शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

कोरोनामुळे पगारदारवर्ग संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST

नागपूर : देशातील पगारदारवर्गाला नेहमीच विविध आव्हानांना तोंड द्यावे लागते. कोरोनामुळे त्यांची परिस्थिती आता अधिकच गंभीर झाली आहे. ते ...

नागपूर : देशातील पगारदारवर्गाला नेहमीच विविध आव्हानांना तोंड द्यावे लागते. कोरोनामुळे त्यांची परिस्थिती आता अधिकच गंभीर झाली आहे. ते आर्थिक संकटात जगत आहेत.

पगारदारवर्गाचे वेतन महागाईच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे त्यांना बचत करता येत नाही. यातच त्यांना प्राप्तिकर व व्यावसायिक करही जमा करावा लागतो. विरोधाभास म्हणजे, शेतकरी कितीही श्रीमंत असला तरी त्यांना कर द्यावा लागत नाही. शहरातील एका प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंटने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळामध्ये पगारदारवर्गातील चार कोटी व्यक्तींनी कर जमा केला. सरकारने त्या रकमेतून स्थलांतरित मजुरांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या. असे असताना वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये पगारदारवर्गासाठी वजावटीची घोषणा केली नाही.

सार्वजनिक क्षेत्रापेक्षा खासगी क्षेत्रातील पगारदारवर्गाची संख्या मोठी आहे. ते कर भरतात, पण त्यांना निवृत्ती वेतन, बेरोजगारी साहाय्य किंवा सेवानिवृत्तीनंतर आरोग्य सेवा मिळत नाही. परंतु, त्यांना आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही कर भरणे बंधनकारक केले जाते. देशातील बॉलिवूड उद्याेग व राजकारणातील अनेक जण स्वत:ला शेतकरी घोषित करून अत्यल्प कर जमा करतात. त्यामुळे शेतीमधून वर्षाला १० लाख रुपयावर उत्पन्न मिळविणाऱ्याला कराच्या चौकटीत आणले गेले पाहिजे, असे मत सूत्रांनी व्यक्त केले.

देशातील मतदारांमध्ये पगारदारवर्गाची संख्या केवळ ७ टक्के आहे. राजकीय पक्ष त्यांचा गांभीर्याने विचार करीत नाही. त्यामुळे ही विसंगती निर्माण झाली आहे. सरकारच्या विरोधाभासी धोरणामुळे गेल्या काही वर्षांत प्रत्यक्षात कर जमा करणाऱ्यांच्या तुलनेत केवळ प्राप्तिकर अर्ज भरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२०-२१ मध्ये ३ कोटी ७५ लाख नागरिकांनी प्राप्तिकर अर्ज भरले, पण प्रत्यक्ष कर जमा करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. कोरोना काळात मागणी वाढली असली तरी बाजारामध्ये वस्तू व सेवेचा पुरवठा अद्याप सुरळीत झाला नाही. कारण, या काळात अनेकांची नोकरी गेली, असे सूत्रांनी सांगितले.

----------------

५० टक्के काम कमी केले

मॉल, सुपर बाजार, थिएटर, जीम इत्यादी छोट्या प्रतिष्ठानांमध्ये काम करणाऱ्यांना नोकरी गमवावी लागली तर, कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन २० ते ५० टक्के कमी झाले. काही ठिकाणी वेतनच थांबविण्यात आले. अनेक प्रतिष्ठानांनी त्यांचे काम ५० टक्क्यांनी कमी केले.

------ श्रीनिवास खांदेवाले, अर्थतज्ज्ञ

---------------

कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

असंघटित क्षेत्रातील पगारदारवर्ग खूप प्रभावित झाला. अनेकांना नोकरी गमवावी लागली. अनेकांचे वेतन बंद झाले. सेवा क्षेत्रातही समान परिस्थिती आहे.

---- प्रा. विनायक देशपांडे, एमबीए विभाग, रातुम नागपूर विद्यापीठ.