शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

भाजपा-शिवसेनेला ताकद देणे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना भोवले

By admin | Updated: May 21, 2014 01:01 IST

राज्यात लोकसभेच्या दोन डझनावर जागी विजयाचे स्वप्न पाहणार्‍या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना धड आपला यवतमाळ हा गृहजिल्हाही सांभाळता आला नाही.

यवतमाळ : राज्यात लोकसभेच्या दोन डझनावर जागी विजयाचे स्वप्न पाहणार्‍या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना धड आपला यवतमाळ हा गृहजिल्हाही सांभाळता आला नाही. त्यांच्या या जिल्ह्यात राज्यातील दोन कॅबिनेट मंत्री पराभूत झाले. पुत्रप्रेमापोटी भाजपा-शिवसेनेला ताकद देण्याची खेळी काँग्रेसवरच उलटली. यवतमाळ जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार काँग्रेसचे आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या जिल्ह्याचे आहेत. मात्र त्यानंतरही त्यांना येथे काँग्रेस उमेदवारांना मतांची आघाडी मिळवून देता आलेली नाही. यवतमाळ-वाशिममधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे तर चंद्रपुरातून सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे अनुक्रमे ९३ हजार व २ लाख ३६ हजार मतांनी पराभूत झाले. प्रदेशाध्यक्ष माणिकरावांनी यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक व सोईच्या राजकारणापोटी विरोधी पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न केला. आपला परंपरागत विधानसभा मतदारसंघ आपल्यासाठी रिकामा व्हावा म्हणून शिवसेनेतच लोकसभेचा दुसरा उमेदवार पुढे करण्याची खेळीही पडद्यामागून माणिकरावांनीच खेळली होती. मात्र ‘मातोश्री’वरून प्रतिसाद न मिळाल्याने ही खेळी फसली. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेच्या दोन बंडखोर सभापतींना तर यवतमाळ नगरपरिषदेमध्ये भाजपाच्या बंडखोर नगराध्यक्षाला ताकद देण्याची खेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांनी खेळली. मात्र या खेळीचे मास्टर मार्इंड माणिकराव ठाकरेच होते. नेमकी हीच खेळी काँग्रेसच्या अंगलट आली. लोकसभा निवडणुकीत यवतमाळ शहराची सूत्रे बंडखोर नगराध्यक्षांच्या हाती दिल्याने आणि जिल्हा परिषदेत काँग्रेस पदाधिकार्‍याऐवजी सेनेच्या बंडखोर सभापतींना जवळ केले जात असल्याने निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते दुखावले. मंत्र्यांची भेट न मिळणे, कामे न होणे, पद-सन्मान न मिळणे, कंत्राटदार-दलालांचा सतत गराडा, पीएंकडून मिळणारी उद्धट वागणूक आदी कारणांनी काँग्रेस कार्यकर्ते दुखावले. त्याचाच फटका लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसला. माणिकरावांच्या नेतृत्वात राज्यात सर्वत्रच काँग्रेस माघारली. मी पाच वर्षे काँग्रेस जीवंत ठेवली असे सांगणार्‍या माणिकरावांनी लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेस अक्षरश: मातीत घातली. माणिकराव आणि त्यांच्या मर्जीतील प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांनी राज्यात काँग्रेसचे जणू वाटोळे केले. जेथे गृहजिल्ह्यातच माणिकराव काँग्रेसला तारु शकले नाही तेथे अन्य जिल्ह्यात दुरवस्था झाली तर त्यात गैर काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात माणिकराव मुलाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र तिकीट न मिळाल्याने संपूर्ण गट नाराज झाला. माणिकरावचे कार्यकर्ते काँग्रेसच्या व्यासपीठावर केवळ शरीराने दिसत होते. त्यांची ही नाराजी मोघेंना महागात पडली. माणिकरावांनी सुरुवातीपासूनच सरकार अर्थात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात छुप्या हालचाली केल्या. लोकसभा निकालानंतरसुद्धा नारायण राणेंच्या भेटीआडून आणखी एक पत्ते फेकून पाहिले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. सहा वर्षे प्रदेशाध्यक्षपद सांभाळूनही माणिकरावांना आपल्या गृहजिल्ह्यासह राज्यात पक्षाची ताकद वाढविता आलेली नाही. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस या आपल्या परंपरागत म्हणविणार्‍या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला तब्बल २७ हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे माणिकराव ठाकरे आणि प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश पदावर आणखी कायम राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचे पानिपत निश्चित मानले जात आहे. माणिकरावांना हटवा आणि विधानसभा वाचवा, असा सूर काँग्रेसच्या गोटातून ऐकायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)