शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

भविष्यातील पाण्याच्या गरजेसाठी विहिरींचे संवर्धन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:10 IST

नागपूर : भविष्यातील शुद्ध पाण्याची गरज लक्षात घेता शहरातील सर्व विहिरींचे संवर्धन करण्यात यावे, अशा विनंतीसह सामाजिक कार्यकर्ते संदेश ...

नागपूर : भविष्यातील शुद्ध पाण्याची गरज लक्षात घेता शहरातील सर्व विहिरींचे संवर्धन करण्यात यावे, अशा विनंतीसह सामाजिक कार्यकर्ते संदेश सिंगलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी भूजल हाच महत्त्वाचा स्रोत आहे. परंतु, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा स्रोत धोक्यात आला आहे. नीरीने केलेल्या संशोधनानुसार, शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या ६६६ पैकी २३० विहिरी कचराकुंड्या झाल्या आहेत. इतरही अनेक विहिरी धोक्यात आहेत. सध्या केवळ ३० विहिरींचे पाणी पिण्यायोग्य आहे. ही परिस्थिती अत्यंत धक्कादायक आहे. भूजल पातळी चांगली राहण्याकरिता विहिरींची मदत होते. विहिरींचे संवर्धन झाले नाही तर, भूजल पातळीही धोक्यात येईल. विहिरीमध्ये कचरा फेकणे नियमाच्या विरोधात आहे. परंतु, त्याकडे महानगरपालिकेचे लक्ष नाही, असे सिंगलकर यांनी याचिकेत नमूद केले आहे. शहरातील सर्व विहिरी स्वच्छ करण्यात याव्या, विहिरींचे खोलीकरण करण्यात यावे, विहिरीतील झरे जिवंत करण्यात यावे इत्यादी मागण्या त्यांनी न्यायालयाला केल्या आहेत.

-------------------

लोकमतच्या बातमीचा आधार

ही याचिका दाखल करण्यासाठी लोकमतमध्ये ३१ जानेवारी रोजी प्रकाशित बातमीचा आधार घेण्यात आला आहे. याचिकेसोबत लोकमतच्या बातमीचे कात्रण जोडण्यात आले आहे. लोकमतने नीरीच्या अहवालावरून शहरातील विहिरींच्या समस्यांकडे लक्ष वेधले होते. तसेच, विहिरींचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते.

--------------------

अहवाल सादर करण्याचे निर्देश

या प्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने हा विषय अतिशय गंभीर असल्याचे मत व्यक्त करून याचिकाकर्त्यांना नीरीचा अहवाल रेकॉर्डवर आणण्याचे निर्देश दिले. तसेच, प्रकरणावर दोन आठवड्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली.