शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

कचराघर झालेल्या विहिरींच्या स्वच्छतेकडे मनपाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:07 IST

नागपूर : दरवर्षी उन्हाळ्यात हाेणारी भीषण पाणीटंचाईची समस्या साेडविण्यासाठी शहरातील विहिरी लाभदायक ठरू शकतात. मात्र, महापालिका प्रशासन या विहिरींच्या ...

नागपूर : दरवर्षी उन्हाळ्यात हाेणारी भीषण पाणीटंचाईची समस्या साेडविण्यासाठी शहरातील विहिरी लाभदायक ठरू शकतात. मात्र, महापालिका प्रशासन या विहिरींच्या स्वच्छतेबाबत फारसे गंभीरतेने घेत नाही. गाेपालनगरातील विहिरीबाबत हेच दिसून येत आहे. कचराघर झालेली ही विहीर स्वच्छ व्हावी म्हणून नागरिक गेल्या दाेन वर्षांपासून मागणी करीत आहेत; पण मनपाचे लक्ष्मीनगर झाेन प्रशासन त्याकडे कानाडाेळा करीत आहेत.

गाेपालनगर येथे असलेली ही सार्वजनिक विहीर गंगाधरराव फडणवीस यांनी बांधली हाेती. वस्तीतील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा हा यामागचा उद्देश हाेता आणि त्यावेळी त्याचा लाभही झाला. मात्र नळ लाईननंतर विहिरींची उपेक्षा झाली. उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करताना विहिरीमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळताे. मात्र, हळूहळू त्या विहिरी कचरा फेकण्याचे स्थान झाले. आतातर विहिरीत कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. पाण्याची गरज लक्षात घेत नागरिकांनी ही विहीर स्वच्छ व्हावी म्हणून प्रयत्न चालविले. नगरसेवकांची भेट घेतली, लक्ष्मीनगर झाेनमध्येही निवेदन सादर केले आणि जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेऊन समस्या मांडली. मात्र नगरसेवकांनी दुर्लक्ष केले, तर जलप्रदाय व लक्ष्मीनगर झाेनच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बाेट दाखवत टाळाटाळ केली. माजी महापाैर नंदा जिचकार यांनीही लक्ष दिले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या दाेन वर्षांपासून नागरिकांचा विहीर स्वच्छतेसाठी संघर्ष सुरू आहे; पण मनपा प्रशासनाकडून अवहेलना केली जात असल्याचे स्थानिक रहिवासी नीळकंठ माेकदम यांनी सांगितले. विहिरीत कचरा साचल्याने डासांचा प्रकाेप आणि दुर्गंधीची समस्याही वाढली आहे. त्यामुळे ही विहीर त्वरित स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.