतमोजणीच्या वेळी फोल ठरला.

१२ तास चालली प्रक्रिया : टपाल मतांसाठीही विलंब

नागपूर: लोकसभा निवडणुकीचा निकाल चार तासात घोषित करण्याचा जिल्हाधिकार्‍यांनी केलेला दावा प्रत्यक्षात मतमोजणीच्या वेळी फोल ठरला. सकाळी ८ वाजतापासून सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री ७.३0 पर्यंंत चालली. १२ तासापेक्षा जास्त वेळ यासाठी लागला.

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी चार तासात मतमोजणीची प्रक्रिया संपेल, असे नियोजन केले जाईल, असे पत्रकारांना सांगितले. होते. मतमोजणीच्या एक दिवस आधी त्यांनी मतमोजणी ४ वाजता संपेल असे सांगितले होते. प्रत्यक्षात नागपूरचा निकाल जाहीर करण्यास सायंकाळ व रामटेकचा निकाल जाहीर होण्यास रात्रीचे ७.३0 वाजले. टपाल मतमोजणीची प्रक्रिया चार तासात पूर्ण केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात त्यालाही विलंब झाला. रामटेकच्या टपाल मतांची मोजणी दुपारी ३ वाजता तर नागपूरच्या टपाल मतांची मोजणी ५ वाजता पूर्ण झाली.

मतमोजणीस्थळी प्रथमच वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. एका विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रतिनिधींना दुसर्‍या मतदारसंघात प्रवेश करता येत नव्हता. दोन रांगेत प्रत्येकी दहा असे एकूण वीस टेबल लावण्यात आले होते. मतमोजणीलाही नियोजित वेळेपेक्षा अध्र्या तासाने म्हणजे ८.३0 वाजता सुरुवात झाली. पहिल्या फेरीचा कल बरोबर १0 वाजता जाहीर करण्यात आला. पण त्यानंतरच्या फेर्‍यांचा कल जाहीर करण्यास विलंब होत गेला. फेरीनिहाय निकाल जाहीर करताना अनेक वेळा खुद्द जिल्हाधिकार्‍यांना अडथळे आले. रामटेकच्याबाबतीत असा प्रकार घडला नाही.

रामटेकच्या तुलनेत नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया संथ होती. मात्र फेर्‍या कमी असल्याने नागपूरचा निकाल आधी जाहीर करण्यात आला. मतदानस्थळी पोलीस बंदोबस्त कडेकोट होता. प्रत्येकाला सुरक्षेच्या तीन टप्प्यातून जावे लागत होते. त्याचा फटका अनेकांना बसला.

मतमोजणीच्या कामात असलेल्या कर्मचार्‍यांच्या भोजनाकडे प्रशासनाने यंदा काळजीपूर्वक लक्ष दिले असले तरी पत्रकारांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली नव्हती. पत्रकारांसाठी तयार करण्यात आलेल्या मीडिया कक्षातही इतर कर्मचार्‍यांनीच ठाण मांडले. त्यामुळे बसावे कुठे, असा प्रश्न प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना पडला. कक्षातील टीव्ही पाहण्यातच कर्मचारी व्यस्त असल्याने त्याचाही फटका माध्यमांच्या प्रतिनिधींना बसला. कक्षात पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. केवळ औपचारिकता म्हणून हा कक्ष सुरू करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. (प्रतिनिधी)