शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

हेरिटेज सक्करदरा तलावाचे संवर्धन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:08 IST

नागपूर : संत्रानगरीतील प्रसिद्ध हेरिटेज सक्करदरा तलावाचे संवर्धन व सौंदर्यीकरण व्हावे, याकरिता निश्चय फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने मुंबई ...

नागपूर : संत्रानगरीतील प्रसिद्ध हेरिटेज सक्करदरा तलावाचे संवर्धन व सौंदर्यीकरण व्हावे, याकरिता निश्चय फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत राज्याचे नगरविकासमंत्री, नगर विकास विभागाचे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व कंत्राटदार जाखापूर जगदंबा कन्स्ट्रक्शन कंपनी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

चार एकर परिसरात पसरलेल्या हेरिटेज सक्करदरा तलावाची सरकार व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे. तलावाची संरक्षण भिंत कोसळली आहे. तलावात कचरा व गाळ साचला आहे. परिणामी, पाणी प्रदूषित झाले असून, त्यातील जीव मृत्युमुखी पडत आहेत. पूर्वी नागरिक तलावाजवळ फिरायला जात होते. हा परिसर करमणुकीचे आवडते ठिकाण होते. परंतु, आता तलावाचे सौंदर्य नष्ट झाले आहे. तलावाचे संवर्धन, विकास व सौंदर्यीकरण करण्यासाठी तातडीने कृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे, न्यायालयाने यासंदर्भात राज्य सरकार व महानगरपालिकेला आवश्यक निर्देश द्यावेत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

----

सरकारने निधी दिला नाही

राज्य सरकारने सक्करदरा तलाव सौंदर्यीकरण व विकासकामांसाठी नऊ कोटी ९९ लाख ९५ हजार ९६० रुपये मंजूर केले आहेत. परंतु, ही रक्कम अद्याप देण्यात आली नाही. त्यामुळे तलावातील कचरा व गाळ काढणे, सौंदर्यीकरण, संरक्षण भिंत बांधणे इत्यादी कामे थांबविण्यात आली आहेत. जाखापूर जगदंबा कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामांचे कंत्राट देण्यात आले आहे. महानगरपालिकेने ५ जून २०२० रोजी राज्य सरकारला पत्र लिहून मंजूर रक्कम त्वरित देण्याची मागणी केली होती. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही, याकडे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. हर्षदर्शन सिरास कामकाज पाहणार आहेत.