शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
3
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
4
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
5
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
6
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
7
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
8
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
9
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
10
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
11
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
12
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
13
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
14
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
15
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
16
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
17
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
18
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
19
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
20
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

भरमसाट वीज बिलामुळे ग्राहक चक्रावले! महावितरणकडे दररोज ५०० तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 10:43 IST

अपेक्षापेक्षा कितीतरी अधिक बिल आल्यामुळे बहुतांश नागरिक महावितरण कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. दररोज ५०० वर लोक तक्रार घेऊन कार्यालयात पोहोचत आहेत.

ठळक मुद्देतीन महिन्याचे वीज बिल एकाचवेळी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्चनंतर थेट जून महिन्यात वाटण्यात येत असलेल्या वीज बिलामुळे नागरिक चक्रावले आहेत. अपेक्षापेक्षा कितीतरी अधिक बिल आल्यामुळे बहुतांश नागरिक महावितरण कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. दररोज ५०० वर लोक तक्रार घेऊन कार्यालयात पोहोचत आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण आतापर्यंत केवळ अर्ध्या शहरातच बिल वितरित झालेले आहे.मिसाळ ले-आऊट येथील रहिवासी भीमराव कोटांगळे यांनी गेल्या दोन महिन्यात सरासरी बिल भरले, तरी त्यांना ६,५६० रुपये बिल आले. श्यामनगर, हुडकेश्वर येथील प्रीती शिरीष बोडखे यांच्या नावावरील वीज बिल सलग भरले जात आहे. परंतु त्यांना ९०३ युनिटचे ६,७७० रुपयाचे बिल आले. गोपालनगरातील माटे परिवाराचीही अशीच व्यथा आहे. त्यांच्या घरी चार मीटर आहेत. एक लाखापेक्षा अधिकचे बिल आले. कुटुंब आश्चर्यचकित आहे. हे सर्वजण हे मानायलाच तयार नाही की, त्यांनी इतक्या अधिक विजेचा वापर केला आहे. मिलिंद लोहकरे यांचेही असेच म्हणणे आहे. दर महिन्याला बिल भरल्यानंतरही त्यांना ७,४९० रुपयाचे बिल आले. महावितरणच्या कार्यालयात गेल्यावर समजले की, बिलात गडबड आहे.त्यात ऑनलाईन पेमेंटचा उल्लेखच केलेला नाही. बिल भरल्याची पावती दाखवल्यावर ३ हजार रुपये कमी करण्यात आले. परंतु सर्वांसोबतच असे होत नाही आहे. सोमवारी तुळशीबाग कार्यालयात जवळपास ५०० लोकांचा मोर्चा धडकला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकेका ग्राहकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.काहीजण संतुष्ट झाले तर काहींच्या समस्या अजूनही कायम आहेत. शहरातील इतर कार्यालयातही अशीच गर्दी होत आहे. दररोज ५०० वर तक्रारी येत आहेत. भविष्यात या तक्रारींची संख्या वाढेल कारण आतापर्यंत अर्ध्या ग्राहकांनाच वीज बिल मिळालेले आहेत.

सरासरीचा खेळमहावितरण सूत्रानुसार सरासरी बिल देताना डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारीच्या बिलाचा आधार घेण्यात आला होता. तेव्हा विजेची मागणी कमी होती. आताचे बिल हे मार्च, एप्रिल व मे महिन्यातील येत आहेत. या दरम्यान विजेचा उपयोग अधिक होतो. याचा थेट परिणाम वीज बिलांवर पडत आहे. महावितरणच्या अभियंत्यांनी सरासरी बिल जास्तीत जास्त वापरानुसार पाठवण्याचे आवाहन केले होते. परंतु तसे झाले नाही.

बिल किस्तप्रमाणे भरण्याची सवलत द्यावीमहावितरणच्या कार्यालयात येत असलेल्या नागरिकांना कर्मचारी बिलातील एकेक गोष्ट समजावून सांगत आहे. लोक समजतही आहेत. परंतु बहुतांश नागरिकांचे म्हणणे आहे की, तीन महिन्याचे बिल एकाच वेळी भरणे कठीण आहे. त्यामुळे बिल किस्तप्रमाणे भरण्याची सवलत देण्यात यावी. परंतु यासंदर्भात आतापर्यंत कुठलेही धोरण ठरलेले नाही. महावितरणचे कर्मचारीही लोकांना कुठलेही ठोस आश्वासन देत नाहीत.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण