शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
2
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
3
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
4
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
5
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
6
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
7
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
8
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
9
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
10
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
11
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
12
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
15
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
16
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
17
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
18
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
19
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
20
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!

कृष्णा किरवलेंची हत्या षड्यंत्रच

By admin | Updated: March 5, 2017 02:04 IST

आंबेडकरी चळवळ आणि साहित्यातील ‘थिंक टँक’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख

मान्यवरांचे प्रतिपादन : आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची निषेध सभा नागपूर : आंबेडकरी चळवळ आणि साहित्यातील ‘थिंक टँक’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. कृष्णा किरवले यांची हत्या होणे धक्कादायक आहे. आंबेडकरी विचारवंतांना संपवून चळवळ खिळखिळी करण्याचे षङ्यंत्र यामागे असून अशा प्रवृत्तीला सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले. आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक व शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ नागपुरातील आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी आज संविधान चौकात निषेध सभेचे आयोजन करून आपला संताप व्यक्त केला. कृष्णा किरवलेंची हत्या ही दाभोळकर-पानसरे-कलबुर्गी या मालिकेतील असून त्यादिशेने पोलिसांनी तपास करण्याची मागणी सर्वांनी एकमुखाने रेटून धरली. निषेध सभेत बोलताना बहुजन विचारवंत जेमिनी कडू म्हणाले, कृष्णा किरवलेंच्या हत्येमागे घरगुती कारण असेल असे अखेरपर्यंत पटणे अशक्य आहे. असहिष्णुतेच्या वातावरणात त्यांच्यासारख्या विचारवंताची हत्या होणे हा मोठा धक्का आहे. ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम म्हणाले, अमानवी प्रवृत्ती आंबेडकरी विचारधारेच्या मागे लागली आहे. त्यांना उत्तर देणारी यंत्रणा आपल्याकडे असणे गरजेचे आहे. आंबेडकरी समाजातील विखुरलेपणा दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी आणखी एखाद्या विचारवंताच्या हत्येची वाट न पाहता आंबेडकरी चळवळीच्या एकीकरणाची बाब मनावर घेणे गरजेचे आहे. डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी पानसरे, दाभोळकर यांच्या हत्येची शाई वाळते न वाळते तोच किरवले यांची हत्या होणे चळवळीसाठी धक्कादायक बाब असल्याचे मत व्यक्त केले. समता सैनिक दलाचे प्रवक्ते अशोक बोंदाडे म्हणाले, वैचारिक शक्ती प्रभावशाली असते. त्यांच्यामुळेच क्रांती घडते. त्यामुळे या हत्येमागे जे कारण सांगण्यात येत आहे, त्यावर विश्वास ठेवता येत नाही. रिपब्लिकन मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहणे यांनी विचारवंत आंबेडकरी चळवळीला गतिमान करीत असतात. त्यामुळे अशा भ्याड हल्ल्याला जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांनी किरवलेंची हत्या बाबासाहेबांचे विचार दाबण्याचे षङ्यंत्र असून, याविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन त्याचा विरोध करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले. डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी किरवलेंनी आंबेडकरी चळवळ गतिमान केल्याचे सांगून त्यांची हत्या ही मानवतेला काळिमा फासणारी बाब असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नाटककार दादाकांत धनविजय म्हणाले, किरवलेंचे विचार इतरांना बोचणारे होते. अशा घटना होऊ नये यासाठी लढा उभारण्याची गरज आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते भूपेश थुलकर म्हणाले, कोल्हापूर परिसरात अशा घटना सातत्याने घडत असल्याचे सांगून हे एक षडयंत्र आहे, या दिशेने तपास होण्याची गरज आहे. संचालन राजन वाघमारे यांनी केले. सभेला प्रा. रत्नाकर मेश्राम, मिलिंद फुलझेले, विनोद थुल, सतीश तांबे, लक्ष्मीकांत मेश्राम, नत्थु नाईक, राहुल दहिकर, अ‍ॅड. स्मिता कांबळे, अ‍ॅड. संदीप नंदेश्वर, डॉ.सविता कांबळे, थॉमस कांबळे, पी. टी. खोब्रागडे, हृदय चक्रधर, विनोद उलीपवार, प्रा. चंद्रशेखर पाटील, दीक्षित आवळे, मनोहर नगराळे, डॉ. नीलिमा चव्हाण, डॉ. सुदेश भोवते, डॉ. नीरज बोधी, महेंद्र गायकवाड, अ‍ॅड. सुरेश घाटे, प्रमोद मून, सीताराम राठोड, विलास पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)