शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एसआरएच्या कार्यालयावर काँग्रेसची धडक

By admin | Updated: July 16, 2016 03:09 IST

मानकापूर परिसरातील गोदावरीनगर व गंगानगर येथील झोपडपट्टी महापालिकेतर्फे महिनाभरात तोडण्यात आली.

झोपडीधारकांचे आधी पुनर्वसन करा : झोपड्या तोडल्यास रस्त्यावर उतरू नागपूर : मानकापूर परिसरातील गोदावरीनगर व गंगानगर येथील झोपडपट्टी महापालिकेतर्फे महिनाभरात तोडण्यात आली. या झोपडपट्ट्या सन २००० पूर्वीच्या असतानाही येथील नागरिकांचे पुनर्वसन न करता तोडण्यात आल्या याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे शुक्रवारी एसआरए (झोपडपट्टी विकास प्राधिकरण)च्या कार्यालयावर धडक देण्यात आली. झोपडी तोडलेल्या नागरिकांना एसआरए अंतर्गत त्वरित घर द्यावे, अशी मागणी करीत यापुढे नियमित झालेल्या झोपडपट्ट्या तोडल्या तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. के.टी.नगर, काटोल रोड येथे एसआरएचे कार्यालय आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात पश्चिम नागपूर झोपडपट्टी सेलचे राम कळंबे यांनी शेकडो झोपडीधारकांना सोबत घेत या कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी जोरदार नारेबाजी करीत एसआरए सहायक आयुक्त रहाटे यांना घेराव घालण्यात आला. गोदावरीनगर व गंगानगर या सन २००० पूर्वी वसलेल्या झोपडपट्ट्या तोडण्यात आल्या. येथे नळ आहे. वीज आहे. नागरिक महापालिकेचा कर भरतात. त्यानंतरही झोपड्या कशा तोडण्यात आल्या, असा सवाल राम कळंबे यांनी केला. विकास ठाकरे म्हणाले, सन २००० पूर्वीच्या झोपडपट्ट्यांना कायद्यानुसार संरक्षण प्राप्त झाले आहे. संबंधित झोपड्या कोणत्याही परिस्थितीत हटवायच्या झाल्यास आधी संबंधितांची पर्यायी निवासव्यवस्था करणे बंधनकारक आहे. मात्र, या नागरिकांची पर्यायी व्यवस्था न करताच त्यांची घरे तोडण्यात आली आहेत. झोपडीधारकांवरचा हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. गेल्या २० वर्षांपासून हे नागरिक येथे वास्तव्यास आहेत. याच भागात यांचे रोजगार व व्यवसाय आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना उत्तर नागपुरातील एखाद्या कोपऱ्यात नेऊन बसविणे योग्य होणार नाही. त्यामुळे त्यांचे वास्तव्य असलेल्या भागातच एसआरए अंतर्गत गाळे बांधावे व या नागरिकांच्या निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली. यावर रहाटे यांनी झोपडपट्टी असलेल्या भागात सर्वेक्षण केले जाईल व जागा उपलब्ध असल्यास तेथे एसआरए अंतर्गत घर बांधून दिले जाईल, असे आश्वासन दिले. दीपक वानखेडे, सुनील चोपडा, हरीश ग्वालबंसी, नितीश ग्वालबंसी, घनशाम मांगे, रंजना मडावी, आसीफ अंसारी, बंटी शेळके, रिजवान शेख, सायरा, रंजना राऊत, जितु मस्के, दिलीप मामिक, मोहम्मद इस्माईल, विभल विदावत, आनंद तिवारी, धीरज पांडे, देवेंद्र कौरती, शालिक भांडारकर आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)