शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

‘कोरोना’चा ‘सोशल फोबिया’; ‘सोशल मीडिया’वर डोळे मिटून विश्वास नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 11:42 IST

मानसिक पातळीवर ‘कोरोना’चा सामना करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले असून शहरातील काही मानसोपचारतज्ज्ञांकडे रुग्णदेखील येण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देमानसोपचारतज्ज्ञांचा घेत आहेत सल्ला 

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरात थैमान घालणाऱ्या व महामारीचे कारण ठरणाऱ्या ‘कोरोना’चे उपराजधानीत तीन ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण सापडले आहेत. यासंदर्भात जनजागृती सुरू असली ‘कोरोना’चा अनेकांनी फार जास्त धसका घेतला आहे.काही जणांमध्ये अक्षरश: ‘फोबिया’ निर्माण झाला असून ‘सोशल मीडिया’च्या उलटसुलट ‘पोस्ट’मुळे तर भीती आणखी वाढत आहे. मानसिक पातळीवर ‘कोरोना’चा सामना करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले असून शहरातील काही मानसोपचारतज्ज्ञांकडे रुग्णदेखील येण्यास सुरुवात झाली आहे. ‘लोकमत’ने वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोरोना’मुळे जगभरात महामारी घोषित केली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या मनात धास्ती भरणे अगदीच सामान्य आहे. मात्र ही धास्ती ज्यावेळी सर्व गोष्टींवर हावी होऊ लागते व दैनंदिन जीवनमानात प्रत्येक गोष्टीकडे त्याच नजरेने पाहिले जाते, तेव्हा नक्कीच मानसिक पातळीवर समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. अशा वेळी संबंधित व्यक्तीशी संवाद साधणे व त्याच्यात विश्वास निर्माण करणे ही बाब फार महत्त्वाची ठरते. यासाठी जवळच्या लोकांनी वेळीच पुढाकार घ्यावा.

सोशल मिडियामुळे वाढतेय धास्ती‘कोरोना’बाबत ‘सोशल मीडिया’मुळे जास्त दहशत पसरत असल्याचे चित्र आहे. ‘कोरोना’ नेमका कशामुळे होतो व याची लक्षणे काय आहे याबाबत बऱ्याच चुकीच्या गोष्टी पसरविल्या जात आहेत. त्यामुळे काही दिवस तरी ‘सोशल मीडिया’वर ‘कोरोना’शी संबंधित ‘पोस्ट’ टाळणेच योग्य राहील. जर नेमकी माहिती हवी असेल तर जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर योग्य माहिती उपलब्ध आहे, असे डॉ. सुधीर भावे यांनी प्रतिपादन केले.कशी ओळखावी लक्षणे?‘कोरोना’मुळे एखादा व्यक्ती मानसिक पातळीवर फारच घाबरला आहे हे ओळखणे फारच महत्त्वाचे असते. ‘कोरोना’चा विषाणू माझ्या आजूबाजूला तर कुठे नाही ना याचाच विचार त्या व्यक्तीचा मनात असतो. अगदी भाजीबाजारात गेल्यावरदेखील तेच विचार असतात. लवकर झोप येत नाही. घाबरल्यासारखे वाटते अन् छातीत धडधड होते. मागील आठवड्यात आलेला एक व्यक्ती तर दिवसभर ‘मास्क’ लावून राहायचा अन् दर १० मिनिटांनी ‘सॅनिटायझर’चा उपयोग करायचा. एका रुग्णाला तर चक्क ‘पॅनिक अटॅक’देखील आला. याला तांत्रिकदृष्ट्या ‘इलनेस एन्झायटी डिसॉर्डर’ असे म्हणतात. एखादा व्यक्ती गरजेपेक्षा जास्त घाबरत असेल तर त्याच्या नजीकच्या व्यक्तींनी तात्काळ वैद्यकीय तज्ज्ञांकडे घेऊन जावे, असे डॉ. भावे यांनी सांगितले.

संवाद सर्वात महत्त्वाचा‘कोरोना’सारख्या आजारापासून भीती वाटणे स्वाभाविक आहे. जर गरजेपेक्षा जास्त घाबरणारा कोणी आढळला तर त्याच्यावर दोन पद्धतीने उपचार करता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संवाद व समुपदेशन. अशाप्रकारे घाबरणारा तू एकटाच नाही व हे सर्व स्वाभाविक आहे असे त्याला सांगायला हवे. शिवाय त्याच्या मनातील नेमकी काळजी संवादातून समोर यायला हवी. यासाठी समुपदेशकांची मदत घेता येते. एखादा रुग्ण फारच जास्त प्रमाणात ‘इलनेस एन्क्झायटी डिसॉर्डर’ने ग्रस्त असेल तर त्याला तात्पुरती काही औषधे देता येतात. जर कुणाला अशी लक्षणे असतील तर त्यांनी भरवसा असलेल्या व्यक्तीजवळ मन मोकळे करावे. शिवाय ज्याच्याशी सहज बोलता येईल अशा डॉक्टरांशीदेखील चर्चा करावी, असा सल्ला डॉ. सुधीर भावे यांनी दिला.

 

टॅग्स :corona virusकोरोना