शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
5
Irani Cup 2025 : मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
6
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
7
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
8
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
9
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
10
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
11
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
12
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
13
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
14
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
15
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
16
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
17
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
18
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
19
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
20
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?

फाईल मंजुरीसाठी नगरसेवकांची धावपळ

By admin | Updated: May 29, 2016 03:07 IST

पुढील वर्षाच्या सुरुवातीला असलेली महापालिकेची निवडणूक विचारात घेता प्रभागातील कामे तातडीने मार्गी लागावी. यासाठी नगरसेवक कामाला लागले आहेत.

विरोधी सदस्यांची कोंडी : कामे करण्यासाठी चारच महिनेनागपूर : पुढील वर्षाच्या सुरुवातीला असलेली महापालिकेची निवडणूक विचारात घेता प्रभागातील कामे तातडीने मार्गी लागावी. यासाठी नगरसेवक कामाला लागले आहेत. प्रभागातील रस्ते, सिवर लाईन,पावसाळी नाल्या व उद्यान अशी कामे डिसेंबरपूर्वी पूर्ण करावयाची असल्याने नगरसेवकांची फाईल मंजुरीसाठी महापालिकेत धावपळ सुरू आहे. निवडणुकीपूर्वीचे वर्ष असल्याने डिसेंबरपूर्वी विकास कामे व्हावी. या हेतूने स्थायी समितीचे अध्यक्ष बंंडू राऊ त यांनी अनेक वर्षानंतर मार्च महिन्यात महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला होता. एप्रिलपासून अर्थसंकल्पातील प्रस्तावित कामांना सुरुवात करण्याचा त्यांचा विचार होता. परंतु आयुक्तांनी नवीन अर्थसंकल्पांला मंजुरी देण्याला विलंब केला. त्यामुळे दीड-दोन महिन्याचा कालावधी असाच निघून गेला. स्थायी समितीने प्रभागातील कामांना मंजुरी दिली. परंतु अर्थसंकल्पाला मंजुरी मिळण्याला विलंब झाल्याने अद्याप या कामांना सुरुवात झालेली नाही. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश सिंगारे यांच्या कार्यकाळात मंजुरी दिलेली ३०० कोटींची कामे निधी अभावी सुरू करता आलेली नव्हती. उपलब्ध निधीनुसार ही कामे मार्गी लावली जात आहेत. यातील अनेक कामे प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. सभागृहात अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर सभेचे इतिवृत्त तयार करणे, अर्थसंकल्पात सुचविण्यात आलेले बदल यात आयुक्तांची मंजुरी मिळण्याला विलंब झाला.(प्रतिनिधी)विरोधी सदस्यांची कोंडीराज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली. कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेतन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे उपलब्धतेनुसार विकास कामासाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सत्ताधारी भाजप नगरसेवकांची कामे प्राधान्याने मार्गी लागत आहेत. राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यात प्राप्त ३५ कोटींच्या ३२ पैकी २८ प्रस्ताव सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागातील मंजूर करण्यात आले होते. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी सदस्यांची कोंडी केली जात आहे. चारच महिन्यांचा कालावधीडिसेंबरमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे प्रभागातील कामे करण्यासाठी सहा महिन्यांचाच कालावधी शिल्लक असला तरी पावसाळ्यातील दोन महिने कामे बंद असतात. त्यामुळे विकास कामांसाठी चारच महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने अनेक नगरसेवकांची चिंता वाढली आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत अकार्यक्षम नगरसेवकाला पुन्हा संधी दिल्यास पक्षाच्या इतर तीन सदस्यांना याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.