शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रडवतोय! ग्रामीण भागात ७८२ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:08 IST

सावनेर/कामठी/काटोल/नरखेड/कळमेश्वर/ कुही/ उमरेड/ रामटेक /कन्हान : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमण साखळी अधिक घट्ट होताना दिसत आहे. बुधवारी ...

सावनेर/कामठी/काटोल/नरखेड/कळमेश्वर/ कुही/ उमरेड/ रामटेक /कन्हान : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमण साखळी अधिक घट्ट होताना दिसत आहे. बुधवारी जिल्ह्यातील तेरा तालुक्यात ७८२ रुग्णांची नोंद झाली.

हिंगणा तालुक्यात ४०९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ९४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे ४२, डिगडोह (१५), नागलवाडी (१२), हिंगणा (५), टाकळघाट, कान्होलीबारा, नीलडोह येथे प्रत्येकी ४, देवळी काळबांडे (३), रायपूर (२) तर इसासनी, संगम, अडेगाव, मोंढा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५,३४० इतकी झाली आहे. यातील ४,२०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ११२ जणांचा मृत्यू झाला आहे.

कळमेश्वर तालुक्यात ७१ रुग्णांची भर पडली आहे. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील १० तर ग्रामीण भागात गौंडखैरी येथे १७, तिडंगी (१०), पिपळा, परसोडी येथे प्रत्येकी ४, वरोडा,धापेवाडा, म्हसेपठार, आष्टीकला येथे प्रत्येकी ३, मोहपा, कोहळी, सुसंद्री, कळंबी येथे प्रत्येकी दोन तर उबाळी, सोनपूर, तेलगाव, तिष्टी, लिंगा, पानउबाळी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

कुही तालुक्यात १३६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात मांढळ येथे ५, मांगली (३), कुही शहर (२), टेंभरी, तारणी, हरदोली, नेवरी, साळवा व आकोली येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ९१६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

नरखेड तालुक्यात २३ रुग्णांची भर पडली. यात ३ रुग्ण शहरातील २० ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६६ तर शहरातील ६० इतकी झाली आहे. ग्रामीण भागात मदना येथे ५, थाटूरवाडा, भिष्णूर, नारसिंगी येथे प्रत्येकी ३, साखरखेडा (२) तर मोवाड, तिनखेडा, रोहणा, सिंजर येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली.

उमरेड तालुक्यात १३ रुग्णांची नोंद झाली. यात १० रुग्ण शहरातील, २ ग्रामीण भागातील तर अन्य तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

पारशिवनी तालुक्यातील कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४६ रुग्णांची नोंद झाली. या केंद्रांतर्गत आतापर्यंत १,३२६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील ९८८ रुग्ण बरे झाले आहेत तर ३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

काटोल, ग्रामीणमध्ये धोका वाढला

काटोल तालुक्यातील कोरोनासाखळी गतवर्षभरापासून अबाधित आहे. बुधवारी तालुत्यात ९० रुग्णांची नोंद झाली. तीत ३९ रुग्ण शहरातील तर ६१ ग्रामीण भागातील आहेत. शहरी भागामध्ये पंचवटी येथे पाच, आययुडीपी, धंतोली येथे प्रत्येकी चार, लक्ष्मीनगर, अण्णा भाऊ साठे नगर, गळपुरा येथे प्रत्येकी तीन, देशमुखपुरा, जानकीनगर, तारबाजार येथे प्रत्येकी दोन, हत्तीखाना, खोजा ले-आऊट, शनिचौक, अनुसयापुरम, रामदेवबाबा ले-आऊट, काळे चौक, लाखे ले-आऊट, पेठबुधवार, दोडकीपुरा, शारदाचौक, रेल्वेस्टेशन येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात कुकडी पांजरा येथे अठरा रुग्ण, मसाळा (९), कोंढाळी (८), कारला व आजनगाव येथे प्रत्येकी तीन, रिधोरा, लाडगाव, डोरली भिंगारे, गोंडीदिग्रस, येनवा येथे प्रत्येकी दोन तर चिचाळा, फेटरी, ढवळापूर, पानवाडी, पंचधार, वाढोणा, मसली, कलंबा, मेंडकी, गरमसूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.