शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

फाईल मंजुरीसाठी नगरसेवकांची धावपळ

By admin | Updated: May 29, 2016 03:07 IST

पुढील वर्षाच्या सुरुवातीला असलेली महापालिकेची निवडणूक विचारात घेता प्रभागातील कामे तातडीने मार्गी लागावी. यासाठी नगरसेवक कामाला लागले आहेत.

विरोधी सदस्यांची कोंडी : कामे करण्यासाठी चारच महिनेनागपूर : पुढील वर्षाच्या सुरुवातीला असलेली महापालिकेची निवडणूक विचारात घेता प्रभागातील कामे तातडीने मार्गी लागावी. यासाठी नगरसेवक कामाला लागले आहेत. प्रभागातील रस्ते, सिवर लाईन,पावसाळी नाल्या व उद्यान अशी कामे डिसेंबरपूर्वी पूर्ण करावयाची असल्याने नगरसेवकांची फाईल मंजुरीसाठी महापालिकेत धावपळ सुरू आहे. निवडणुकीपूर्वीचे वर्ष असल्याने डिसेंबरपूर्वी विकास कामे व्हावी. या हेतूने स्थायी समितीचे अध्यक्ष बंंडू राऊ त यांनी अनेक वर्षानंतर मार्च महिन्यात महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला होता. एप्रिलपासून अर्थसंकल्पातील प्रस्तावित कामांना सुरुवात करण्याचा त्यांचा विचार होता. परंतु आयुक्तांनी नवीन अर्थसंकल्पांला मंजुरी देण्याला विलंब केला. त्यामुळे दीड-दोन महिन्याचा कालावधी असाच निघून गेला. स्थायी समितीने प्रभागातील कामांना मंजुरी दिली. परंतु अर्थसंकल्पाला मंजुरी मिळण्याला विलंब झाल्याने अद्याप या कामांना सुरुवात झालेली नाही. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश सिंगारे यांच्या कार्यकाळात मंजुरी दिलेली ३०० कोटींची कामे निधी अभावी सुरू करता आलेली नव्हती. उपलब्ध निधीनुसार ही कामे मार्गी लावली जात आहेत. यातील अनेक कामे प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. सभागृहात अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर सभेचे इतिवृत्त तयार करणे, अर्थसंकल्पात सुचविण्यात आलेले बदल यात आयुक्तांची मंजुरी मिळण्याला विलंब झाला.(प्रतिनिधी)विरोधी सदस्यांची कोंडीराज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली. कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेतन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे उपलब्धतेनुसार विकास कामासाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सत्ताधारी भाजप नगरसेवकांची कामे प्राधान्याने मार्गी लागत आहेत. राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यात प्राप्त ३५ कोटींच्या ३२ पैकी २८ प्रस्ताव सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागातील मंजूर करण्यात आले होते. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी सदस्यांची कोंडी केली जात आहे. चारच महिन्यांचा कालावधीडिसेंबरमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे प्रभागातील कामे करण्यासाठी सहा महिन्यांचाच कालावधी शिल्लक असला तरी पावसाळ्यातील दोन महिने कामे बंद असतात. त्यामुळे विकास कामांसाठी चारच महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने अनेक नगरसेवकांची चिंता वाढली आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत अकार्यक्षम नगरसेवकाला पुन्हा संधी दिल्यास पक्षाच्या इतर तीन सदस्यांना याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.