शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

वारसदारांना २७ वर्षानंतर दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:06 IST

नागपूर : वाहन अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या पत्नी व मुलीला २७ वर्षानंतर दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...

नागपूर : वाहन अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या पत्नी व मुलीला २७ वर्षानंतर दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना ४ लाख ६२ हजार २५० रुपये भरपाई व त्यावर ६ टक्के व्याज मंजूर केले. न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी हा निर्णय दिला.

पद्मा जोशी असे पत्नीचे तर, धनश्री असे मुलीचे नाव आहे. ते यवतमाळ येथील रहिवासी आहेत. मयताचे नाव वीरेंद्र होते. संबंधित अपघात २० एप्रिल १९९३ रोजी घडला. वीरेंद्र यांच्या दुचाकीला यवतमाळ-नागपूर एसटी बसची धडक बसली. त्यामुळे वीरेंद्र गंभीर जखमी होऊन मरण पावले. वीरेंद्र व बस चालक शेख कटरू शेख भारू मुस हे दोघेही वेगात वाहन चालवित होते. अपघात झाल्यानंतर शेख कटरू यांनी ब्रेक लावला असता बस १५ फुटापर्यंत घासत गेली होती. वीरेंद्र यांच्या वारसदारांनी सुरुवातीला मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात भरपाईचा दावा दाखल केला होता. न्यायाधिकरणने तो दावा फेटाळून लावला. परिणामी, वारसदारांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील अंशत: मंजूर करून सदर आदेश देण्यात आला.