शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नागपुरातील फ्लाय अ‍ॅशवर बेंगळुरूतील बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:13 IST

नागपूर : औष्णिक वीज केंद्रातून निघालेली राख हवेत जाते. त्यामु्ळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो. पर्यावरणाच्या दृष्टीनेही ही राख ...

नागपूर : औष्णिक वीज केंद्रातून निघालेली राख हवेत जाते. त्यामु्ळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो. पर्यावरणाच्या दृष्टीनेही ही राख घातक असते. त्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ही राख बेंगळुरूला पाठविण्यासाठी मालगाड्या उपलब्ध करून दिल्या. त्यानुसार ७८०० टन राख ११६ वॅगनच्या माध्यमातून पाठविण्यात आली. या राखेचा वापर बांधकामासाठी उपयोगात येणाऱ्या ब्रिक्ससाठी करण्यात येणार आहे.

राज्यातील १६ औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून वर्षाकाठी हजारो टन कोळशाची राख तयार होते. राखेमुळे प्रदूषण वाढते. ही राख नद्यांमध्ये किंवा जमिनीवर टाकली जाते. जमिनीवर टाकलेली राख हवेत उडत असल्याने नागरिकांना त्रास होतो. यावर उपाय ही राख इमारतीच्या बांधकामात वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मध्य रेल्वे नागपूर विभागातील वरोरा येथील औष्णिक वीज केंद्रातून निघालेली कोळशाची राख अ‍ॅश टॅक कंपनीने नाममात्र दरात खरेदी करून पहिल्यांदाच मालगाडीने पाठविण्यात आली. यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या मार्गदर्शनात मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्यासह वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या राखेपासून विटा बनवण्याचा उद्योग नागपूर जिल्ह्यासह विदर्भ, मुंबई, पुणे आणि नाशिक येथे आहे. यामुळे रोजगारही उपलब्ध होतो.

............