शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पहिल्याच दिवशी दिसला ‘कोरोना इफेक्ट’,  महाविद्यालयांत तोकडी उपस्थिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 00:49 IST

colleges begin, Corona Effect उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सोमवारपासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होईल, असा अंदाज होता; मात्र विदर्भात ‘कोरोना’ परत डोके वर काढत असल्याने त्याचा प्रभाव दिसून आला.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी ‘ऑनलाइन’वरच भर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सोमवारपासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होईल, असा अंदाज होता; मात्र विदर्भात ‘कोरोना’ परत डोके वर काढत असल्याने त्याचा प्रभाव दिसून आला. पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांमध्ये पहिल्याच दिवशी तोकडी उपस्थिती होती. काही महाविद्यालयांत विद्यार्थी आले; मात्र वर्ग झाले नाहीत. तर बऱ्याच ठिकाणी ‘ऑनलाइन’वरच भर देण्यात येत असल्याचे चित्र आहे.

१५ फेब्रुवारीपासून विद्यापीठांमधील विभाग व महाविद्यालयांतील वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परवानगी दिली होती. यासंदर्भात नागपूर विद्यापीठाने व्यवस्थापन परिषद व विद्वत परिषदांच्या निर्णयानुसार परिपत्रक जारी केले. आश्चर्याची बाब म्हणजे ‘कोरोना’ परत वाढण्यास सुरुवात झाली असताना हे परिपत्रक जारी झाले होते. सद्यस्थितीत १०० टक्के प्रवेश न देता ५० टक्के विद्यार्थ्यांना ‘रोटेशन’ पद्धतीने वर्गांमध्ये बोलवावे, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात पहिल्या दिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांतील अर्धेदेखील महाविद्यालयांत पोहोचले नव्हते. पदव्युत्तर विभागांमध्येदेखील हेच चित्र होते.

काही महाविद्यालयांत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या ‘इंडक्शन’ व ‘ओरिएंटेशन’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; मात्र प्रत्यक्ष वर्ग झाले नाहीत. ‘कोरोना’चे आकडे पाहता पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याचे चित्र आहे.

 

‘फर्स्ट इअर’च्या विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास

 

काही अभियांत्रिकी महाविद्यालयांत तसेच पदव्युत्तर विभागांमध्ये पहिल्या वर्षाचे विद्यार्थी उत्साहाने पोहोचले होते; मात्र एकूणच उपस्थिती कमी असल्याने वर्ग घेण्याचे टाळण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पहिल्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भ्रमनिरास झाला.

 

विद्यार्थ्यांच्या तपासणीवर भर

महाविद्यालयांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटरने विद्यार्थ्यांची तपासणी इत्यादींवर भर देण्यात आला. शिक्षक व कर्मचाऱ्यांना यासंदर्भात अनेक ठिकाणी विशेष प्रशिक्षणदेखील देण्यात आले. काही महाविद्यालयांत तर ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळले जावे, यासाठी प्रयोगशाळांमध्ये वर्ग झाले.

 

नवीन दिशानिर्देश निघणार का?

 

नागपूर विद्यापीठाने महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी तर दिली आहे. मात्र नागपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचे प्रमाण वाढीस लागले आहे. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाकडून नवीन दिशानिर्देश जारी होणार का, याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या