शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

कोरोनाने मरेन पण गावभर फिरेन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:08 IST

नागपूर : किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, बेकरी आदी दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्बंध असल्याने लोकांची खरेदीसाठी ...

नागपूर : किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, बेकरी आदी दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्बंध असल्याने लोकांची खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी दिसून येत आहे. यादरम्यान अनेकजण मास्कचा उपयोग करीत नाहीत. त्यामुळे कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. काही नागरिक काम नसतानाही फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. कोरोनाने मरेन पण गावभर फिरेन, असे काहीसे चित्र दिसून येत आहे.

नागपुरातील इतवारी, मस्कासाथ, गोळीबार चौक, गांधीबाग, सक्करदरा, नंदनवन या परिसराची पाहणी केली असता या भागातील दुकानांमध्ये ग्राहकांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. इतवारी ठोक किराणा बाजारात सकाळी ७ वाजेपासून किरकोळ किराणा दुकानदार आणि नागरिक खरेदीसाठी येतात. हीच स्थिती शहरातील विविध भागातील किराणा दुकानांची आहे. आधी वस्तू मिळाव्यात म्हणून नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाही. याशिवाय दूध डेअरी व बेकरींमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळते. दुकाने ११ वाजता बंद होत असल्याने लोक खरेदीसाठी तुटून पडतात. यावेळी सर्वजण मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत नाहीत. याकडे प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांसह दुकानदारही बेफिकिरीने वागत आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा लॉकडाऊनचे नवे संकट उभे ठाकले आहे. लॉकडाऊन प्रशासन आणि सामान्य नागरिकांपैकी कुणालाही परवडणारे नसल्याने नागरिकांनी मास्क व सामाजिक दुराव्याचे पालन करणे हा एकमेव उपाय आहे.

भाजी बाजारात खरेदीसाठी गर्दी

सकाळी सक्करदरा, रमणा मारोती व नंदनवन परिसरातील भाजी बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. विक्रेत्यांनीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता जवळजवळ दुकाने थाटली होती. त्यामुळे विक्रेत्यांकडे जास्त गर्दी होती. अशा गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची जास्त शक्यता दिसून आली. अशावेळी विक्रेत्यांना सांगायला मनपाचे कर्मचारी येत नाहीत. ११ वाजले की पोलीस दुकाने बंद करण्यासाठी फेऱ्या मारतात. एवढेच काम पोलीस करतात. प्रशासनाने लॉकडाऊन तर लावले, पण नियमांचे पालन आणि लोकांना शिस्त लावायला कुणीही पुढे येत नाहीत. शासकीय यंत्रणाही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आणि व्यापारी, व्यावसायिकांचे नुकसान टाळण्यासाठीच उपाययोजना करीत आहे. पण, नागरिकांना त्याचे महत्त्व कळत नसल्याचे दिसून येत आहे.

कळमना व कॉटन मार्केटमध्ये नियमांचे उल्लंघन

कळमना व कॉटन मार्केट भाजी बाजारात सकाळी दररोज शेकडो ग्राहक आणि किरकोळ विक्रेते येतात. गर्दीमुळे कळमना बाजारात लॉकडाऊन असल्याचे दिसून येत नाही. या बाजारात सकाळी जवळपास ५ ते ६ हजार लोक एकत्र असतात. या बाजारातून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी आहेत. कळमन्यात प्रशासक केबिनबाहेर पडत नसल्याने गर्दीवर कोण नियंत्रण मिळविणार, हा गंभीर प्रश्न आहे. हीच स्थिती फळे बाजाराची आहे. फळांच्या लिलावादरम्यान शेकडो ग्राहक व व्यापाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करीत नेहमीच्या सवयीनुसार वागत आहेत. कळमना बाजार १५ दिवसांसाठी बंद करावा, अशी मागणी अडतिया आणि व्यापाऱ्यांची आहे.