शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

व्हीव्हीपॅट १०० टक्के मोजा, अन्यथा बॅलेटवरच निवडणुका घ्या; भारत मुक्ती मोर्चाची मागणी

By आनंद डेकाटे | Updated: January 6, 2024 15:20 IST

देशभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ईव्हीएम मशीनवर आता लोकांचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे हा विश्वास संपादित करण्यासाठी ईव्हीएमधून निघणाऱ्या व्हीव्हीपॅटचीही शंभर टक्के मोजणी करण्यात यावी, अन्यथा बॅलेटवरच निवडणुका घेण्यात याव्या, अशी मागणी भारत मुक्ती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी पक्षातर्फे देशभरात आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

ईव्हीएमद्वारे होणारी निवडणूक ही पारदर्शी नाही. त्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात बामसेफतर्फे सातत्याने आंदोलन सुरू आहे. न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. बामसेफच्याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपॅट मोजणीची आदेश दिले आहेत. परंतु त्याची १०० टक्के मोजणी होत नाही. त्यामुळे व्हीव्हीपॅटची १०० टक्के मोजणी करा अन्यथा ईव्हीएम हटवा या मागणीसाठी येत्या ३१ जानेवारी रोजी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगासमोर भारत मुक्ती मोर्चातर्फे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य न केल्यास ईव्हीएम फोडो आंदोलन केले जाणार आहे.

नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष सचिन वासनिक, अनिल नागरे, उत्तम सहारे, हेमलता पाटील, हस्ते मॅडम, अमर मेश्राम, भीमराव लांजेवार, जनार्दन गवई, लिंगायत सर, स्नेहा नारनवरे, निकोसे सर, भीमराव ढगे आदी सहभागी होते.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीन