शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कचराघर झालेल्या विहिरींच्या स्वच्छतेकडे मनपाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:07 IST

नागपूर : दरवर्षी उन्हाळ्यात हाेणारी भीषण पाणीटंचाईची समस्या साेडविण्यासाठी शहरातील विहिरी लाभदायक ठरू शकतात. मात्र, महापालिका प्रशासन या विहिरींच्या ...

नागपूर : दरवर्षी उन्हाळ्यात हाेणारी भीषण पाणीटंचाईची समस्या साेडविण्यासाठी शहरातील विहिरी लाभदायक ठरू शकतात. मात्र, महापालिका प्रशासन या विहिरींच्या स्वच्छतेबाबत फारसे गंभीरतेने घेत नाही. गाेपालनगरातील विहिरीबाबत हेच दिसून येत आहे. कचराघर झालेली ही विहीर स्वच्छ व्हावी म्हणून नागरिक गेल्या दाेन वर्षांपासून मागणी करीत आहेत; पण मनपाचे लक्ष्मीनगर झाेन प्रशासन त्याकडे कानाडाेळा करीत आहेत.

गाेपालनगर येथे असलेली ही सार्वजनिक विहीर गंगाधरराव फडणवीस यांनी बांधली हाेती. वस्तीतील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा हा यामागचा उद्देश हाेता आणि त्यावेळी त्याचा लाभही झाला. मात्र नळ लाईननंतर विहिरींची उपेक्षा झाली. उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करताना विहिरीमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळताे. मात्र, हळूहळू त्या विहिरी कचरा फेकण्याचे स्थान झाले. आतातर विहिरीत कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. पाण्याची गरज लक्षात घेत नागरिकांनी ही विहीर स्वच्छ व्हावी म्हणून प्रयत्न चालविले. नगरसेवकांची भेट घेतली, लक्ष्मीनगर झाेनमध्येही निवेदन सादर केले आणि जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेऊन समस्या मांडली. मात्र नगरसेवकांनी दुर्लक्ष केले, तर जलप्रदाय व लक्ष्मीनगर झाेनच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बाेट दाखवत टाळाटाळ केली. माजी महापाैर नंदा जिचकार यांनीही लक्ष दिले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या दाेन वर्षांपासून नागरिकांचा विहीर स्वच्छतेसाठी संघर्ष सुरू आहे; पण मनपा प्रशासनाकडून अवहेलना केली जात असल्याचे स्थानिक रहिवासी नीळकंठ माेकदम यांनी सांगितले. विहिरीत कचरा साचल्याने डासांचा प्रकाेप आणि दुर्गंधीची समस्याही वाढली आहे. त्यामुळे ही विहीर त्वरित स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.