शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

विदेशातील प्रवेशांवर संक्रांत

By admin | Updated: October 5, 2016 02:58 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०३ व्या दीक्षांत समारंभाचा अद्याप मुहूर्त निघालेला नाही.

बाहेरील विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांकडे मूळ पदवीची मागणी : नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचा अद्याप मुहूर्तच नाहीयोगेश पांडे  नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०३ व्या दीक्षांत समारंभाचा अद्याप मुहूर्त निघालेला नाही. त्यामुळे मागील वर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना अद्यापपर्यंत पदवी प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांची अडचण झाली असून काही विद्यार्थ्यांच्या विदेशातील विद्यापीठांतील प्रवेशांवर संक्रांत आली आहे. बाहेरील विद्यापीठांनी मूळ पदवी सादर करण्याची दिलेली मुदत संपत आली असल्यामुळे आता पदवी कुठून आणावी असा यक्षप्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. जर ठराविक वेळेत पदवी सादर केली नाही तर मागील वर्षी घेतलेला प्रवेश अर्ध्यावरच सोडावा लागणार आहे.मागील वर्षी नागपूर विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी विदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतले. काही विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील ‘सदर्न कॅलिफोर्निया’ विद्यापीठात प्रवेश घेतले. त्यावेळी विद्यार्थ्यांकडे मूळ पदवी नसल्यामुळे तात्पुरती पदवी त्यांनी सादर केली होती. संबंधित विद्यापीठाने त्यांना मूळ पदवी सादर करण्यासाठी एक वर्षाचा अवधी दिला होता. नागपूर विद्यापीठाचा १०३ वा दीक्षांत समारंभ झाल्यानंतर ही पदवी आपण सहजपणे सादर करू असा विद्यार्थ्यांना विश्वास होता परंतु त्यांची ही अपेक्षाच फोल ठरली.नागपूर विद्यापीठाचा १०३ वा दीक्षांत समारंभ १ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली होती. विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी आमच्याकडे अडचणी मांडल्या. आम्ही एकूण परिस्थिती सांगणारे पत्र लिहून दिले आहे. शिवाय तात्पुरते पदवी प्रमाणपत्रदेखील दिले आहे. परंतु अमेरिकेतील त्या विद्यापीठाला मूळ पदवी प्रमाणपत्रच हवे आहे. दीक्षांत समारंभ होत नाही, तोपर्यंत आम्ही पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही. आमचे हात कायद्याने बांधलेले आहे. अमेरिकेतील विद्यापीठाचा भारतातील विद्यापीठांवर विश्वास नाही, हेच यावरून दिसून येत आहे.- डॉ.सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू लेटलतिफीचा फटका विद्यार्थ्यांना का ?नागपूर विद्यापीठातून २०१५ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या एका विद्यार्थिनीने ‘सदर्न कॅलिफोर्निया’ विद्यापीठात ‘एमएस’साठी प्रवेश घेतला. तिचे एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु तिला मूळ पदवी न मिळाल्याने तिचा प्रवेश रद्द होण्याची चिन्हे आहेत. तिच्यासारखे आणखी विद्यार्थीदेखील तिथे आहेत. विद्यापीठाने १ आॅक्टोबरला जरी दीक्षांत समारंभ घेतला असता तरी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असता. परंतु मुख्य अतिथी न मिळाल्याने विद्यापीठाने हात वर केले. विद्यापीठाच्या लेटलतिफीचा विद्यार्थ्यांनी फटका का सहन करावा, असा प्रश्न संबंधित विद्यार्थिनीचे नातेवाईक पवन सारडा यांनी उपस्थित केला.