शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

व्हीव्हीपॅट १०० टक्के मोजा, अन्यथा बॅलेटवरच निवडणुका घ्या; भारत मुक्ती मोर्चाची मागणी

By आनंद डेकाटे | Updated: January 6, 2024 15:20 IST

देशभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ईव्हीएम मशीनवर आता लोकांचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे हा विश्वास संपादित करण्यासाठी ईव्हीएमधून निघणाऱ्या व्हीव्हीपॅटचीही शंभर टक्के मोजणी करण्यात यावी, अन्यथा बॅलेटवरच निवडणुका घेण्यात याव्या, अशी मागणी भारत मुक्ती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी पक्षातर्फे देशभरात आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

ईव्हीएमद्वारे होणारी निवडणूक ही पारदर्शी नाही. त्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात बामसेफतर्फे सातत्याने आंदोलन सुरू आहे. न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. बामसेफच्याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅट मोजणीची आदेश दिले आहेत. परंतु त्याची १०० टक्के मोजणी होत नाही. त्यामुळे व्हीव्हीपॅटची १०० टक्के मोजणी करा अन्यथा ईव्हीएम हटवा या मागणीसाठी येत्या ३१ जानेवारी रोजी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगासमोर भारत मुक्ती मोर्चातर्फे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य न केल्यास ईव्हीएम फोडो आंदोलन केले जाणार आहे.

नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष सचिन वासनिक, अनिल नागरे, उत्तम सहारे, हेमलता पाटील, हस्ते मॅडम, अमर मेश्राम, भीमराव लांजेवार, जनार्दन गवई, लिंगायत सर, स्नेहा नारनवरे, निकोसे सर, भीमराव ढगे आदी सहभागी होते.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीन