शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

मनपाची वृक्ष समिती अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:07 IST

नागपूर : अजनी वन संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करणाऱ्या ॲड. श्वेता बुरबुरे व छायाचित्रकार ...

नागपूर : अजनी वन संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करणाऱ्या ॲड. श्वेता बुरबुरे व छायाचित्रकार अजय तिवारी यांनी महानगरपालिकेची वृक्ष समिती अवैध असल्याचा दावा केला आहे.

या दोघांनी नवीन माहितीच्या आधारे जनहित याचिकेत दुरुस्ती करण्याची उच्च न्यायालयाला परवानगी मागितली आहे. त्यासंदर्भातील अर्जात यासह विविध मुद्दे उचलण्यात आले आहेत. मनपाची वृक्ष समिती २९ ऑगस्ट २०१७ रोजी स्थापन करण्यात आली असून, या समितीत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे सखोल ज्ञान असलेल्या अशासकीय प्रतिनिधीचा समावेश करणे आवश्यक आहे. परंतु, वर्तमान समितीत असा एकही प्रतिनिधी नाही. सर्व प्रतिनिधी राजकीय आहेत. ते वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे ज्ञान नसताना याविषयीचे निर्णय घेत आहेत. उच्च न्यायालयाने ‘रोहित जोशी’ प्रकरणात दिलेल्या आदेशानुसार ही समिती अवैध आहे. त्यामुळे समितीने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही. याशिवाय महाराष्ट्र वृक्ष कायद्यामध्ये सुधारणा प्रस्तावित असून, राज्य सरकारने त्यासंदर्भात २४ जून २०२१ रोजी अधिसूचना जारी केली आहे. नवीन कायद्यात मनपाच्या वृक्ष समितीला वृक्षाविषयीच्या प्रकरणावर निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्याकरिता राज्य वृक्ष समिती स्थापन केली जाणार आहे. करिता मनपाच्या वृक्ष समितीला अजनी वनाशी संबंधित प्रकरणांवर निर्णय घेण्यापासून थांबविणे आवश्यक आहे, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

-------------------

वृक्ष प्रत्यारोपण केवळ धूळफेक

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने अजनी वनातील ४ हजार ९३० झाडांच्या प्रत्यारोपणासाठी १५ मे २०२१ रोजी मनपाच्या वृक्ष समितीकडे अर्ज सादर केला आहे. परंतु, मनपाच्या गणनेनुसार संबंधित परिसरात ६ हजार ९५५ झाडे आहेत. तसेच, नवीन वृक्ष कायद्यानुसार, झाडांचे प्रत्यारोपण त्याच ठिकाणी किंवा नजीकच्या सार्वजनिक जमिनीवर करणे आवश्यक आहे. महामार्ग प्राधिकरणच्या अर्जात याविषयी स्पष्टता नाही. त्यावरून वृक्ष प्रत्यारोपणाचा अर्ज केवळ धूळफेक असल्याचे स्पष्ट होते, असे याचिकाकर्त्यांनी अर्जात म्हटले आहे.

-----------------------

जमीन हस्तांतरण बेकायदेशीर

इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पाकरिता रेल्वे प्रशासनाद्वारे महामार्ग प्राधिकरणला अजनी येथील ४४६ एकर जमीन हस्तांतरित केली जाणार आहे. यासंदर्भातील करारानुसार, हे हस्तांतरण थेट होणार आहे. सुरुवातीला ४५ वर्षांची व त्यानंतर ९९ वर्षांची लीज राहणार आहे. परंतु, कायद्यानुसार नोंदणीकृत दस्तावेजाशिवाय जमीन हस्तांतरण होऊ शकत नाही. परिणामी, संबंंधित करारावर अंमलबजावणी होऊ शकत नाही, याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले आहे.