शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोरोना गेलेला नाही...तिसऱ्या लाटेला निमंत्रण नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लोट ओसरली असून, कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. १ जूनपासून निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली ...

नागपूर : जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लोट ओसरली असून, कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. १ जूनपासून निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असून पुढील काळ हा जनतेसाठी परीक्षेचा ठरणार आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांतच नागपुरातील बाजारपेठांमध्ये सकाळच्या सुमारात गर्दी दिसून आली. बुधवारी तर इतवारी, महालमधील रस्त्यांवर कोंडी दिसून आली. पहिल्या लाटेनंतर अनलॉकमध्ये जनतेचे नेमक्या काही चुका केल्या होत्या. त्यामुळे जनतेने या पाच चुका टाळण्याची अतिशय जास्त आवश्यकता असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ व प्रशासनातून व्यक्त होत आहे.

अनावश्यक गर्दी नको

पहिल्या लाटेदरम्यान निर्बंध शिथिल केल्यानंतर नागरिकांनी खरेदीसाठी तुफान गर्दी केली होती. कोरोनाच्या धोक्याची जाण न ठेवता कुटुंबेच्या कुटुंबे लहानसहान खरेदीसाठी बाहेर जात होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने झाला व दुसऱ्या लाटेत मोठे नुकसान झाले. तिसरी लाट टाळायची असेल तर अनावश्यक गर्दी टाळणे आवश्यक आहे. विशेषत: खरेदीसाठी घरातील एक व्यक्ती गेली तरी पुरेसे ठरू शकणार आहे.

मास्क घाला, थुंकणे टाळा

घराबाहेर निघाल्यानंतर मास्क घालणे आवश्यकच आहे. मात्र अनेकांनी बेफिकिरी दाखवत मास्क घातले नाही व बरेच जण हनुवटीखाली मास्क घालून फिरायचे. त्यामुळे अशा लोकांना कोरोनाचा लवकर संसर्ग झाला. अनेक जण बेजबाबदारपणे रस्त्यांवर थुंकताना दिसून येतात. यामुळे विषाणूचा फौलाव होण्याचा धोका असतो. शिवाय अशा लोकांमुळे इतरांनादेखील संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झालेच पाहिजे.

संयम पाळा, सोहळे टाळा

पहिल्या लाटेनंतर डिसेंबर महिन्यात लग्नसराईला तोबा गर्दी झाली होती व जानेवारी महिन्यानंतर रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. पुढील काहीकाळ सोहळे मोठ्या प्रमाणावर करणे टाळणे आवश्यक झाले आहे. घरगुती स्वरूपात होणाऱ्या लग्नसोहळ्यात किंवा इतर समारंभात आवश्यक तेवढेच लोक बोलविले पाहिजे. या समारंभातून कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असते.

लक्षणांकडे दुर्लक्ष नको

पहिली लाट ओसरल्यानंतर अनेकांनी कोरोना गेला असाच समज करून घेतला. कोरोनाची लक्षणे दिसल्यावरदेखील चाचणी करण्यास लोकांनी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनादेखील लागण झाली. चाचणी उशिरा झाल्याने उपचार वेळेत मिळाले नाही व अनेकांचा त्यामुळे मृत्यू झाला. सौम्य लक्षणे दिसली तरी लगेच चाचणी करणे आवश्यक आहे.

आउटिंगचा उत्साह आवरता घ्या

डिसेंबर-जानेवारी महिन्यात नागपुरात अनेक जणांनी सहलीचे आयोजन केले. देशातील इतर पर्यटन स्थळांवरदेखील गेले. असे करत असताना आवश्यक ती काळजी घेतली नाही. परिणामी अनेकांना त्यातून कोरोनाची लागण झाली. त्यामुळे काहीकाळ संयम ठेवून आउटिंगचा उत्साह आवरता घेतला पाहिजे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

पालिकेची ११ पथके

शहात कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे पालन होते का, याकडे लक्ष देण्यासाठी महापालिकेने झोननिहाय पथके नेमली आहेत. यात सुमारे १८० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पथकाने कडक निर्बंध असताना नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली. आता पुढेदेखील अशीच कारवाई सुरू ठेवली पाहिजे.

जिल्ह्यातील पहिला अनलॉक

जून २०२०

एकूण कोरोना रुग्ण - १,५०३

दुसरा अनलॉक

जून २०२१

एकूण कोरोना रुग्ण -४,७५०१२

बरे झालेले - ४,६०,९२४

मृत्यू - ८,९२५