शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अतिउजव्या विचारधारेमुळे राज्यघटना धोक्यात : गणेश देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 10:45 IST

न्यायपालिका असो वा निवडणूक आयोग त्यांनी सरकारपुढे नमते घेतलेले आहे. कुठली स्वप्ने पाहावी, याचादेखील अधिकार माणसाला राहिलेला नाही, अशी टीका पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी येथे केली.

ठळक मुद्दे बँक कर्मचाऱ्यांचे अधिवेशन

ऑनलाईन लोकमतनागपूर : अतिउजव्या विचारधारेमुळे राज्यघटना धोक्यात आली आहे. वर्तमान केंद्र सरकारने सध्या राज्यघटनेशी खेळ चालविला आहे. न्यायपालिका असो वा निवडणूक आयोग त्यांनी सरकारपुढे नमते घेतलेले आहे. कुठली स्वप्ने पाहावी, याचादेखील अधिकार माणसाला राहिलेला नाही, अशी टीका पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी येथे केली.

अखिल भारतीय बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी फेडरेशनचे आठवे द्विवार्षिक अधिवेशन १७ आणि १८ ऑगस्टला खामला व्यंकटेशनगर येथील अर्जुना सेलिब्रेशनमध्ये सुरू आहे. उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी एआयबीईएचे सरचिटणीस सी. एच. व्यंकटचलम, बीओएमओएचे सरचिटणीस राजीव ताम्हणे, एआयबीओएमईएफचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर, रिसेप्शन समितीचे चेअरमन बीएनजे शर्मा, महासचिव स्वयंप्रकाश तिवारी उपस्थित होते. अधिवेशन स्थळाला ए.बी. बर्धन यांचे नाव देण्यात आले आहे.

गणेश देवी म्हणाले, देशातील घटनात्मक संस्था सरकारला शरण गेल्या आहेत. घटनेतील ३७० सारखे महत्त्वपूर्ण कलम सरकारने चुटकीसरशी रद्द केले आहे. माणसाच्या आयुष्यात स्वप्नांना महत्त्वाचे स्थान आहे. पण, गेल्या काही वर्षांत स्वप्ने दाखवली आणि विकली जात आहे. सरकार दाखवेल त्या स्वप्नांचा स्वीकार करणे बंधनकारक होऊ लागले आहे. आपल्या विचारधारांनी भारतच नव्हे संपूर्ण विश्व पोखरून काढण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.बँक राष्ट्रीयीकरणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अधिवेशन भरविण्यात आले आहे. अधिवेशनात बँकिंग उद्योगाशी निगडित वाढते कर्ज आणि त्याविरोधात एआयबीईएने उघडलेल्या मोहिमेवर चर्चा करण्यात येणार आहे. नोकरभरती, वेतनवाढ, तात्पुरत्या कर्मचाऱ्यांचा नियमित कर्मचारी म्हणून समावेश, या प्रश्नांवर ठराव पारित करण्यासह संघटनात्मक कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. अधिवेशनात १० संघटनांचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.

टॅग्स :bankबँक