शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

करवसुलीसाठी मनपाचा ‘ढोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:44 IST

तिजोरी रिकामी असल्याने महापालिकेचे बजेट बिघडले आहे. त्यातच मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीचा आकडा ४५२ कोटींवर पोहोचला आहे.

२० मोठ्या थकबाकीदारांच्या घरासमोर करणार ‘गांधीगिरी’ : ८ आॅगस्टला मालमत्ताही जप्त करणार लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तिजोरी रिकामी असल्याने महापालिकेचे बजेट बिघडले आहे. त्यातच मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीचा आकडा ४५२ कोटींवर पोहोचला आहे. विकास कामांचा ढोल वाजवताना येत्या निवडणुकांना पुढे जाण्यासाठी शहरात प्रत्यक्ष विकासाची गरज आहे. तिजोरीत पैसा आल्यावरच विकासाची गाडी सुपरफास्ट धावेल हे सत्तापक्ष आणि प्रशासनाला माहिती आहे. त्यामुळे आता बड्या थकबाकीदारांकडून करवसूलीसाठी मनपा प्रशासनाने अनोखी ‘गांधीगिरी’ करण्यात येणार आहे. थकबाकीदारांचे कान टवकारावे यासाठी मनपा त्यांच्या घरापुढे ढोल वाजविणार आहे. करवसुलीसाठी १७ जुलै ते ८ आॅगस्ट दरम्यान मालमत्ता व पाणी कर अभय योजना राबविली जात आहे. या योजनेला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु आजवरचा अनुभव विचारात घेता काही थकबाकीदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यास ८ आॅगस्टला त्यांची मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी दहा झोनमधील २० मोठ्या थकबाकीदारांच्या घरापुढे वा व्यावसायिक प्रतिष्ठांनापुढे ढोल वाजवून त्यांना थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात येईल. झोन सभापती व जलप्रदाय समितीचे सभापती यांच्या नेतृत्वात ही ‘गांधीगिरी’करण्यात येणार असल्याची माहिती सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. मालमत्ता कराची व पाणीपट्टीची सर्वाधिक थकबाकी असलेल्या झोनमधील प्रत्येकी १० अशा २० बड्या थकबाकीदारांचा यात समावेश आहे. सभापतींच्या नेतृत्वात त्यांच्या घरापुढे ढोल वाजवला जाणार आहे. यावेळी लाऊ ड स्पिकरवरून थकबाकीदाराला थक बाकी भरण्याचे आवाहन करण्यात येईल. ढोल वाजविण्याचा कार्यक्रम एक तासाचा राहणार आहे. त्यानंतर थकबाकीदाराला गुलाबाचे फूल देण्यात येईल. यामुळे परिसरातील लोकांना थकबाकीदारांची नावे कळतील. शहर विकासात थकबाकीदार आडकाठी आणत असल्याची जाणीव लोकांना व्हावी, हा यामागील हेतू असल्याचे जोशी यांनी सांगितले. यात शहरातील नामांकित मॉल, प्रतिष्ठित संस्था व व्यक्तींचा समावेश आहे. शासकीय कार्यालयांकडेही मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. यात वसुलीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अनेक कार्यालयाकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. नासुप्र व काही अन्य संस्थांकडे असलेल्या थकबाकीचे बूक समायोजन करण्यात येणार आहे. एम्प्रेस मॉलवर सर्वाधिक थकबाकी आहे. जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे यांच्या नेतृत्वात एम्प्रेस मॉलपुढे ढोल वाजवला जाणार आहे. धनादेश न वटल्यास गुन्हा दाखलगेल्यावेळी थकबाकीदारांसाठी योजना राबविण्यात आली होती. यात काही थकबाकीदारांनी धनादेश दिले होते. परंतु यातील काही धनादेश अजूनही वटलेले नाही. अशा लोकांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी त्यांना ८ आॅगस्टपर्यंत रक्कम भरण्याची संधी आहे. देयकाची प्रतीक्षा करू नकामालमत्ता कर दरवर्षी सारखाच असतो. त्यामुळे मालमत्ताधारकांना देयक मिळालेले नसेल तरी त्यांनी आजवर आकारण्यात येत असलेल्या क राइतकीच रक्कम त्यांना भरावयाची आहे. त्यामुळे करदात्यांनी देयकाची प्रतीक्षा न करता कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मालमत्तांचा लिलाव करणारदहा झोनमधील मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. महापालिकेचे उपायुक्त रवींद्र देवतळे यांच्या नेतृत्वात थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अभय योजनेच्या कालावधीत थकबाकीदारांनी थकबाकी न भरल्यास त्यांच्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. यासाठी मालमत्ता व पाणीपट्टीची सर्वाधिक थकबाकी असलेल्या २० जणांचा यात समावेश असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.पहिल्याच दिवशी १.१६ कोटींची वसुलीअभय योजनेला सोमवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सर्व झोनमधील ११०८ मालमत्ताधारकांनी ७६ लाख १२ हजार रुपयांची थकबाकी भरली. पाणीपट्टी थकीत असलेल्या १२०२ ग्राहकांनी ४०लाख २४ हजार ४१८ रुपयांची थकबाकी भरली. अशी एकूण १ कोटी १६ लाख ५२ हजारांची वसुली झाली.