शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

उपचाराचा खर्च नियंत्रित करणार- आरोग्यमंत्री दीपक सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:17 IST

उपचाराचा वाढता खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारही महाराष्ट्रात क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट लागू करण्यावर विचार करीत आहे.

- महाराष्ट्रात लागू होणार ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कायदा लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपचाराचा वाढता खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारही महाराष्ट्रात क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट लागू करण्यावर विचार करीत आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनसह खासगी डॉक्टरांसोबतही चर्चा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विजय वडेट्टीवार, दिलीप वळसे पाटील आदींनी लक्षवेधी सूचना सादर करीत रक्ताची नासाडी, त्याची विक्री आणि जीवन अमृत योजनेंतर्गत केंद्र स्थापित झाले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ११.२३ लाख युनिट रक्ताची गरज आहे. त्या तुलनेत १६.१७ लाख युनिट रक्त संकलन होते. २.४ टक्के रक्त वाया जाते. एकूण देशाच्या तुलनेत ते कमी आहे. ‘ए निगेटिव्ह’, ‘बी निगेटिव्ह’ आणि ‘ओ निगेटिव्ह’ ग्रुपच्या रक्ताचे संकलन केले जात नाही. आवश्यकता पडल्यास रक्तदात्यांची मदत घेतली जाते.रक्त विकणाºया एनजीओंवर होणार कारवाईअनेक एनजीओ या रक्त विकतात, ही बाब भाजपाचे ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. खडसे यांनी सांगितले की, मी स्वत: रक्तदान करतो. परंतु ज्या रक्तपेढीला मी रक्तदान करतो ती रक्तपेढी रक्त विकत असेल तर माझ्या रक्तदानाचा उपयोग काय? उद्या रक्तदान करणारेही आपले रक्त विकू लागले तर काय होणार, असा थेट प्रश्न उपस्थित केला. यावर रक्त विकणाºया संस्थांवर १४० नियमांतर्गत कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी जाहीर केले. आरोग्य विभाग एनजीओला रक्त संकलनाचा परवाना देतो. त्याचे नियंत्रण अन्न व औषध विभागा(एफडीए)कडे असते. गडबड झाल्याचे आढळून आल्यास विभागातर्फे परवाना रद्द करून कारवाई करण्यास एफडीएला सांगितले जाईल, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.रक्ताची नासाडी रोखणारसंकलित केलेले रक्त हे ३२ दिवसांपर्यंतच टिकून राहत असल्याने भाजपाचे एकनाथ खडसे यांनी रक्तातून प्लाझ्माला वेगळे करण्याची यंत्रणा निर्माण करण्याची मागणी केली. यावर डॉ. सावंत यांनी मुंबईच्या केईएम रुग्णालयात प्लाझ्मा वेगळा करण्याचे केंद्र प्रस्तावित असल्याचे सांगितले. तसेच सरकार प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र स्थापित करण्यासाठी तयार असल्याचेही स्पष्ट केले.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७