शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

सामाजिक लोकशाहीसाठी संविधान जागराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 21:43 IST

सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी संविधानाच्या जागराची गरज स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही यांनी येथे केले.

ठळक मुद्देनिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही संविधान साहित्य संमेलनाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संविधान स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय या तत्त्वावर उभे आहे. संविधानानुसार देशात राजकीय समता लागू झाली. आर्थिक समानताही काही प्रमाणात येत आहे. मात्र सामाजिक समतेपासून अजूनही आपला देश कोसो दूर आहे. आदिवासी डॉ. पायल तडवीने केलेली आत्महत्या ही सामाजिक असमानतेचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी संविधानाच्या जागराची गरज स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही यांनी येथे केले.संविधान फाऊंडेशनच्यावतीने दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित भारतीय संविधान साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, यशदाचे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड, संमेलनाच्या स्वागताध्यक्ष रेखा खोब्रागडे, ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे मंचावर उपस्थित होते. न्या. रोही पुढे म्हणाले, संविधान साहित्य संमेलनावरून वाद झाला.परंतु संविधानाचा ‘साहित्य' या शब्दाने अर्थ न घेता व्यापक असा अर्थ घ्यावा, असा सल्ला न्या. रोही यांनी दिला. अलीकडे आम्ही राष्ट्रकारण विसरलो असून प्रत्येकाला राजकारण दिसत असते, यामुळे आजघडीला प्रत्येक भारतीय नागरिकाने गणराज्य चिरायू हो असे म्हणताना, संविधान चिरायू होवो असा गजर करणे देशाच्या हिताचे आहे. पल्लवी दराडे म्हणाल्या, ७० वर्षांपूर्वी महिलांची अवस्था पशुपेक्षाही वाईट होती. परंतु भारतीय संविधानाने महिलांना समान अधिकार दिले. प्रत्येक जात धर्म पंथातील महिलांना अधिकार व हक्कासाठी इतर देशांप्रमाणे आंदोलन करावे लागले नाही. संविधानाचे खऱ्या अर्थाने भारतीय महिलांवर उपकार आहेत. डॉ. आंबेडकर यांनी महिलांसाठी सादर केलेले हिंदू कोड बिल त्यावेळी पारित होऊ शकले नाही, परंतु त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते लागू करावे लागले. ही बाबासाहेबांच्या दूरदृष्टीची ताकद होय, अशी भावना दराडे यांनी व्यक्त केली. विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार म्हणाले, विविध धर्मांनी नटलेल्या भारतीय संस्कृतीला ऐक्याच्या सूत्रात बांधून ठेवणारे डॉक्युमेंट म्हणजे संविधान होय. संविधानामुळेच देश अखंडपणे टिकून आहे. काळानुसार बदल हे या संविधानाचे वैशिष्ट्य असल्याचेही डॉ.संजीवकुमार म्हणाले.रेखाताई खोब्रागडे यांनी स्वागत भाषण केले. प्रास्ताविक ई. झेड . खोब्रागडे यांनी केले. संविधान प्रास्ताविकेचे वाचन दीपक निरंजन यांनी केले. संचालन खोब्रागडे यांनी केले. आभार प्रा. महेंद्र मेश्राम यांनी मानले.संविधानातील बंधूत्व शोधण्याची गरज : डॉ. बंगआजचा नाही तर भविष्याचा वेध घेत शतकाच्या शेवटी कुठे जायचे आहे, याचे मार्गदर्शक म्हणून भारतीय संविधान म्हणजे मोठ्या लक्ष्याचे व्हिजन डॉक्युमेंट आहे. संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि न्यायाची मूल्ये काही प्रमाणात प्राप्त केली आहेत. परंतु बंधूता या मूल्याच्या बाबतीत आपण उतरणीवर लागलो आहोत, असे परखड मत सर्च फाऊंडेशनचे संस्थापक तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी आज येथे व्यक्त केले. भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे उद््घाटक म्हणून त्यांनी आपले विचार मांडले. नुकत्याच झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये धार्मिक मुद्यावर संघर्ष वाढीस लागल्याचे दिसून आले. ही स्थिती धोकादायक व चिंताजनक आहे. पुन्हा एकदा हिंदीच्या विरोधात आवाज पुकारला गेला. बंधूत्वाचा धागा जोडला गेला नाही, तर देश उद्ध्वस्त होईल. १९४७ साली एकदा देशाची फाळणी झाली होती, परंतु अलीकडे धर्माची लहान लहान वर्तुळ तयार व्हायला लागली आहेत. ही स्थिती धोकादायक असून वारंवार फाळणीसारखे चित्र निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करीत संविधानातील बंधूत्वाचा शोध घेण्याची खरी गरज निर्माण झाली आहे, असे डॉ. बंग म्हणाले.संविधान देशाला लाभलेली अमूल्य देणगी : डॉ. भूषणकुमारसंविधानाची ओळख ही पाठ्यपुस्तकात काही प्रमाणात आहे. संविधानातील समता, बंधूता आणि न्यायाची मूल्ये लहान मुलांच्या मनावर शालेयस्तरावरील पाठ्यपुस्तकातून बिंबविली तर एक नवा समताधिष्टित समाज निर्माण करण्यास मदत होईल, असे नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले. पुढील काळात देशाची प्रगती संविधानानुसारच होणार असल्याचे सांगत, संविधान ही देशाला लाभलेली अमूल्य अशी देणगी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याच संविधानाची ओळख कारागृहातील बंदिवानांना करून दिली होती. त्यावेळी संविधानाची मूल्यांचा अभ्यास केलेल्या काही कैद्यांच्या शिक्षेत कपात करण्यात आल्याची आठवण डॉ. भूषणकुमार यांनी नमूद केली.संविधान सन्मान पुरस्कारसंविधान देशातील प्रत्येक नागरिकांना सन्मानाने जगण्याचे हक्क प्रदान करतो. आपले हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देत संविधानाची ओळख समाजाला व्हावी, यासाठी गाव, वस्ती, शाळा, आदिवासी पाड्यांवर संमेलने, परिषदातून जनजागृती करणाºया संस्थांसह कार्यकर्त्यांचा यावेळी डॉ. भीमराव रामजी संविधान सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. यात संविधान ग्राम अभियान राबवणारे ज्ञानेश्वर रक्षक, संविधानाची शाळा निर्माण करणारे विलास गजभिये, संविधान पहाट घेणारे हरीश इथापे, कविश्वर जारुंडे, नरेश वहाणे, सुरेंद्र टेंभुर्णे, आनंद गायकवाड, प्रा. हृदय चक्रधर, गौतम मेश्राम, अतुल खोब्रागडे, अ‍ॅड. स्मिता कांबळे, आकाश मून, महाराष्ट्र आॅफिसर फोरम, गोपाळराव देवगडे, प्रा. शकील सत्तार, अनिल कान्हेकर यांचा समावेश होता.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिक