शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

प्रशासनाच्या आकडेवारीच्या चारपट कोरोना मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपा प्रशासनाकडून शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी दररोज जाहीर केली जाते. परंतु प्रशासनाकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपा प्रशासनाकडून शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी दररोज जाहीर केली जाते. परंतु प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणारे आकडे आणि शहरातील दहन घाटावर करण्यात आलेले अंत्यसंस्कार, याचा विचार करता, जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीच्या चौपट अंतिम संस्कार होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

सोमवारी जिल्ह्यात ८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात शहरातील ५४, ग्रामीणमधील २५, तर जिल्ह्याबाहेरील १० जणांचा समावेश होता. परंतु शहरातील १४ घाटांवर सोमवारी तब्बल ३९२ मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात आले. यात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २८८ इतकी आहे, तर १०४ नॉनकोविड मृत्यूची नोंद घाटावर करण्यात आल्याचे ‘लोकमत’ चमूने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले.

एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यात गृह विलगीकरणातील रुग्णांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याचा परिणाम शहरातील दहन घाटांवर दिसू लागला आहे. शहरातील घाटांवर दररोज ३५० ते ४०० अंतिम संस्कार होत आहेत. शहरातील प्रमुख पाच घाटांवर दररोज ४० ते ६० मृतदेहांवर अंतिम संस्कार केले जात आहेत.

....

प्रमुख घाटांवर वेटिंग

शहरातील गंगाबाई घाट, मोक्षधाम, मानेवाडा व अंबाझरी या प्रमुख घाटांवर दररोज ४० ते ६० कोविड मृतकांवर अंतिम संस्कार होतात. एकाचवेळी आठ ते दहा मृतदेह अंतिम संस्कारासाठी येत असल्याने मृतकांच्या नातेवाईकांना अंतिम संस्कारासाठी ओटे खाली होण्याची प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा दीड ते दोन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील घाटावर रात्री उशिरापर्यंत चिता धुमसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

....

१५ दिवसात ४ हजाराहून अधिक अंतिम संस्कार

कोरोना प्रकोपामुळे शहरात दररोज २५० हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. यात रुग्णालयांतील रुग्णांच्या मृत्यूसोबतच गृह विलगीकरणात असलेल्यांचाही समावेश आहे.

गृह विलगीकरणातील असलेल्यांची नोंद होत नसल्याने त्यांचा कोविड मृत्यूत समावेश होत नसल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

...

दररोज ७० ते ८० नैसर्गिक मृत्यू

नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. शहरात दररोज ७० ते ८० मृत्यू नैसर्गिक व आजारामुळे होतात. परंतु कोरोना संक्रमणामुळे मृतकांचा आकडा हा ३०० ते ४०० पर्यंत पोहोचला आहे. यामुळे प्रमुख घाटावर एकाचवेळी आठ ते दहाजणांवर अंतिम संस्कार करावे लागत आहेत. ओटे खाली नसल्याने खालील जागेतही अंतिम संस्कार होत आहेत.

....

शहरातील घाटांवर सोमवारी करण्यात ओलेले अंत्यविधी...

घाट अंत्यविधी कोविड नॉन कोविड

सहकारनगर २० ११ ० ९

मानेवाडा ६३ ४३ २०

मोक्षधाम ४२ ३२ १०

अंबाझरी घाट ५२ ४३ ०९

दिघोरी-वाठोडा ४० २७ १३

गंगाबाई ६० ५० १०

शांतीनगर १२ ०९ ०३

वैशालीनगर २३ १४ ०९

मानकापूर २५ १८ ०७

पारडी घाट १८ १० ०८

पुणापूर घाट ०३ ०१ ०२

भरतवाडा घाट ०३ ०१ ०२

कळमना ०१ ०१ ००

नारा १३ ०९ ०४

एकूण ३९२ २८८ १०४

.................

...