शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेनेला ताकद देणे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना भोवले

By admin | Updated: May 21, 2014 01:01 IST

राज्यात लोकसभेच्या दोन डझनावर जागी विजयाचे स्वप्न पाहणार्‍या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना धड आपला यवतमाळ हा गृहजिल्हाही सांभाळता आला नाही.

यवतमाळ : राज्यात लोकसभेच्या दोन डझनावर जागी विजयाचे स्वप्न पाहणार्‍या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना धड आपला यवतमाळ हा गृहजिल्हाही सांभाळता आला नाही. त्यांच्या या जिल्ह्यात राज्यातील दोन कॅबिनेट मंत्री पराभूत झाले. पुत्रप्रेमापोटी भाजपा-शिवसेनेला ताकद देण्याची खेळी काँग्रेसवरच उलटली. यवतमाळ जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार काँग्रेसचे आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या जिल्ह्याचे आहेत. मात्र त्यानंतरही त्यांना येथे काँग्रेस उमेदवारांना मतांची आघाडी मिळवून देता आलेली नाही. यवतमाळ-वाशिममधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे तर चंद्रपुरातून सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे अनुक्रमे ९३ हजार व २ लाख ३६ हजार मतांनी पराभूत झाले. प्रदेशाध्यक्ष माणिकरावांनी यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक व सोईच्या राजकारणापोटी विरोधी पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न केला. आपला परंपरागत विधानसभा मतदारसंघ आपल्यासाठी रिकामा व्हावा म्हणून शिवसेनेतच लोकसभेचा दुसरा उमेदवार पुढे करण्याची खेळीही पडद्यामागून माणिकरावांनीच खेळली होती. मात्र ‘मातोश्री’वरून प्रतिसाद न मिळाल्याने ही खेळी फसली. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेच्या दोन बंडखोर सभापतींना तर यवतमाळ नगरपरिषदेमध्ये भाजपाच्या बंडखोर नगराध्यक्षाला ताकद देण्याची खेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांनी खेळली. मात्र या खेळीचे मास्टर मार्इंड माणिकराव ठाकरेच होते. नेमकी हीच खेळी काँग्रेसच्या अंगलट आली. लोकसभा निवडणुकीत यवतमाळ शहराची सूत्रे बंडखोर नगराध्यक्षांच्या हाती दिल्याने आणि जिल्हा परिषदेत काँग्रेस पदाधिकार्‍याऐवजी सेनेच्या बंडखोर सभापतींना जवळ केले जात असल्याने निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते दुखावले. मंत्र्यांची भेट न मिळणे, कामे न होणे, पद-सन्मान न मिळणे, कंत्राटदार-दलालांचा सतत गराडा, पीएंकडून मिळणारी उद्धट वागणूक आदी कारणांनी काँग्रेस कार्यकर्ते दुखावले. त्याचाच फटका लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसला. माणिकरावांच्या नेतृत्वात राज्यात सर्वत्रच काँग्रेस माघारली. मी पाच वर्षे काँग्रेस जीवंत ठेवली असे सांगणार्‍या माणिकरावांनी लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेस अक्षरश: मातीत घातली. माणिकराव आणि त्यांच्या मर्जीतील प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांनी राज्यात काँग्रेसचे जणू वाटोळे केले. जेथे गृहजिल्ह्यातच माणिकराव काँग्रेसला तारु शकले नाही तेथे अन्य जिल्ह्यात दुरवस्था झाली तर त्यात गैर काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात माणिकराव मुलाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र तिकीट न मिळाल्याने संपूर्ण गट नाराज झाला. माणिकरावचे कार्यकर्ते काँग्रेसच्या व्यासपीठावर केवळ शरीराने दिसत होते. त्यांची ही नाराजी मोघेंना महागात पडली. माणिकरावांनी सुरुवातीपासूनच सरकार अर्थात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात छुप्या हालचाली केल्या. लोकसभा निकालानंतरसुद्धा नारायण राणेंच्या भेटीआडून आणखी एक पत्ते फेकून पाहिले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. सहा वर्षे प्रदेशाध्यक्षपद सांभाळूनही माणिकरावांना आपल्या गृहजिल्ह्यासह राज्यात पक्षाची ताकद वाढविता आलेली नाही. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस या आपल्या परंपरागत म्हणविणार्‍या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला तब्बल २७ हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे माणिकराव ठाकरे आणि प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश पदावर आणखी कायम राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचे पानिपत निश्चित मानले जात आहे. माणिकरावांना हटवा आणि विधानसभा वाचवा, असा सूर काँग्रेसच्या गोटातून ऐकायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)