शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

पहिल्याच दिवशी दिसला ‘कोरोना इफेक्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सोमवारपासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होईल, असा अंदाज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सोमवारपासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होईल, असा अंदाज होता; मात्र विदर्भात ‘कोरोना’ परत डोके वर काढत असल्याने त्याचा प्रभाव दिसून आला. पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांमध्ये पहिल्याच दिवशी तोकडी उपस्थिती होती. काही महाविद्यालयांत विद्यार्थी आले; मात्र वर्ग झाले नाहीत. तर बऱ्याच ठिकाणी ‘ऑनलाइन’वरच भर देण्यात येत असल्याचे चित्र आहे.

१५ फेब्रुवारीपासून विद्यापीठांमधील विभाग व महाविद्यालयांतील वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परवानगी दिली होती. यासंदर्भात नागपूर विद्यापीठाने व्यवस्थापन परिषद व विद्वत परिषदांच्या निर्णयानुसार परिपत्रक जारी केले. आश्चर्याची बाब म्हणजे ‘कोरोना’ परत वाढण्यास सुरुवात झाली असताना हे परिपत्रक जारी झाले होते. सद्यस्थितीत १०० टक्के प्रवेश न देता ५० टक्के विद्यार्थ्यांना ‘रोटेशन’ पद्धतीने वर्गांमध्ये बोलवावे, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात पहिल्या दिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांतील अर्धेदेखील महाविद्यालयांत पोहोचले नव्हते. पदव्युत्तर विभागांमध्येदेखील हेच चित्र होते.

काही महाविद्यालयांत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या ‘इंडक्शन’ व ‘ओरिएंटेशन’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते; मात्र प्रत्यक्ष वर्ग झाले नाहीत. ‘कोरोना’चे आकडे पाहता पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याचे चित्र आहे.

‘फर्स्ट इअर’च्या विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास

काही अभियांत्रिकी महाविद्यालयांत तसेच पदव्युत्तर विभागांमध्ये पहिल्या वर्षाचे विद्यार्थी उत्साहाने पोहोचले होते; मात्र एकूणच उपस्थिती कमी असल्याने वर्ग घेण्याचे टाळण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पहिल्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भ्रमनिरास झाला.

विद्यार्थ्यांच्या तपासणीवर भर

महाविद्यालयांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटरने विद्यार्थ्यांची तपासणी इत्यादींवर भर देण्यात आला. शिक्षक व कर्मचाऱ्यांना यासंदर्भात अनेक ठिकाणी विशेष प्रशिक्षणदेखील देण्यात आले. काही महाविद्यालयांत तर ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळले जावे, यासाठी प्रयोगशाळांमध्ये वर्ग झाले.

नवीन दिशानिर्देश निघणार का?

नागपूर विद्यापीठाने महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी तर दिली आहे. मात्र नागपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचे प्रमाण वाढीस लागले आहे. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाकडून नवीन दिशानिर्देश जारी होणार का, याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.