शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रुईच्या टक्केवारीवर ठरावेत कापसाचे दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 15:59 IST

Nagpur News कापसाचे दर त्यातील रुईच्या टक्केवारी (उतारा) वर ठरविण्यात यावेत. यात शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा हाेईल. शिवाय, कापड उद्याेगालाही चांगल्या प्रतीची रुई मिळेल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा आर्थिक फायदा हाेणारदेशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर रुई आधारीत बाजारात महत्त्व

सुनील चरपेलाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कपाशीच्या नवीन वाणांमध्ये रुईचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यत पाेहाेचले आहे. मात्र, कापसाची किमान आधारभूत किंमत आणि ठरवताना त्यातील रुईचे प्रमाण ३२ ते ३३ टक्केच ग्राह्य धरले जाते. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचे प्रमाण (उतारा) अधिक असलेल्या कापसाला जास्त मागणी असून, अधिक दर मिळतो. उसाचे दर त्यातील साखरेच्या प्रमाणावर ठरविले जातात, त्याचप्रमाणे कापसाचे दर त्यातील रुईच्या टक्केवारी (उतारा )वर ठरविण्यात यावेत. यात शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा हाेईल. शिवाय, कापड उद्याेगालाही चांगल्या प्रतीची रुई मिळेल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

कापसाच्या बाजारात रुईच्या उताऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वीच्या वाणांमध्ये ३२ ते ३३ टक्के रुईचे प्रमाण असायचे. नवीन व संशाेधित वाणांमध्ये रुईचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत पाेहाेचले आहे. कापसाचे दर मात्र त्यातील ३३ टक्के रुईच्या आधारावरच ठरवले जात आहेत. देशात ९५ हजार ते १ लाख काेटी रुपयांचा कापसाचा बाजार आहे. कापसातील रुईच्या उताऱ्यामध्ये २ ते ७ टक्क्यांचा फरक येत असून, त्या फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही.

कापसाचे दर ठरवताना सरकार धाग्याची लांबी (स्टेपल लेन्थ), तलमता (मायक्राेनियर), ताकत (स्ट्रेन्थ), आर्द्रता (माॅईश्चर) या चार बाबी विचारात घेते. या चार बाबींसाेबतच रुईच्या उताऱ्याचे प्रमाण विचारात घेणे गरजेचे आहे. कृषी व वस्त्राेद्याेग मंत्रालयाने तशी मार्गदर्शक तत्त्वे ठरवावी. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा हाेऊन संशाेधनाला वाव मिळेल, असेही गाेविंद वैराळे, मधुसूदन हरणे यांच्यासह तज्ज्ञ मंडळींनी सांगितले. 

कापसाची ‘एमएसपी’ आणि उसाची ‘एफआरपी’

केंद्र शासन कापसाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) तर उसाची रास्त व किफायतशीर किंमत (एफआरपी-फेअर ण्ड रेग्युनरेटिव्ह प्राईझ) जाहीर करते. उसाचा दर हा त्यातील साखरेच्या प्रमाणावर (उतारा) ठरताे. उसातील साखरचे प्रमाण जेवढे अधिक तेवढा जास्त दर उसाला दिला जाताे. हीच पद्धती कापसात लागू करणे आवश्यक आहे. कापसाला रुईच्या उताऱ्यावर भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना प्रति टक्के किमान १०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागते.चार हजार काेटी रुपयांची बचत३४ टक्के रुई असलेल्या कापसापासून रुईची एक गाठ तयार करण्यासाठी पाच क्विंटल कापूस लागताे, तर ४० टक्के रुई असलेल्या कापसासाठी ४.२० क्विंटल कापूस लागताे. देशात कापसाचे सरासरी १८०० लाख क्विंटल अर्थात ३६० लाख गाठींचे उत्पादन हाेते. प्रति क्विंटल २०० रुपयांप्रमाणे हा कापूस वेचायला ३ हजार ६०० काेटी रुपये खर्च येताे. ४० टक्के रुई असलेल्या कापासासाठी हा खर्च देशभरात कमाल चार हजार काेटी रुपयांनी कमी हाेताे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.१९७० च्या पूर्वी दलाल व व्यापारी हातावर हात ठेवून अथवा रुमालाखाली बाेटे हलवून कापसाचे दर ठरवायचे. ही सांकेतिक भाषा शेतकऱ्यांना कळत नसल्याने तसेच कमी भाव दिला जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व्हायचे. आता रुईचे प्रमाण वाढले असूनही कापसाच्या बाजारात अप्रत्यक्षपणे हाच प्रकार सुरू आहे. कापसाचे दर रुईच्या प्रमाणावर ठरविण्यात यावे.- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक,महाराष्ट्र कापूस पणन महासंघ.आपल्या देशात लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन वाढले आहे. दक्षिण भारतात अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन हाेते. ते कमी असल्याने आपल्याला अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाची आयात करावी लागते. रुईच्या उताऱ्याप्रमाणे कापसाला भाव मिळाला तर अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन वाढले. त्याचा शेतकऱ्यांसाेबतच कापड उद्याेगालाही फायदा हाेईल.-डॉ. सी. डी. मायी,माजी कृषी आयुक्त, भारत सरकार.

टॅग्स :cottonकापूस