शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

राज्यघटना असुरक्षित करणारी परिस्थिती

By admin | Updated: February 13, 2016 03:02 IST

महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात अहिंसेच्या मार्गानी स्वातंत्र्याचा लढा दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशाविषयी अनेक स्वप्न रंगविले होते.

लीलाताई चितळे : मृणाल गोरे परस्पर विनिमय केंद्रातर्फे चर्चासत्रनागपूर : महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात अहिंसेच्या मार्गानी स्वातंत्र्याचा लढा दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशाविषयी अनेक स्वप्न रंगविले होते. तळागाळातील माणसाच्या सर्वसमावेशक विकासाचा विचार केला होता. मात्र आजची परिस्थिती श्वास कोंडणारी आहे. एकतर्फी राज्यकारभार चालवून लोकभावनेला दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे. असहिष्णुता वाढून पुन्हा जातीव्यवस्था बळकट होताना दिसते. अशा घुसमट होणाऱ्या परिस्थितीत राज्यघटना सुरक्षित राहील काय, हा प्रश्न निर्माण झाला असल्याची भावना ज्येष्ठ समाजसेविका लीलाताई चितळे यांनी व्यक्त केल्या. मृणाल गोरे परस्पर विनिमय केंद्राच्यावतीने ‘अस्वस्थ वातावरण : हिंसा आणि तिची अनेक रूपे’ या विषयाअंतर्गत द्विदिवसीय चर्चासत्राचे आयोजन अमरावती रोडवरील विनोबा विचार केंद्र, सर्वादय आश्रम येथे करण्यात आले आहे. चर्चासत्राच्या उद््घाटन सत्रात अध्यक्ष म्हणून उपस्थित लीलाताई चितळे यांनी दलित, आदिवासी, कामगार यांचे होणारे शोषण आणि देशातील एकूणच परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करीत सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. याप्रसंगी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले व सुरेखा दळवी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. श्रीनिवास खांदेवाले यांनी, भारतीय संस्कृती ही प्रकृतीसोबत चालणारी आहे. मात्र दुसऱ्या जातीधर्माच्या गोष्टी स्वीकारायच्या नाही, असे मानने ही विकृती आहे असे मत व्यक्त केले. समाजात मतभिन्नता असतात, मात्र इतरांचं मत ऐकायचे नाही हे योग्य नाही. दुर्दैवाने सध्या हाच प्रकार सुरू असून ही विकृती संपविल्याशिवाय देश संपन्न होणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सुरेखा दळवी यांनी सामाजिक कुरीती आणि त्याचा उच्छाद मांडणाऱ्यांवर जोरदार टीका केली. परंपरेच्या नावावर अजूनही स्त्रियांचं शोषण सुरू आहे. शनि शिंगणापूर आणि शबरीमाला येथील प्रकार स्त्रीस्वातंत्र्यावरचा मोठा आघात आहे. यातूनच स्त्री-पुरुष अशा लिंगभेदाच्या विखारी विचारांना बळ मिळत असून ही संकुचित मनोवृत्ती आजच्या काळात समानतेला आव्हान देणारी असल्याचे टीका दळवी यांनी केली. उद््घाटन सत्राचे प्रास्ताविक आणि संचालन विलास भोंगाडे यांनी केले.(प्रतिनिधी)