शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

मेट्रोरिजनचा आराखडा संविधान विरोधी

By admin | Updated: November 29, 2015 03:30 IST

भारतीय संविधानाने जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना मूलभूत अधिकार दिले आहेत.

ब्रिगेडियर सुधीर सावंत : जय जवान जय किसानच्या आंदोलनाला समर्थननागपूर : भारतीय संविधानाने जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना मूलभूत अधिकार दिले आहेत. मात्र मेट्रोरिजन आराखड्याच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील स्थानिक संस्थांचे अधिकार गोठविण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रकार संविधान विरोधी असल्याचा आरोप ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केला. सावंत यांनी एका पत्रपरिषदेदरम्यान जय जवान जय किसान संघटनेच्या आंदोलनाला समर्थन जाहीर केले. यावेळी संघटनेचे प्रशांत पवार उपस्थित होते.संघटनेतर्फे नासुप्रच्या मेट्रोरिजन विकास आराखड्याविरोधात रविवारी जनमत चाचणी घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी गावागावात जाऊन मेट्रोरिजन आराखड्या विरोधात प्रचार करणार असल्याचे सुधीर सावंत यांनी सांगितले. यावेळी सावंत यांनी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारवर टीका करीत शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याच्या मालाला उत्पादन खर्चाच्या ५० टक्के अधिक भाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन पाळले नाही. दुष्काळग्रस्तांना मदत मिळाली नाही. खासगीकरणाच्या सपाट्यात कामगार कायदे पायदळी तुडविले जात आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकाविल्या जात असल्याचा आरोप त्यांनी लावला. पंतप्रधान एकीकडे संविधान बदलविले जाणार नाही, अशी घोषणा करतात, मात्र दुसरीकडे देशाचे गृहमंत्री संविधानातून सेक्युलर हा शब्द वगळण्याची भाषा करतात. हा विरोधाभास न पटण्यासारखा असल्याचा टीका सुधीर सावंत यांनी केली. वन रॅँक वन पेन्शनवर सैनिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुभाष बांते उपस्थित होते.(प्रतिनिधी)