शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

कापूस उत्पादक संकटात

By admin | Updated: November 7, 2014 00:45 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढले असले तरी, उशिरा आलेला पाऊस, दुबार पेरणीचे संकट, पिकांवर लाल्याचा प्रकोप यामुळे कापसाच्या एकेरी उत्पादनात घट झाली आहे.

पेरा वाढला मात्र भाव नाही : महासंघाच्या खरेदीचा पत्ता नाहीनागपूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढले असले तरी, उशिरा आलेला पाऊस, दुबार पेरणीचे संकट, पिकांवर लाल्याचा प्रकोप यामुळे कापसाच्या एकेरी उत्पादनात घट झाली आहे. सरकारने कापसाचा हमीभाव घोषित केला असला तरी, फेडरेशनची खरेदी अद्यापही सुरू झालेली नसल्याने, हमीभावापेक्षाही कमी किंमतीत शेतकऱ्यांना कापसाची विक्री खासगी व्यापाऱ्यांना करावी लागत आहे. कापसाच्या बाबतीत शेतकरी त्रस्त असून, फेडरेशन सुस्त आहे. तर शेतकरी नेते म्हणवून घेणारे कामोकामी व्यस्त आहेत. गेल्या चार वर्षाची तुलना करता यंदा कापसाचे दर सर्वाधिक कमी आहे. २०११ ला कापसाला ७००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाले होते. यावर्षी कापसाला सरकारी हमीभावानुसार फक्त ४०५० रुपये प्रतिक्विंटर दर जाहीर केले आहे. मात्र सरकारी खरेदी केंद्र अद्यापही सुरू झाले नसल्याने, व्यापाऱ्यांनी त्याचा फायदा घेऊन ३५०० ते ३८०० रुपये दराने कापूस खरेदी सुरू केली आहे. यावर्षी नैसर्गिक संकटामुळे व महागाईमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. कापसाचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च ६००० रुपयांच्या जवळपास आहे. मात्र कापसाला भावच नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे. यावर्षी महाराष्ट्रात कापसाचा पेरा ४१.२१ लाख हेक्टरवर झाला. यातील ४० ते ४५ टक्के वाटा विदर्भाचा आहे. दरवर्षी दिवाळीच्या आसपास कापसाची खरेदी सुरू होते. यंदा दिवाळी संपूर्ण १५ दिवस लोटले आहे. शेतीतला कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकरी नाडविले जात आहे. फेडरेशनला विकून, मिळेल त्यात समाधानी मानणारे शेतकरी फेडरेशनच्या खरेदी केंद्राची वाट बघत आहे. सध्या राज्यात नवीन सरकार बसले आहे. मंत्रिपदाचे वाटप पूर्ण झाले नाही. त्यामुळे राज्यातील नेत्यांचे संपूर्ण लक्ष सत्ताकारणात आहे. गरीब शेतकऱ्यांकडे दूर्लक्ष होत आहे. पंतप्रधानांनी आश्वासन पाळावेदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी या गावात सभा घेऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, असे आश्वासन दिले होते. आयोगाने विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के लाभ एवढा भाव मिळवून देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी आपले आश्वासन पाळावे, अशी अपेक्षा शेतकरी नेते राम नेवले यांनी व्यक्त केली. आम्ही खरेदीला तयार आहोतसरकारने जाहीर केलेल्या हमीभावानुसार कापूस पणन महासंघ खरेदीला तयार आहे. मात्र सरकारकडून हिरवी झेंडी दाखविण्याची गरज आहे. राज्यात सरकार स्थापनेचा वाद अद्यापही सुटला नसल्याने, कदाचित डिसेंबरपर्यंत खरेदी केंद्र सुरू होईल, असे फेडरेशनकडून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)