शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कोरोनामुळे सराफा व्यवसायात आर्थिक टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:07 IST

मोरेश्वर मानापुरे नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा जास्त लहानमोठ्या सराफा व्यावसायिकांवर आर्थिक संकट आले आहे. गेल्यावर्षीच्या ...

मोरेश्वर मानापुरे

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा जास्त लहानमोठ्या सराफा व्यावसायिकांवर आर्थिक संकट आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा नुकसान जास्त झाले आहे. याशिवाय बँकांकडून कर्ज घेतलेल्यांना हप्ते न फेडल्याने नोटहसा येत आहेत. गेल्यावर्षी ७ ते ८ हजार कोटींच्या तुलनेत यंदा सव्वा दोन महिन्यांच्या काळात जिल्ह्यात १० हजार कोटींचा व्यवसाय प्रभावित झाला आहे. वेळेच्या निर्बंधानुसार दुकाने सुरू झाली असली तरीही व्यवसाय सुरळीत होण्यास आणखी काही महिने लागणार आहेत.

नागपुरातील मोठे सराफा व्यावसायिक राजेश रोकडे म्हणाले, गेल्यावर्षी लॉकडाऊन काळात ग्रामीण भागातील दुकाने सुरू होती. त्यामुळे ग्राहकांना खरेदी करता आली. पण यंदा जिल्हा बंदी व संपूर्ण लॉकडाऊनमुळे खरेदी करता आली नाही. राज्य शासनाने लॉकडाऊनची घोषणा वेळेवर केल्याने दुसऱ्या दिवशीपासून दुकाने बंद झाली. त्यामुळे मोठ्या ग्राहकांनी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात खरेदी केली. त्याचा फटका नागपुरातील सराफांना बसला. गुढीपाडवा, अक्षयतृतीया आणि अन्य सण व्यवसायाविना गेले.

दहा हजार कारागिर संकटात

नागपूर जिल्ह्यात जवळपास ९ ते १० हजार कारागिर आहेत. त्यात ७० टक्के पश्चिम बंगालचे आहेत. त्यापैकी ९० टक्के कारागिर मूळ गावी परतले. कारागिरांअभावी अनेक कामे थांबली आहेत. काम नसल्याने ते परतण्यास तयार नाहीत. दसऱ्यापूर्वी परतण्याची अपेक्षा आहे.

- तर चुकीचा मार्ग पत्करतील सराफा

१ जूनपासून दुकाने सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना मेल पाठवून केली होती. दुकाने सुरू न झाल्यास सराफा व्यावसायिक चुकीच्या मार्गाने व्यवसाय करतील, असे पत्रात म्हटले होते. ग्राहक दुपार व सायंकाळी खरेदीसाठी येतात. पण वेळेच्या बंधनामुळे व्यवसायावर परिणाम होणार आहे. काहीही असो दुकाने सुरू झालीत हे महत्त्वाचे आहे.

भविष्यात ऑनलाईनची चलन वाढणार,

नाणे व सुट्या सोन्याची खरेदी वाढली

भविष्यात सराफा व्यावसायिकांना ऑनलाईन खरेदी-विक्रीची जोड मिळाली आहे. ऑनलाईन दागिन्यांची निवड करून घरपोच डिलिव्हरी देण्यात येत आहे. ग्राहकांनाही ही योजना पसंतीस येत आहे. लॉकडाऊनच्या काळात सराफांनी २५ टक्के व्यवसाय केल्याचे पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले. रोकडे म्हणाले, कोरोनामुळे लोकांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला जास्त प्राधान्य दिले. नाणे आणि एक ते पाच ग्रॅमपर्यंत सोने खरेदी केली. भविष्यातील गुंतवणूक म्हणून सोने खरेदी वाढणार आहे. याशिवाय लोकांनी महिनेवारी खरेदी वाढविली आहे.