शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

झाडीपट्टी रंगभूमीवर पुन्हा कोरोनाचे संकट! ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:30 IST

नागपूर : कठोर मार्गदर्शिकेसह सांस्कृतिक कार्यक्रमांना मुभा देण्यात आल्यानंतर झाडीपट्टी रंगभूमीवर पुन्हा वर्दळ सुरू झाली आहे. मात्र, दिवाळीनंतर उसळलेली ...

नागपूर : कठोर मार्गदर्शिकेसह सांस्कृतिक कार्यक्रमांना मुभा देण्यात आल्यानंतर झाडीपट्टी रंगभूमीवर पुन्हा वर्दळ सुरू झाली आहे. मात्र, दिवाळीनंतर उसळलेली कोरोना संसर्गाची दुसरी लाट त्या आनंदावर पुन्हा विरजण घालत आहे. एक तर नाटकांचे बुकिंग होत नाही आणि जी मंडळे नाटके आयोजित करत आहेत, तिथे कुठलेच नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचाच परिणाम झाडीपट्टीतील आरोग्य केंद्रांनी संबंधित मंडळांना खबरदारीचा इशारा देणारे पत्र जारी केले आहे.

कोरोना आणि टाळेबंदीमुळे यंदा झाडीपट्टी रंगभूमीचा सिझन सुरू होणार नाही, अशी भीती असतानाच ५ नोव्हेंबरपासून राज्य शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना ढिल दिली. त्याअनुषंगाने नाट्यसंस्थांनी भाऊबीजेच्या मुहूर्ताची तयारी सुरू केली. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक अतिशय सजग असल्याने तेथील मंडळांनी नाटकांचे बुकिंग घेण्यास सध्या तरी नकार दर्शवला आहे. त्यामुळे, आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या निर्मात्यांना बुकिंग नसल्याचा फटका बसत आहे. त्यांची गुंतवणूक पाण्यात जाईल, अशी त्यांना भीती वाटत आहे. मात्र, जिथे कुठे बुकिंग मिळत आहे. तेथे कोरोना संदर्भातले सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. नाटकाला २०० प्रेक्षकांच्या वर परवानगी नसताना दोन हजारावर प्रेक्षक हजेरी लावत आहेत आणि ९५ टक्के लोक मास्क घालत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा परिणाम संबंधित तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कठोर भूमिका घेण्यास सज्ज झाले आहेत. अशाच एका प्रकरणात १७ नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील खोडशिवनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित सर्व ग्रामपंचायतींना निर्वाणीचा इशारा देणारे पत्र जारी केले आहे. जमावबंदी टाळण्याचे आवाहन करताना इतरांचा जीव धोक्यात घालण्याच्या कारणाने आयोजकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

---------------

बॉक्स....

आयोजकांना तोटा सहन करायचा नाही

नाट्य सादरीकरणाच्या वेळी प्रेक्षकांसाठी सहा फूट अंतरावर एक खुर्ची असा नियम आहे. एका अर्थाने २५-३० टक्केच प्रेक्षकांना नाटक बघण्याची मुभा आहे. या नियमामुळे तिकीट खिडकीवरील उत्पन्न घसरणार असल्याने आयोजक मंडळे तोटा सहन करण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे, बरीच मंडळे नाटकाचे प्रयोग घेण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र, काही ठिकाणी कोरोना संबंधातील सर्वच नियमांना तिलांजली दिल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

------------

बॉक्स...

धोका असाही अन् तसाही!

झाडीपट्टी रंगभूमी ही कलावंतांसोबतच अनेकांची प्रमुख उपजीविका आहे. त्यामुळे, नाटक झाले नाही तर तसेही मरण आहेच आणि नाटक झाले तर कोरोना संसर्गाचा धोका आहे, अशी भावना कलावंत व्यक्त करत आहेत. या विषयावर सध्या कुणीच बोलण्यास तयार नाहीत, हे विशेष. मात्र, बरेच कलावंत हे नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, मुंबई, पुणे या अत्याधिक कोरोना बाधित शहरांतून येत असल्याने आणि सद्यस्थितीचा अंदाज घेता झाडीपट्टी रंगभूमीवर धोका निर्माण झाला आहे.

....................