शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कोरोनाचे विमा कवच नाही, शिक्षकांमध्ये असुरक्षितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत सेवा संलग्न करण्यात आलेल्या शिक्षकांना विमा सुरक्षेचा लाभ मिळत नसल्याने ...

नागपूर : कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत सेवा संलग्न करण्यात आलेल्या शिक्षकांना विमा सुरक्षेचा लाभ मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. विशेष म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत शासनाने ज्या शिक्षकांची सेवा अधिग्रहित केली होती, त्यांचे प्रस्ताव पाठवायला सांगितले होते. जानेवारीनंतर विम्याच्या सुरक्षेपासून शिक्षकांना वंचित ठेवले. मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. अनेक शिक्षक बाधित झाले आहेत. शासनाने सेवा अधिग्रहित केलेल्या ८ शिक्षकांचा यात मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

मागील वर्षभरापासून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकांच्या सेवासुद्धा कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत संलग्न करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच लागू करण्यात आले. त्याप्रमाणे मागील वर्षभरात या मोहिमेत काम करताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांच्या विमा कवचचा लाभ देण्यात आला; परंतु शिक्षकांच्या कुटुंबियांना मात्र या विम्याचा लाभ मिळाला नाही.

- दोन शिक्षकांचे प्रस्ताव प्रलंबित, इतरांचे प्रस्तावही नाही

जि.प. नागपूरअंतर्गत कार्यरत कोरोना मोहिमेत कार्यरत असताना दुर्दैवाने मृत्यू झालेल्या कृष्णा टिकले पं.स. उमरेड व मनोहर चौधरी पं.स. कामठी या दोन शिक्षकांचे विमा लाभाबाबतचे प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी जि.प. नागपूरकडून शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले आहेत; परंतु ते अद्याप प्रलंबित आहेत. दुसरीकडे या मोहिमेत आणखी अनेक शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे; परंतु जि.प.च्या शिक्षण विभागाकडून पं.स.कडून त्यांचे प्रस्तावच मागितले नसल्याची माहिती आहे.

- विमा कवच लागू केले नसल्यामुळे या मोहिमेत कार्य करणाऱ्या शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना असून, त्यांचे कुटुंबीय भयभीत आहे. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत काम करणाऱ्या शिक्षकांना विमा कवच लागू करून या मोहिमेत मृत्यू पावलेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना या विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांच्यासह दिनकर उरकांदे, विलास काळमेघ, राजू बोकडे, सुरेश श्रीखंडे, नीळकंठ लोहकरे, प्रकाश सव्वालाखे, मीनल देवरणकर, पुष्पा पानसरे, कल्पना इंगळे, नंदकिशोर वंजारी, अशोक बांते, दिगंबर ठाकरे, अनिल वाकडे, श्रीकृष्ण भोयर, शैला भिंगारे, सविता राऊळकर, सुनीता कठाणे, सुनीता हिंगे आदींनी शिक्षणमंत्र्यांना केली आहे.