शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

संपर्क वाढला, मात्र संवाद घटला

By admin | Updated: September 11, 2014 01:07 IST

तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे, मात्र आप्तस्वकीय दुरावले आहे. संपर्क वाढला आहे, मात्र संवाद घटला आहे. घरात सोबत असतानाही मुलांच्या भावनिक गरजा दुर्लक्षित झाल्या आहेत.

तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या गंभीर : दीप्ती ख्रिश्चन नागपूर : तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे, मात्र आप्तस्वकीय दुरावले आहे. संपर्क वाढला आहे, मात्र संवाद घटला आहे. घरात सोबत असतानाही मुलांच्या भावनिक गरजा दुर्लक्षित झाल्या आहेत. नकळत मुले अनोळख्यांशी जवळीक साधत आहे. कुटुंबाचा सहवास हरविल्याने मुले एकटी पडली आहेत. त्यामुळे समाजात आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. हे सर्व टाळायचे असेल तर मुलांना, विद्यार्थ्यांना समजून घेऊन, त्यांच्या भावनिक गरजा पूर्ण करणे महत्त्वाचे आहे, असे मत हिस्लॉप महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दीप्ती ख्रिश्चन यांनी व्यक्त केले. जागतिक आत्महत्या परावृत्त दिनाच्या निमित्ताने श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातर्फे ‘शैक्षणिक सुधारणा आणि विद्यार्थ्यांमधील आत्महत्येची मानसिकता’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राच्या उद्घाटनाला मुख्य अतिथी म्हणून दीप्ती ख्रिश्चन उपस्थित होत्या. तसेच नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोक गांधी, महाविद्यालयाच्या प्राचार्य स्नेहल पाळधीकर, मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. दीपा बलखंडे उपस्थित होते. चर्चासत्रात प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शैलेश पानगावकर यांनी ‘आत्महत्या मानसिकतेची आंतरिक कारणे’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत मानसशास्त्र विषयातील तज्ज्ञांनी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या विविध सामाजिक विषयांवर पेपर प्रेझेंटेशन सादर केले. चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी ‘आत्महत्येला रोखण्यासाठी समन्वयकाची भूमिका’ या विषयावर स्वाती धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ‘मानसिक आरोग्य व जगण्याचे कौशल्य’ या विषयावर डॉ. नीलम देशमुख मार्गदर्शन करणार आहे. या चर्चासत्राला शिक्षण मंडळाचे सहकार्यवाह अ‍ॅड. राजेंद्र राठी, मंडळाचे पदाधिकारी डॉ. सी. जी. पांडे, प्रा. साधना मूल, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमृता गोखले तर आभारप्रदर्शन प्रा. आरती बरगे यांनी केले. (प्रतिनिधी)