शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

कोरोना योद्ध्यांना रेल्वेत मिळेना कन्सेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:07 IST

आनंद शर्मा नागपूर : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून रेल्वे प्रशासनाकडून नियमित रेल्वेगाड्यांऐवजी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या रेल्वेगाड्यात प्रवाशांकडून ...

आनंद शर्मा

नागपूर : कोरोनामुळे मागील वर्षभरापासून रेल्वे प्रशासनाकडून नियमित रेल्वेगाड्यांऐवजी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या रेल्वेगाड्यात प्रवाशांकडून अधिक प्रवासभाडे आकारण्यात येत असून विविध श्रेणीत देण्यात येणाऱ्या कन्सेशनमध्येही कपात करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांचा जीव वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोरोना योद्धा म्हणजे डॉक्टर आणि नर्सलाही रेल्वेभाड्यात सूट दिली जात नसल्याची स्थिती आहे. एवढेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पत्रकारांनाही प्रवास भाड्यात सूट देण्यात येत नाही. यामुळे त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाच्या वतीने ३०० पेक्षा अधिक श्रेणीत सामील नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत देण्यात येते. परंतु वर्तमान काळात यात दिव्यांग, नेत्रहीन, कॅन्सरचे रुग्ण, मूकबधिर, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, सीआरपीएफ, जीआरपी, मिलिट्रीच्या जवानांसह इतर संबंधित प्रवाशांनाच कन्सेशनचा लाभ देण्यात येत आहे. तर ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नर्स, डॉक्टर, पत्रकारांसह इतर संबंधित प्रवाशांना कन्सेशनचा लाभ मिळत नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे वाहतूक सुरळीत होत आहे. अशा स्थितीत या श्रेणीतील प्रवाशांना कन्सेशनचा लाभ देण्याची मागणी रेल्वे प्रवासी करीत आहेत.

............

विशेष रेल्वेगाड्यांच्या नावावर लूट

कोरोनामुळे नियमित रेल्वेगाड्यांऐवजी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. यात प्रवाशांकडून अधिक प्रवासभाडे वसूल करण्यात येत असल्याच्या तक्रारी ऐकावयास येत आहेत. प्रवाशांच्या मते प्रवासभाडे वाढविले, परंतु त्या प्रमाणात सुविधा पुरविण्यात येत नाहीत. ब्रेक जर्नी म्हणजे कनेक्टिंग ट्रेनची तिकिटेही जारी करण्यात येत नाहीत.

प्रवाशांमध्ये रेल्वेने भेदभाव करू नये

रेल्वेच्या प्रवास भाड्यात सवलत देण्यात प्रवाशांमध्ये भेदभाव करण्यात येत आहे. विशेष रेल्वेगाड्यांच्या नावावर अधिक शुल्क वसूल करण्यात येत आहे. परंतु प्रवाशांना सुविधा पुरविण्यात येत नाहीत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे नियमित रेल्वेगाड्या चालवून प्रवाशांकडून कमी प्रवासभाडे घेऊन त्यांना सवलत देण्याबाबत त्वरित निर्णय घेण्याची गरज आहे.

-बसंत शुक्ला, सचिव, भारतीय यात्री केंद्र

हा धोरणात्मक निर्णय आहे

रेल्वे प्रवाशांना प्रवास भाड्यात सवलत देण्याचा निर्णय रेल्वे बोर्ड घेते. हा धोरणात्मक निर्णय आहे. नियमित रेल्वेगाड्या सुरु झाल्यानंतर सर्व श्रेणीतील प्रवाशांना सवलत मिळेल. विशेष रेल्वे गाड्यात अधिक प्रवास भाडे घेण्यात येत असल्याची बाब खरी नाही.

- एस.जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

.........