शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

वायगाव-पांढराबोडी मार्गावरील पुलाचे बांधकाम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : माैदा तालुक्यातील वायगाव-पांढराबाेडी मार्ग नागपूर व भंडारा जिल्ह्याला जाेडणारा आहे. या मार्गावरील नाल्यावर असलेल्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : माैदा तालुक्यातील वायगाव-पांढराबाेडी मार्ग नागपूर व भंडारा जिल्ह्याला जाेडणारा आहे. या मार्गावरील नाल्यावर असलेल्या पुलाचे बांधकाम दाेन वर्षापासून रखडले आहे. याला कंत्राटदार जबाबदार असल्याचा आराेप स्थानिक लाेकप्रतिनिधींनी केला असून, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वायगाव-पांढराबाेडी हा परिसर नागपूर व भंडारा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. येथून नागपूरच्या तुलनेत भंडारा शहर जवळ असून, येथील बहुतांश शेतकरी व नागरिक त्यांच्या बहुतांश कामासाठी नागपूरऐवजी भंडारा शहर व जिल्ह्यातील आंधळगाव, मोहाडी व तुमसर येथील बाजारपेठेत शेतमालाची विक्री व इतर साहित्याची खरेदी करण्यासाठी जातात. या भागातील बहुतांश विद्यार्थी भंडाऱ्याला शिक्षण घेत असून, आराेग्यसेवेसाठीही भंडाऱ्यालाच जातात. त्यासाठी ते याच मार्गाचा वापर करतात. या मार्गावर वायगाव व पांढराबाेडी दरम्यान असलेल्या नाल्यावर पुलाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली.

या पुलाचे बांधकाम तातडीने सुरू व्हावे म्हणून वायगाव-शिरसोली गटग्रामपंचायतने ठराव पारित केले असून, ठराव व नागरिकांची निवेदने अनेकदा बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना दिली. परंतु, काहीही उपयाेग झाला नाही, असा आराेपही नागरिकांनी केला आहे. परिणामी, या प्रकरणाची चाैकशी करून त्यात दाेषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करावे, अशी मागणी पांढराबोडीचे सरपंच विनोद वैद्य, डॉ. मनोज गायधने, खुशाल धुमनखेडे, जगदीश राखडे, हिंमतकुमार राखडे, जगन्नाथ गायधने, राजेश राकडे, तुळशीदास मारवाडे, सूर्यभान शेंडे, तुळशीराम शेंडे, अमित राखडे, संदीप राखडे, विष्णू शेंडे, बाबूराव धुमनखेडे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

...

१ काेटी २७ लाख रुपये मंजूर

या पुलाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने सन २०१९ मध्ये १ काेटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला हाेता. शिवाय, पूल बांधकामाचे कंत्राट नागपूर येथील चौधरी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले हाेते. कंत्राटदार कंपनीने दाेन वर्षापासून या पुलाच्या बांधकामाला सुरुवातच केली नाही. त्यामुळे वायगाव, पांढराबाेडी परिसरातील शेतकरी व नागरिकांना भंडारा जिल्ह्यात ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.