शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

‘कोरोना’वर गाजणार मनपाची महासभा! २० जूनला सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 19:47 IST

प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध न झाल्याने नागरिकांना होत असलेला त्रास व क्वारंटाईन सेंटरवर सुविधांचा अभाव असल्याबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी, अशा मुद्यावरून प्रशासनाला जाब विचारण्याची नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी तयारी केली आहे. यामुळे २० जूनला होणारी मनपाची सर्वसाधारण सभा ‘कोरोना’वर गाजणार असल्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देप्रतिबंधित क्षेत्र व क्वारंटाईन केंद्रांवरील गैरसोयींबाबत जाब विचारणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार नागपूर शहरातील कोरोनाची परिस्थिती हाताळल्याने संसर्ग आटोक्यात ठेवल्याचा मनपा प्रशासनाचा दावा आहे. तर प्रशासनाने पदधिकाऱ्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध न झाल्याने नागरिकांना होत असलेला त्रास व क्वारंटाईन सेंटरवर सुविधांचा अभाव असल्याबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी, अशा मुद्यावरून प्रशासनाला जाब विचारण्याची नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी तयारी केली आहे. यामुळे २० जूनला होणारी मनपाची सर्वसाधारण सभा ‘कोरोना’वर गाजणार असल्याचे संकेत आहेत.तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून मनपा प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. मोमिनपुरा येथील कत्तलखाना सुरू असल्याने संसर्ग वाढल्याचा दावा आरोग्य विभागातील अधिकाºयांनी केला होता. तर मनपा प्रशासनाच्याच परवानगीने हा कत्तलखाना सुरू असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. कोरोनासंदर्भात नोटीस बजावली असून ती कामकाजात समाविष्ट करण्यात आली आहे.क्वारंटाईन सेंटरवरील नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. कोरोनाची लागण झालेले आणि न झालेल्यांना एकाच ठिकाणी ठेवले गेले. सामूहिक शौचालयामुळे संसर्गाचा निर्माण झालेला धोका, सुरुवातीला अन्नात अळ्या निघाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. यामुळे मनपाची झालेली बदनामी, मनपा आयुक्त हे कुणाचेही ऐकत नाहीत, निर्णय प्रक्रियेत पदाधिकाºयांना विश्वासात घेत नाहीत, त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचा इशारा सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने संयुक्त पत्रकार परिषदेतून दिला होता. याचे पडसाद सर्वसाधारण सभेत दिसणार आहेत. तसेच शहरातील कचरा संकलन, रखडलेली विकास कामे, सफाई कर्मचाºयांचे वेतन व नियुक्ती अशा मुद्यावरून नगरसेवक आक्रमक आहेत.भट सभागृहात प्रथमच महासभाकोरोना संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून महापालिकेची एकही सर्वसाधारण सभा झाली नाही. नियमानुसार प्रत्येक महिन्यात एक सभा होणे अपेक्षित आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यापासून चित्र सर्वसामान्य होत आहे. तरी सोशल डिस्टन्सिंग हा महत्त्वाचा भाग असल्यामुळे प्रथमच कविवर्य सुरेश भट सभागृहात महासभा आयोजित करण्यात आलेली आहे. महापालिकच्या महाल स्थित टाऊन हॉलमध्ये ही सभा होत असते.वाहतूक कोंडीचा तिढा सुटणारशहरात पार्किंग व्यवस्था नसल्याने अस्ताव्यस्त अशी वाहने उभी करण्यात येतात. परिणामी, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी महापालिकेने मे. यू.एम.टी.सी., हैदराबाद येथील कंपनीला शहरातील पार्किंग व्यवस्थेबाबत सर्वेक्षण करून पार्किंग व्यवस्थापनेचा आराखडा सादर करण्यास सागितले होते. त्यानुसार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा आराखडा मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका