शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

कोरोना लसीकरण ठरविणार, शाळा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शासनाने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती ...

नागपूर : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शासनाने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती दिली आहे. आता पुढचे सत्र २६ जूनपासून सुरू होणार आहे. परंतु यावर्षीही कोरोनामुळे शाळा २६ जून रोजी सुरू होणे कठीण आहे. सध्याची स्थिती बघता कोरोना लसीकरणानंतरच शाळा सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

गेल्या वर्षभरापासून प्राथमिक शाळा बंदच आहेत. मोजकेच दिवस माध्यमिक व उच्च माध्यमित शाळेचे वर्ग भरले होते. त्यामुळे शाळांनी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला होता. पण शाळांना विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अवघड ठरले, अखेर शासनाने विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला. आता २६ जून रोजी नवीन शैक्षणिक सत्राला सुरूवात होणार आहे.

परंतु सद्या जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता आणि तिसऱ्या लाटेबाबत वैद्यकीय क्षेत्रातून मिळालेल्या अलर्टनुसार शाळा सुरू होणे शक्य नाही. एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. शासनाने दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. यात मोठ्या संख्येने शिक्षकांनी लसीकरण करून घेतले. त्यानंतर शासनाने १८ वर्षावरील लसीकरणाचा निर्णय घेतला. परंतु राज्यात पडलेला लसींचा तुटवड्यामुळे १८ वर्षावरील लसीकरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. अजूनही अनेक शिक्षक लसीकरणापासून वंचित आहे. तिसरी लाटेत बालकांना संसर्ग होईल, असे बोलले जात आहे. पण बालकांच्या लसीकरणाबाबत कुठलेही निर्देश नाही. अशात शाळा सुरू करणे अवघडच होणार आहे.

- शिक्षण तज्ज्ञ म्हणतात...

तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग वाढेल असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण काही कमी झालेले नाही. त्यामुळे शाळा सुरू करताना सर्वच बाजूने विचार करावा लागणार आहे. शिक्षण विभाग त्यावेळची परिस्थिती बघूनच निर्णय घेईल.

- ७१ हजारावर विद्यार्थी थेट दुसरीत

१) कोरोनामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता वर्गोन्नती देण्याचा शासनाने निर्णय घेतला.

२) जिल्ह्यात ७१ हजारावर विद्यार्थी पहिलीत प्रवेशित झाले होते. ते यावर्षी शाळेत न जाता थेट दुसरीत गेले. पण यंदाही शाळा सुरू झाल्या नाही तर ते थेट शाळेत न जाता तिसरीत जातील.

- काय म्हणतात विद्यार्थी, पालक अन् शिक्षक

- गेल्या वर्षी काहीच दिवस शाळेत जाता आले. आमचे वर्षभर ऑनलाईन वर्ग झाले. पण ऑनलाईन शिक्षणापेक्षा वर्गात शिकविलेले जास्त लक्षात राहते. त्यामुळे शाळा लवकर सुरू व्हावी, अशी आमची इच्छा आहे. पण कोरोनाचीही भिती असल्याचे पालक म्हणतात.

- समीक्षा कुरडकर, विद्यार्थिनी ()

- वर्षभरापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालक चिंताग्रस्त आहे. सद्या वैद्यकीय क्षेत्रातून तिसऱ्या लाटेबाबत जे सांगितले जात आहे, ते भीषण आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे संपूर्ण लसीकरण केल्याशिवाय शाळा सुरू करणे म्हणजे आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे.

मनोज चौरे, पालक ()

- कोरोनाने शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी क्षती निर्माण केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शाळा नियमित सुरू व्हावे असे मनोमन वाटत असले तरी जीवापेक्षा काहीच महत्त्वाचे नाही. म्हणून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण केल्याशिवाय शाळा सुरू करणे उचित ठरणार नाही.

- राम पिल्लेवान, सहा. शिक्षक, परमानंद विद्यालय, व्याहाड ()

- यंदा सत्र ऑनलाईन की ऑफलाईन

कोरोनामुळे गेल्यावर्षी ऑनलाईनसह ऑफलाईनसुद्धा अध्यापन झाले. यावर्षी शैक्षणिक सत्र लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यावर शिक्षकांचा भर असणार आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतरच ऑफलाईन वर्ग होऊ शकेल.