शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सहकारी बँकांच्या कर्जाची मदार शिखर बँकेवर

By admin | Updated: May 25, 2014 00:50 IST

राज्यातील शेतकरी पीक कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर अवलंबून असला तरी या बँकाही राज्य सहकारी (शिखर) बँकेवर अवलंबून आहेत. मात्र राज्य बँकेवर संचालक

यवतमाळ : राज्यातील शेतकरी पीक कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर अवलंबून असला तरी या बँकाही राज्य सहकारी (शिखर) बँकेवर अवलंबून आहेत. मात्र राज्य बँकेवर संचालक मंडळाऐवजी प्रशासक असल्याने जिल्हा बँकांना मागणीच्या अर्धेच कर्ज मंजूर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

राज्य सहकारी बँकेवरील संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. त्याऐवजी सचिवस्तरीय प्रशासक मंडळ नेमण्यात आले. सुमारे दीड वर्षांंपासून प्रशासकांच्या नेतृत्वात बँकेचा कारभार सुरू आहे. संचालक मंडळ आणि प्रशासक यांच्या कारभारात तफावत आढळत असल्याचा सहकार क्षेत्रातील सूर आहे.

राज्यातील शेतकरी आणि जिल्हा बँकांचे हित डोळ्यापुढे ठेऊन कर्ज मंजूर करताना संचालक मंडळ व्यापक दृष्टीकोन ठेवते. तर प्रशासक केवळ नियमावर बोट ठेऊन काम करीत असल्याचा सूर आहे.

शेतकरी कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे येतात. मात्र जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती तेवढी भक्कम राहत नसल्याने या बँकासुद्धा राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेतात. परंतु राज्य सहकारी बँक मागणीच्या केवळ अर्धेच कर्ज मंजूर करते.

राज्य बँकेने व्यापक दृष्टिकोन ठेऊन या कर्जात किमान १0 टक्के तरी वाढ करावी, अशी जिल्हा बँकांची अपेक्षा असते. मात्र प्रशासक तो दृष्टिकोन बाळगत नाही. राज्य बँकेवर संचालक मंडळ असते तर राज्यातील सर्वच जिल्हा बँकांना किमान १0 टक्के वाढीव कर्ज मंजूर झाले असते, असे सहकार क्षेत्रातून सांगण्यात आले.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विचार केल्यास या बँकेने शिखर बँकेला ४00 कोटींच्या कर्जाची मागणी केली होती. मात्र त्यातून केवळ २३0 कोटी रुपये मंजूर झाले आहे. हीच अवस्था राज्यातील अन्य जिल्हा बँकांची आहे.

एकीकडे जिल्हा प्रशासक सहकारी बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट किती तरी अधिक पटीने वाढवून देते.

सततचा दुष्काळ व नापिकीमुळे कर्जाची वसुली मात्र होत नाही. त्यामुळे मागणी व पुरवठय़ातील तफावत वाढत जाऊन अनुशेष निर्माण होतो. (जिल्हा प्रतिनिधी)