शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोरोनाचा पुन्हा धोका; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा राधाकृष्णन बी यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 11:22 IST

Nagpur News कोरोना नियंत्रणासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे. यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. नियंत्रणासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे. यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी गुरुवारी वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांंना बैठकीत दिले.

सध्या क्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २,५०० पर्यंत झाली आहे. दररोज २०० ते ३०० बाधित होत आहेत. कोणत्याही परिस्थितीत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली पाहिजे. यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. मनपा आयुक्तांनी नागरिकांना सामाजिक अंतराचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. सोबतच त्यांनी कोरोना चाचणीची संख्या वाढविण्याचेही आदेश दिले. तसेच मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश उपद्रव शोध पथकाला दिले. बैठकीत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. टिकेश बिसेन आदी उपस्थित होते.

संपर्कात येणाऱ्यांनी चाचणी करावी

घरातील घरकाम करणाऱ्या महिला, दूध, भाजी विक्रेता, जेवण तयार करणारे, वाॅचमन, दुकानदारांची ज्यांचा कामानिमित्त असंख्य लोकांशी संपर्क येतो अशा सर्वांनी वेळोवेळी कोरोनाची चाचणी करावी, तसेच ज्या नागरिकांची रॅपिड न्टिजेन टेस्ट जर निगेटिव्ह आली परंतु त्यांना जर लक्षणे असतील तर त्यांची आरटीपीसीआर चाचणी त्याच केंद्रावर करण्यात यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

खासगी रुग्णालयांनी काळजी घ्यावी

खासगी रुग्णालयामध्ये भरती असलेल्या रुग्णांची प्रकृती जास्त बिघडली तर त्याला मेयो किंवा मेडिकल रुग्णालयात पाठविले जाते, असे निदर्शनास आले आहे. खासगी रुग्णालयांनी तसे न करता कोरोना रुग्णांची स्वत:च्या रुग्णालयात काळजी करायला पाहिजे आणि त्याच्यावर चांगले उपचार करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.

पोलीस आयुक्तांशी चर्चा

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांना मास्कचा वापर न करणारे, सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचे निवेदन केले. मिशन बिगीन अगेन लागू झाल्यानंतर नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे कमी केले आहे, त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पोलीस आयुक्तांनी याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

आयुक्तांचे आवाहन

-कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वत:चे योद्धा बना.

- घराबाहेर पडताना मास्क वापरा, सामाजिक अंतराचे पालन करा,

- वेळोवेळी हात स्वच्छ धुवा.

-ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडू देऊ नका.

- कोरोनाचा प्रसार रोखण्याची प्रशासन आणि नागरिकांनी जबाबदारी घ्यावी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या