शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

झाडीपट्टी रंगभूमीवर पुन्हा कोरोनाचे संकट! ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:30 IST

नागपूर : कठोर मार्गदर्शिकेसह सांस्कृतिक कार्यक्रमांना मुभा देण्यात आल्यानंतर झाडीपट्टी रंगभूमीवर पुन्हा वर्दळ सुरू झाली आहे. मात्र, दिवाळीनंतर उसळलेली ...

नागपूर : कठोर मार्गदर्शिकेसह सांस्कृतिक कार्यक्रमांना मुभा देण्यात आल्यानंतर झाडीपट्टी रंगभूमीवर पुन्हा वर्दळ सुरू झाली आहे. मात्र, दिवाळीनंतर उसळलेली कोरोना संसर्गाची दुसरी लाट त्या आनंदावर पुन्हा विरजण घालत आहे. एक तर नाटकांचे बुकिंग होत नाही आणि जी मंडळे नाटके आयोजित करत आहेत, तिथे कुठलेच नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचाच परिणाम झाडीपट्टीतील आरोग्य केंद्रांनी संबंधित मंडळांना खबरदारीचा इशारा देणारे पत्र जारी केले आहे.

कोरोना आणि टाळेबंदीमुळे यंदा झाडीपट्टी रंगभूमीचा सिझन सुरू होणार नाही, अशी भीती असतानाच ५ नोव्हेंबरपासून राज्य शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना ढिल दिली. त्याअनुषंगाने नाट्यसंस्थांनी भाऊबीजेच्या मुहूर्ताची तयारी सुरू केली. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक अतिशय सजग असल्याने तेथील मंडळांनी नाटकांचे बुकिंग घेण्यास सध्या तरी नकार दर्शवला आहे. त्यामुळे, आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या निर्मात्यांना बुकिंग नसल्याचा फटका बसत आहे. त्यांची गुंतवणूक पाण्यात जाईल, अशी त्यांना भीती वाटत आहे. मात्र, जिथे कुठे बुकिंग मिळत आहे. तेथे कोरोना संदर्भातले सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. नाटकाला २०० प्रेक्षकांच्या वर परवानगी नसताना दोन हजारावर प्रेक्षक हजेरी लावत आहेत आणि ९५ टक्के लोक मास्क घालत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा परिणाम संबंधित तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कठोर भूमिका घेण्यास सज्ज झाले आहेत. अशाच एका प्रकरणात १७ नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील खोडशिवनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित सर्व ग्रामपंचायतींना निर्वाणीचा इशारा देणारे पत्र जारी केले आहे. जमावबंदी टाळण्याचे आवाहन करताना इतरांचा जीव धोक्यात घालण्याच्या कारणाने आयोजकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

---------------

बॉक्स....

आयोजकांना तोटा सहन करायचा नाही

नाट्य सादरीकरणाच्या वेळी प्रेक्षकांसाठी सहा फूट अंतरावर एक खुर्ची असा नियम आहे. एका अर्थाने २५-३० टक्केच प्रेक्षकांना नाटक बघण्याची मुभा आहे. या नियमामुळे तिकीट खिडकीवरील उत्पन्न घसरणार असल्याने आयोजक मंडळे तोटा सहन करण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे, बरीच मंडळे नाटकाचे प्रयोग घेण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र, काही ठिकाणी कोरोना संबंधातील सर्वच नियमांना तिलांजली दिल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

------------

बॉक्स...

धोका असाही अन् तसाही!

झाडीपट्टी रंगभूमी ही कलावंतांसोबतच अनेकांची प्रमुख उपजीविका आहे. त्यामुळे, नाटक झाले नाही तर तसेही मरण आहेच आणि नाटक झाले तर कोरोना संसर्गाचा धोका आहे, अशी भावना कलावंत व्यक्त करत आहेत. या विषयावर सध्या कुणीच बोलण्यास तयार नाहीत, हे विशेष. मात्र, बरेच कलावंत हे नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, मुंबई, पुणे या अत्याधिक कोरोना बाधित शहरांतून येत असल्याने आणि सद्यस्थितीचा अंदाज घेता झाडीपट्टी रंगभूमीवर धोका निर्माण झाला आहे.

....................