शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

व्यापारी व कर्मचाऱ्यांना १८ ऑगस्टपर्यंत कोरोना टेस्ट बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 22:23 IST

मनपाने नागपुरातील सर्व दुकानदार आणि तिथे कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी १८ ऑगस्टपर्यंत बंधनकारक केली आहे. १८ ऑगस्टनंतर दुकानदाराकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसल्यास दुकाने बंद करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे-तर दुकाने व प्रतिष्ठान बंद होणारमनपा आकस्मिक पाहणी करणार

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : मनपाने नागपुरातील सर्व दुकानदार आणि तिथे कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी १८ ऑगस्टपर्यंत बंधनकारक केली आहे. १८ ऑगस्टनंतर दुकानदाराकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र नसल्यास दुकाने बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व दुकानदारांनी स्वत:ची आणि कार्यरत कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करावी, असे आवाहन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी पत्रपरिषदेत केले. एनव्हीसीसी विदर्भातील १३ लाख व्यापाऱ्यांची संघटना आहे, हे विशेष.नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून मृत्यूची संख्याही वाढली आहे. बाजारपेठांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना वाढल्याचा मनपाला संशय आहे. त्या धर्तीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील सर्व दुकाने आणि प्रतिष्ठानांचे मालक व कार्यरत कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. १८ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांतर्फे आकस्मिक तपासणी करून चाचणीचे प्रमाणपत्र नसलेल्यांची दुकाने बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व दुकानदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. याकरिता मनपाने चार दिवसांपूर्वी नागपुरात झोननुसार २२ चाचणी सेंटर सुरू केले आहे. याशिवाय सर्व खासगी लॅबमध्ये परवडणाऱ्या किमतीत रॅपिड टेस्ट करता येईल. चाचण्या वाढल्याने फायदाच होईल, असे मेहाडिया यांनी स्पष्ट केले.कोरोना संसर्ग वाढू नये, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याकरिता व्यापाऱ्यांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. नागपुरात जवळपास ३० हजार दुकाने असून त्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहता ७० ते ८० हजार कोरोना चाचणी होणार आहे. मनपाने चार दिवसांपूर्वी आदेश काढला आहे. पाच दिवसात एवढ्या चाचण्या होणार नाहीत. कदाचित मनपा वेळ वाढवून देईल, पण व्यापाऱ्यांनी चाचण्या तातडीने करण्याची गरज आहे. मनपाचे अधिकारी दुकानात आल्यानंतर प्रमाणपत्र मागितल्यानंतर आणि दुकान बंद केल्यानंतर व्यापारी चाचणीकरिता धावाधाव करतील. पण त्यापूर्वीच कोरोना चाचणी करावी, असे आवाहन मेहाडिया यांनी केले. अशा प्रकारच्या चाचण्या पुणे आणि औरंगाबाद येथे सुरू असून तिथे रुग्णांची संख्या कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.एका प्रश्नाच्या उत्तरात मेहाडिया म्हणाले, शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतरच ऑड-इव्हन पद्धतीवर विचार करण्याचे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले आहे. दुकानदारांना मनपाने परवाना घेण्याच्या संदर्भात ते म्हणाले, मनपाच्या कायद्यांतर्गत ज्वलंतशील पदार्थांची विक्री करणाºया दुकानदारांना परवाना घेणे बंधनकारक आहे. चेंबरतर्फे कायद्यातील तरतुदी तपासून मनपा आयुक्तांना विस्तृत निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर स्थिती स्पष्ट होईल.पत्रपरिषदेत रामअवतार तोतला, संजय अग्रवाल, राजू माखिजा, फारुखभाई अकबानी, सचिन पुनियानी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका