शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा दर ३४ टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:09 IST

सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र रविवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ...

सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र रविवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ग्रामीण भागात संक्रमणाचा दर हा ३४ टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून आले. तेरा तालुक्यांत करण्यात आलेल्या ३,३११ चाचण्यांपैकी १,१४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर १० रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत २,०६६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत १,३०,९६८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. सोमवारी २,४६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता १,०३,८५५ इतकी झाली आहे. सध्या ग्रामीण भागात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २४,९७२ इतकी आहे.

सावनेर तालुक्यात ६६ रुग्णांची भर पडली. यात सावनेर शहरातील १५, तर ग्रामीणमधील ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. कामठी तालुक्यात ३७२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

नरखेड तालुक्यात ७८ रुग्णांची भर पडली. यात नरखेड शहरातील १६, तर ग्रामीण भागातील ६२ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुणांची संख्या २,१८० तर शहरात ४६८ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावांत (९), जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (२७), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र (१) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांत २५ रुग्णांची नोंद झाली.

काटोल तालुक्यात ३७१ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५७ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात रामटेक शहरातील १७ तर ग्रामीण भागातील ४० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कचारीसावंगा केंद्रांतर्गत १०, कोंढाळी केंद्रांतर्गत (११), तर येनवा केंद्रांतर्गत १९ रुग्णांची नोंद झाली.

हिंगणा तालुक्यात ५३७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात २२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला. वानाडोंगरी येथे ९, हिंगणा (५), रायपूर (२), तर वाघदरा गुमगाव, इसासनी, डिगडोह, मोहगाव झिल्पी, किन्ही धानोली व कान्होलीबारा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ११,०६६ झाली आहे. यातील ८,९१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तालुक्यात आतापर्यंत २४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कुही तालुक्यात २२८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही येथे ०२, मांढळ (१४), तितूर (१३) तर वेलतूर व साळवा येथे प्रत्येकी ५ रुग्णांची नोंद झाली. उमरेड तालुक्यात ६५ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये शहरातील २१ तर ग्रामीण भागातील ४४ रुग्णांचा समावेश आहे.

रामटेक तालुक्यात ९ रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील २ तर ग्रामीण ७ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ६,३४० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यातील ५,०३१ कोरोनामुक्त झाले. तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १,३०९ इतकी आहे.

कळमेश्वरला दिलासा

कळमेश्वर तालुक्यात सोमवारी मोठा दिलासा मिळाला. तालुक्यात ३३ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील १८, तर ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात गोंडखैरी ४, धापेवाडा, सावंगी प्रत्येकी २ तर सेलू, लोणारा, बोरगाव बु., मोहपा, देवबरडी, तिष्टी बु., नादीखेडा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.