शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

कोरोनामुळे झाला फायदा, मुलांना द्यायचे संस्कार पाठ झाले बळकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:09 IST

- शुभंकरोती प्रार्थना, नमाज पठण अन् बायबलचे धडे गिरवायला लागली मुले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणामुळे गेल्या ...

- शुभंकरोती प्रार्थना, नमाज पठण अन् बायबलचे धडे गिरवायला लागली मुले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण, मुलांच्या परीक्षा सर्व सुरूच आहेत. मात्र, याचा परिणाम म्हणून मुलांना आपल्या पालकांसोबत भरपूर वेळ मिळत आहे. त्याचा लाभ म्हणजे, पुस्तकी शिक्षणात रमलेल्या मुलांना आपल्या धार्मिक व सांस्कृतिक परिपाठाकडे वळविण्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. विविध धर्म - पंथीय लोक आपापल्या परंपरेनुसार मुलांमध्ये संस्कार रुजविण्याचे सोपस्कार पार पाडायला लागले आहेत. त्यात शुभंकरोती पाठ, अथर्वशिर्ष पाठ, मनाचे श्लोक, नमाज पठण, कलमा पठण, बायबल वाचन आदींबाबत मुले जागरूक व्हायला लागली आहेत.

--------------

प्रत्येक धर्मात संस्कारांचे धडे

हिंदू (वैदिक) - हिंदू म्हणा वा वैदिक धर्मात बाल्यसंस्काराला अतिशय महत्त्व दिले आहे. बाल्यावस्थेत देण्यात येणाऱ्या प्राथमिक संस्कारात सकाळ - संध्याकाळ भगवंताकडे आपल्याला हे जीवन दिल्याचे आभार मानून सर्व सृष्टीचे कल्याण करण्याची विनवणी केली जाते. आई, वडील, आजी, आजोबा यांना ईश्वरस्थानी मानण्यात आले आहे. बाल्यावस्थेतील प्रत्येक संस्कारात ‘वसुधैव कुटुंबकम’ हे तत्त्व प्रमाण मानले गेले आहे.

मुस्लिम - मुलांना बाल्यावस्थेपासूनच त्यांचे किरदार (व्यक्तिमत्त्व) घडविण्याचे संस्कार दिले जातात. एका व्यक्तिचा आदर करणे, त्याचे रक्षण करणे म्हणजेच संपूर्ण मानवजातीचा आदर, रक्षण करणे, हा भाव बाल्यावस्थेतच रुजवला जातो. शिक्षणावर भर दिला जातो आणि कुरआनमधील तत्त्वांचे आजीवन पालन करण्याची तालिम दिली जाते. मुस्लिमांमध्ये तालिमला अतिशय महत्त्व आहे. तुमच्या अस्तित्त्वाने समाजात आनंद पसरावा आणि सर्व आनंदी राहावेत, हा भाव रुजवला जातो. आईच्या पायाखाली जन्नत (स्वर्ग) असल्याचा भाव सांगितला जातो.

ख्रिश्चन - मुलांमध्ये ईश्वराविषयीची ओढ निर्माण केली जाते. सर्वप्रथम ईश्वर आहे आणि बायबलद्वारे त्याचा गजर करायचा आहे, याचे भान प्रदान केले जाते. यासोबतच दैनंदिन प्रार्थना, बायबलचे पठण, आई-वडिलांसोबतच थोरा-मोठ्यांसोबत कसे वागावे, दीन-दुबळ्यांशी कसे वर्तन असावे, समाजाला आपल्याकडून काय देता येईल, आदी वर्तनांवर भाष्य करत त्यांना त्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

--------------------

पुजारी म्हणतात...

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, हे खरे आहे तरी संस्कारांमुळे मुलगा भविष्यात कसले कर्तृत्त्व गाजवेल, हे ठरवता येते. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, याचे भान संस्कारातून येते. हे भान जागवणे म्हणजेच संस्कार होय. त्यामुळे, आपल्या पुरातन परंपरा, प्रार्थना, वेद - उपनिषदांतील तत्त्व मुलांना समजावण्यासाठी अगदी प्राथमिक बाबी महत्त्वाच्या ठरतात. शाळा बंद असल्याने, मुले घरी आहेत आणि पालक आपले प्राचीन संस्कार रुजवत आहेत, ही उत्तम बाब आहे.

- स्वप्नील लांबडे

मौलाना म्हणतात...

मुले भविष्यातील नागरिक आहेत आणि एक उत्तम नागरिक म्हणून उभा राहण्यासाठी तो एक उत्तम मनुष्य होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याला संस्कार हे महत्त्वाचे ठरतात. मुस्लिम धर्म हीच बाब हेरतो आणि त्याअनुषंगाने मदरसे, घरात धार्मिक वातावरण असण्यावर भर देतो. धर्माचे महत्त्व अतिवादी नाही, ही भावना त्याच्यात प्रथम निर्माण केली जाते. सध्या मदरसे बंद आहेत. मात्र, त्याचा लाभ मुले घरीच धार्मिक तालिम घेत आहेत. पालकही त्यात पुढाकार घेत आहेत, हे उत्तमच.

- मौलाना निजामुद्दीन निजाम

फादर म्हणतात...

आत्मविश्वासाने मुले पुढे जावीत आणि एक उत्तम नागरिक बनावे, हा भाव महत्त्वाचा आहे. शालेय शिक्षणात या बाबी आहेत. मात्र, त्याचे संस्कार घरातूनच मिळतात. त्याअनुषंगाने बायबल, ईश्वर यावर विश्वास वाढविण्यासाठी पालक सध्या लॉकडाऊनचा लाभ घेत आहेत. मुलांना चर्चकडून ऑनलाईन सत्रांतून मार्गदर्शन केले जात आहे. त्यासाठी प्रत्येक शनिवारी लहान - लहान व्हिडिओ पाठवून त्यांच्या मनात धार्मिक बाबींविषयी ओढ निर्माण केली जात आहे.

- फादर थॉमस जोसेफ

.......................