शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

सततच्या पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:09 IST

काटोल : काटोल तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक सोंगणीला आले आहे. मात्र अतिपावसामुळे शेतात ओलावा कायम असल्याने मळणीयंत्र कसे ...

काटोल : काटोल तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक सोंगणीला आले आहे. मात्र अतिपावसामुळे शेतात ओलावा कायम असल्याने मळणीयंत्र कसे न्यायचे आणि सोंगणी कशी करायची, असा पेच शेतकरी बांधवांना पडला आहे.

पीक काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबरमध्ये तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सात सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने तालुक्यातील जलाशये १०० टक्के भरल्या गेली. मात्र सतत सुरू असलेल्या पावसाने नदी-नाल्या काठावरील शेती पुलामुळे खरडून गेली आहे. झालेल्या नुकसानीचे कृषी व महसूल विभागाच्या वतीने सर्वेक्षण केले जात आहे. इकडे सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगातील दाणे काळवटल्या जात असून अंकुर फुटत आहे. कपाशी चांगली असली तरी बोंडे काळे पडत आहे. संत्राए मोसंबीची गळ अद्यापही कायम आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात फुलकोबीची लागवड असते. या पिकालासुद्धा पावसाचा मोठा फटका बसला आहे.

शेतात चिखल .....

कपाशीवर चुरडा पडल्याने पाने चिकटत आहेत. तण वाढले आहे. फवारणी आवश्यक आहे. मात्र, शेतात पायच ठेवता येत नसल्याने फवारणी, डवरणी आणि तणनाशक मारायचे कसे, हा प्रश्न आहे. सोनोली शिवारातील शेतकरी सागर भैस्वार यांच्या शेतातील १० टनाच्यावर मोसंबी खाली आली. त्यांचे साडेतीन एकरातील कोबीचे नुकसान झाले आहे. सोयाबीन पिवळी पडून मोठे नुकसान झाले आहे.

--

सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहे. तालुक्यात सोयाबीन, संत्रा मोसंबी, कापूस व तूर या मुख्य पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून येत आहे.

सुरेश कन्नाके

तालुका कृषी अधिकारी

230921\img-20210923-wa0151.jpg~230921\img-20210923-wa0153.jpg~230921\img-20210923-wa0152.jpg

सततच्या पावसाने तालुक्यातील बहुतांश शेतात अश्याप्रकारे पाणी साचल्याचे चित्र आहे~कोबी लागवड असलेल्या शेतात फुल कोबीची अवस्था अशी झाली आहे~कृषी विभागाचे अधिकारी पीक नुकसानीची पाहणी करताना