शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
4
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
5
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
6
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
7
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
9
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
10
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
11
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
12
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
13
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
14
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
15
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
16
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ
17
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
18
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
19
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
20
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा

वायगाव-पांढराबोडी मार्गावरील पुलाचे बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : माैदा तालुक्यातील वायगाव-पांढराबाेडी मार्ग नागपूर व भंडारा जिल्ह्याला जाेडणारा आहे. या मार्गावरील नाल्यावर असलेल्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : माैदा तालुक्यातील वायगाव-पांढराबाेडी मार्ग नागपूर व भंडारा जिल्ह्याला जाेडणारा आहे. या मार्गावरील नाल्यावर असलेल्या पुलाचे बांधकाम दाेन वर्षापासून रखडले आहे. याला कंत्राटदार जबाबदार असल्याचा आराेप स्थानिक लाेकप्रतिनिधींनी केला असून, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वायगाव-पांढराबाेडी हा परिसर नागपूर व भंडारा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. येथून नागपूरच्या तुलनेत भंडारा शहर जवळ असून, येथील बहुतांश शेतकरी व नागरिक त्यांच्या बहुतांश कामासाठी नागपूरऐवजी भंडारा शहर व जिल्ह्यातील आंधळगाव, मोहाडी व तुमसर येथील बाजारपेठेत शेतमालाची विक्री व इतर साहित्याची खरेदी करण्यासाठी जातात. या भागातील बहुतांश विद्यार्थी भंडाऱ्याला शिक्षण घेत असून, आराेग्यसेवेसाठीही भंडाऱ्यालाच जातात. त्यासाठी ते याच मार्गाचा वापर करतात. या मार्गावर वायगाव व पांढराबाेडी दरम्यान असलेल्या नाल्यावर पुलाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली.

या पुलाचे बांधकाम तातडीने सुरू व्हावे म्हणून वायगाव-शिरसोली गटग्रामपंचायतने ठराव पारित केले असून, ठराव व नागरिकांची निवेदने अनेकदा बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना दिली. परंतु, काहीही उपयाेग झाला नाही, असा आराेपही नागरिकांनी केला आहे. परिणामी, या प्रकरणाची चाैकशी करून त्यात दाेषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करावे, अशी मागणी पांढराबोडीचे सरपंच विनोद वैद्य, डॉ. मनोज गायधने, खुशाल धुमनखेडे, जगदीश राखडे, हिंमतकुमार राखडे, जगन्नाथ गायधने, राजेश राकडे, तुळशीदास मारवाडे, सूर्यभान शेंडे, तुळशीराम शेंडे, अमित राखडे, संदीप राखडे, विष्णू शेंडे, बाबूराव धुमनखेडे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

...

१ काेटी २७ लाख रुपये मंजूर

या पुलाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने सन २०१९ मध्ये १ काेटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला हाेता. शिवाय, पूल बांधकामाचे कंत्राट नागपूर येथील चौधरी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले हाेते. कंत्राटदार कंपनीने दाेन वर्षापासून या पुलाच्या बांधकामाला सुरुवातच केली नाही. त्यामुळे वायगाव, पांढराबाेडी परिसरातील शेतकरी व नागरिकांना भंडारा जिल्ह्यात ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.