शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

गोळ्या घालण्याचा फलक ठरला वादग्रस्त

By admin | Updated: January 25, 2017 02:58 IST

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आंदोलनकर्त्यांना फलक दाखवून, घोषणा करून सूचना देतात,

आंदोलकांना सूचना देण्याचा हेतू होता : पोलिसांचा खुलासा नागपूर : कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आंदोलनकर्त्यांना फलक दाखवून, घोषणा करून सूचना देतात, तशी ती केवळ एक सूचना होती. गोळी चालविण्याचा फलक दाखविणे म्हणजे आंदोलकांवर पोलिस गोळी चालविणार आहे, असे नव्हे. तसा आम्ही विचारही करू शकत नाही, असा खुलासा अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले. हे राम, नथुराम नाटकाचा प्रयोग रविवारी येथील देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या प्रयोगाला विरोध करणाऱ्यांना आंदोलकांसमोर शहर पोलिसांनी एक फलक दाखवला. ‘सुनो बलवाँईयो आप का जमाव गैरकानुनी है। आप लोग यहाँसे चले जाव। नही तो आप पर पक्की गोली चलाई जायेंगी। चले जाव। चले जाव। चले जाव।’असे त्यात नमूद होते. लोकमतने आज त्या फलकासंबंधाचे वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली. पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत या वादग्रस्त फलकाचा विषय पत्रकारांनी लावून धरला. पोलिसांनी असा फलक दाखवण्यामागे काय उद्देश होता, गोळी घालण्याची ही धमकी पोलीस कशी देऊ शकतात, ते कोणत्या कायद्यात बसते, असे एक ना अनेक प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या उपस्थितीत उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त शर्मा म्हणाले, गोळी घालण्याचा इशारा देणारे फलक दाखविणे म्हणजे धमकी नव्हे. आंदोलनाची परवानगी पोलिसांकडून घेतली नव्हती. त्यामुळे ते आंदोलन गैरकायदेशीर ठरते. कोणत्याही ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमविणे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे. अशावेळी सुरक्षा यंत्रणेतर्फे सुरक्षासंबंधाने आंदोलनकर्त्यांना सूचना दिल्या जातात. त्याला जुमानत नसेल आणि परिस्थिती चिघळत असेल तर पोलीस आंदोलकांवर पाण्याचा मारा, लाठीमार, अश्रुधूर सोडतात. याचाच एक भाग म्हणून आम्ही सूचनांचे दोन फलक दाखविले. मात्र, दुसरा फलक कुणी ध्यानात घेतला नाही आणि या फलकाचा गैरसमज करण्यात आला.