शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आणि डायबिटिज मेलिटस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST

कोरोना संक्रमणात डायबिटिजची व्याधी सांभाळणे अवघड कार्य आहे आणि यासाठी अतिरिक्त प्रयत्नांची गरज आहे. डायबिटिजच्या रुग्णांना कोरोना संक्रमणामुळे कीटोएसिडोसिस, ...

कोरोना संक्रमणात डायबिटिजची व्याधी सांभाळणे अवघड कार्य आहे आणि यासाठी अतिरिक्त प्रयत्नांची गरज आहे. डायबिटिजच्या रुग्णांना कोरोना संक्रमणामुळे कीटोएसिडोसिस, हायपरोस्मोलार, हायपरग्लाइसेमिक सारख्या स्थितींचा सामना करावा लागू शकतो. वृद्ध, डायबिटिज रुग्ण, अस्थमा रुग्ण आणि कार्डियाेवेस्कुलर आजार असलेल्या रुग्णांमध्ये कोरोना संक्रमण गंभीर होण्याचा धोका अधिक असतो.

टाईप २ डायबिटिजमध्ये कोरोना संक्रमण झाल्यावर काय होते?

स्थिती किचकट होते. आयसीयूमध्ये दीर्घकाळ ठेवण्याची स्थिती निर्माण होते. मृत्यूदर ही अधिक असतो. चीनमध्ये मधुमेह (डायबिटिक) नसलेल्यांचा मृत्यूदर २.३ टक्के होता तर त्या तुलनेत मधुमेही रुग्णांचा मृत्यूदर ७.३ टक्के इतका जास्त होता. अमेरिकेत अनियंत्रित ब्लड ग्लुकोज असलेल्या मधुमेही रुग्णांना जेव्हा कोरोना संक्रमण झाले तेव्हा तो मृत्यूदर २८.८ टक्के इतका भयंकर झाला होता. टाईप १ डायबिटिक रुग्णांनाही कोरोना संक्रमणाच्या स्थितीत जास्ती वेळपर्यंत इस्पितळात राहावे लागू शकते.

इस्पितळात भरती असलेल्या किंवा इन्सुलिन घेणाऱ्या रुग्णांना हायपोग्लाईसिमियाचा धोका अधिक असतो का?

इस्पितळात भरती रुग्णांना दीर्घ काळापर्यंत गंभीर स्वरूपाच्या हायपोग्लाईसिमियाचा धोका असतो. डायबिटिक रुग्ण कोरोना संक्रमणापासून मुक्त होण्याच्या प्रवासात अचानक हायपोग्लाईसिमियाचा धोका निर्माण होतो. स्टेरॉईड्स बंद केल्यानेही ब्लड ग्लुकोजमध्ये उल्लेखनीय घसरण होऊ शकते. त्यामुळे, हायपोग्लाइसिमियाचा धोका वाढू शकतो.

कोरोना संक्रमणात कोणती ॲण्टी-डायबिटिक औषधे घेतली जातात?

मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध गोळ्या बंद करून, इस्पितळातून डिस्चार्ज होईपर्यंत इन्सुलिन दिले जाते. लॅक्टिक ॲसिडोसिसचा धोका बघता विशेषत्वाने मेटफाॅर्मिन बंद केली जाते. ज्या रुग्णांची किडनी कमजोर असेल किंवा जे डिहायड्रेशनच्या समस्येने ग्रस्त असतील, त्यांना मेटफाॅर्मिन आणखी समस्या निर्माण करू शकते. डिहायड्रेशन वाढण्याच्या शंकेमुळेच एसजीएलटी श्रेणीची औषधे देणे टाळले जाते.

इन्सुलिन रेजिस्टेंस ची स्थिती?

डायबिटिजमध्ये अन्य कोणताही गंभीर आजार होण्याच्या स्थितीत मोठ्याप्रमाणात इन्सुलिन रेजिस्टेंस दिसून येते. कोरोना संक्रमणातही इन्सुलिनची मात्रा अचानक वाढविली जाऊ शकते. संक्रमणा कमी होण्याच्या स्थितीत इन्सुलिनची मात्राही कमी केली जाऊ शकते.

सर्वसाधारणपणे इन्सुलिन त्वचेतून दिले जाते की शिरांतून दिले जाते?

आरोग्य कर्मचाऱ्यांचा रुग्णाशी होणारा संपर्क कमीत कमी ठेवण्यासाठी सामान्य कीटोएसिडोसिसच्या रुग्णांना इन्सुलिन त्वचेच्या खालील भागातून (सबकटेनस) दिले जाते. अशा प्रकरणांत ब्लड ग्लुकोज प्रत्येक दोन ते चार तासात तपासले जाते. मात्र, कोरोना संक्रमणासोबत गंभीर कीटोएसिडोसिस, गंभीर हृदयरोग, किडनी, लिव्हरच्या समस्यांच्या स्थितीत सबकटेनस इन्सुलिन प्रोटोकॉल पाळले जात नाही.

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या स्थितीत डायबिटिज रुग्णांना कोणती काळजी घ्यावी लागेल?

ब्लड ग्लुकोजची नियमित तपासणी करून, ते नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. ब्लड प्रेशर, किडनी, कार्डियोवेस्कुलरच्या स्थितीचीही तपासणी करवून घ्यावी आणि कोरोना लस घेणे गरजेचे आहे. गर्दीचे स्थळ, अनावश्यक प्रवास आणि गरजेपेक्षा जास्त सामाजिक संपर्क टाळावे. तुम्हाला मधुमेहासह कार्डियोवेस्कुलरचा आजार असेल तर अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे. एंजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी झालेल्या रुग्णांनी तर सावधान राहणे महत्त्वाचे ठरेल.

कोरोना संक्रमणातून बाहेर पडल्यावर डायबिटिज रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?

डॉक्टरांनी सांगितलेले डायट व्यवस्थित सुरू असल्याची खात्री करून घ्यावी. विना साखर, गुड किंवा शहदाचे पदार्थ घेतल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने काही खाणे महत्त्वाचे आहे. ब्लड ग्लुकोज, ब्लड प्रेशर आणि थ्रोम्बोसिसचे कारण असणाऱ्या लक्षणांची नियमित तपासणी करून घ्यावी. कोरोना संक्रमणानंतर डायबिटिजच्या रुग्णांमध्ये मेंदू, किडनी, हृदयातील धमण्यांमध्ये बाधा निर्माण होणाऱ्या समस्या जास्त असतात. एस्पिरिन किंवा ओरल एंटीकोग्युलेंट्स सारख्या ब्लड थिनर्सची शिफारस केली जाते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित व्यायाम महत्त्वाचे ठरेल.

कोरोना पूर्वी आणि नंतर ब्लड ग्लुकोज कसा असावा?

कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेले बहुतांश रुग्णांमध्ये १४०-१८० एमजी ब्लड ग्लुकोज स्विकार्य आहे. संक्रमणानंतर तुमचे एचबीए१सीचे निर्धारण ६.५ ते ७ टक्के असायला हवे. पोस्ट मील ब्लड ग्लुकोज जर १६० एमजी पर्यंत असेल तर ते पर्याप्त आहे. डायबिटिजच्या ज्या रुग्णांचा ब्लड ग्लुकोज उत्तम नियंत्रित होतो, त्यांना कोरोना संक्रमणानंतर इतर किचकट समस्यांचा धोका कमी असतो.

..........................