शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बाबासाहेबांचे संविधान धोक्यात येऊ देणार नाही

By admin | Updated: April 16, 2017 01:39 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपात भारतीयांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक मोठे शस्त्र दिले आहे.

शरद यादव : आवाज इंडियाचा स्थापना दिवस उत्साहातनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपात भारतीयांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक मोठे शस्त्र दिले आहे. परंतु वर्तमान सरकार हे संविधान बदलण्याचे कुटील षड्यंत्र रचत आहे. असे हजार प्रयत्न झाले तरी ते हाणून पाडू. बाबासाहेबांनी देशाला दिलेले संविधान धोक्यात येऊ देणार नाही, असे प्रतिपादन जनता दल युनायटेडचे प्रमुख खा. शरद यादव यांनी केले. आवाज इंडिया टीव्ही चॅनलतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व चॅनलच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त कस्तूरचंद पार्कवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अरविंद सोनटक्के, पी.एस. खोब्रागडे, सुनील सरदार, गुणवंत देवपारे, राजीव झोड़पे, अमन कांबळे आणि आवाज इंडियाचे प्रीतम बुलकुंडे उपस्थित होते. या कार्यक्रमात भगवान बुद्धावर आधारित इंटरनॅशनल अल्बम ‘सम्बुद्धा’चे सादरीकरणही करण्यात आले. शरद यादव पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेला नाकारून दलित, शोषित, पीड़ित लोकांच्या अन्यायाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी संविधानाद्वारे माणुसकीची खरी व्याख्या समाजाला शिकवली. परंतु हे आपले दुर्दैव आहे की बाबासाहेबांचे विचार आम्ही अद्याप कृतीत उतरवू शकलो नाही. यावेळी शरद यादव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष आणि शिक्षणावर आधारित ‘जय भीम’ या गीताच्या लेजर शोचे उद्घाटनही करण्यात आले. गायक संतोष पावा आणि स्पेनची गायिका मि लिली हिने ‘सम्बुद्धा’ अल्बमचे सादरीकरण केले. संचालन डॉ. राजेंद्र फुले यांनी केले. (प्रतिनिधी)