शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटना असुरक्षित करणारी परिस्थिती

By admin | Updated: February 13, 2016 03:02 IST

महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात अहिंसेच्या मार्गानी स्वातंत्र्याचा लढा दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशाविषयी अनेक स्वप्न रंगविले होते.

लीलाताई चितळे : मृणाल गोरे परस्पर विनिमय केंद्रातर्फे चर्चासत्रनागपूर : महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात अहिंसेच्या मार्गानी स्वातंत्र्याचा लढा दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशाविषयी अनेक स्वप्न रंगविले होते. तळागाळातील माणसाच्या सर्वसमावेशक विकासाचा विचार केला होता. मात्र आजची परिस्थिती श्वास कोंडणारी आहे. एकतर्फी राज्यकारभार चालवून लोकभावनेला दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे. असहिष्णुता वाढून पुन्हा जातीव्यवस्था बळकट होताना दिसते. अशा घुसमट होणाऱ्या परिस्थितीत राज्यघटना सुरक्षित राहील काय, हा प्रश्न निर्माण झाला असल्याची भावना ज्येष्ठ समाजसेविका लीलाताई चितळे यांनी व्यक्त केल्या. मृणाल गोरे परस्पर विनिमय केंद्राच्यावतीने ‘अस्वस्थ वातावरण : हिंसा आणि तिची अनेक रूपे’ या विषयाअंतर्गत द्विदिवसीय चर्चासत्राचे आयोजन अमरावती रोडवरील विनोबा विचार केंद्र, सर्वादय आश्रम येथे करण्यात आले आहे. चर्चासत्राच्या उद््घाटन सत्रात अध्यक्ष म्हणून उपस्थित लीलाताई चितळे यांनी दलित, आदिवासी, कामगार यांचे होणारे शोषण आणि देशातील एकूणच परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करीत सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. याप्रसंगी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले व सुरेखा दळवी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. श्रीनिवास खांदेवाले यांनी, भारतीय संस्कृती ही प्रकृतीसोबत चालणारी आहे. मात्र दुसऱ्या जातीधर्माच्या गोष्टी स्वीकारायच्या नाही, असे मानने ही विकृती आहे असे मत व्यक्त केले. समाजात मतभिन्नता असतात, मात्र इतरांचं मत ऐकायचे नाही हे योग्य नाही. दुर्दैवाने सध्या हाच प्रकार सुरू असून ही विकृती संपविल्याशिवाय देश संपन्न होणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सुरेखा दळवी यांनी सामाजिक कुरीती आणि त्याचा उच्छाद मांडणाऱ्यांवर जोरदार टीका केली. परंपरेच्या नावावर अजूनही स्त्रियांचं शोषण सुरू आहे. शनि शिंगणापूर आणि शबरीमाला येथील प्रकार स्त्रीस्वातंत्र्यावरचा मोठा आघात आहे. यातूनच स्त्री-पुरुष अशा लिंगभेदाच्या विखारी विचारांना बळ मिळत असून ही संकुचित मनोवृत्ती आजच्या काळात समानतेला आव्हान देणारी असल्याचे टीका दळवी यांनी केली. उद््घाटन सत्राचे प्रास्ताविक आणि संचालन विलास भोंगाडे यांनी केले.(प्रतिनिधी)